शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे तुडुंब, नद्या, धरणांनी ओलांडली पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:19 IST

रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची संततधार सकाळपासून कायम आहे.ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे फुल्ल झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील शीळ धरण पाण्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहू लागले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील धरणे तुडुंबनद्या, धरणांनी ओलांडली पातळी

रत्नागिरी : रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची संततधार सकाळपासून कायम आहे.ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे फुल्ल झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील शीळ धरण पाण्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहू लागले आहे.जिल्ह्यात सरासरी ११२.४४ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पर्जन्यवृष्टी राजापूर तालुक्यात झाली आहे. १९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मंडणगड तालुक्यात १७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दापोली ६०, खेड ८५, गुहागर १००, चिपळूण १४७, संगमेश्वर ८८, रत्नागिरी ८६, लांजा तालुक्यात ८२ मिलीमीटर मिळून एकूण १०१२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.पावसामुळे समुद्राच्या लाटा देखील जोरदार उसळत आहेत. पावसामुळे माती विरघळत असल्याने डोंगरावरील माती कोसळून, रस्त्यावर येत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे देखील कोसळली आहेत. पावसामुळे विजेचा सारखा लपंडाव सुरू असतानाच रात्री खंडित झालेला वीज पुरवठा सकाळपर्यंत पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले. शिवाय विजेअभावी पाण्याचे पंप बंद असल्याने ग्रामस्थांनी भर पावसात मात्र गैरसोय झाली.रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या देखील दुथडीभरून वाहत आहेत. धरणांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी