शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे तुडुंब, नद्या, धरणांनी ओलांडली पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:19 IST

रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची संततधार सकाळपासून कायम आहे.ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे फुल्ल झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील शीळ धरण पाण्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहू लागले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील धरणे तुडुंबनद्या, धरणांनी ओलांडली पातळी

रत्नागिरी : रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची संततधार सकाळपासून कायम आहे.ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे फुल्ल झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील शीळ धरण पाण्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहू लागले आहे.जिल्ह्यात सरासरी ११२.४४ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पर्जन्यवृष्टी राजापूर तालुक्यात झाली आहे. १९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मंडणगड तालुक्यात १७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दापोली ६०, खेड ८५, गुहागर १००, चिपळूण १४७, संगमेश्वर ८८, रत्नागिरी ८६, लांजा तालुक्यात ८२ मिलीमीटर मिळून एकूण १०१२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.पावसामुळे समुद्राच्या लाटा देखील जोरदार उसळत आहेत. पावसामुळे माती विरघळत असल्याने डोंगरावरील माती कोसळून, रस्त्यावर येत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे देखील कोसळली आहेत. पावसामुळे विजेचा सारखा लपंडाव सुरू असतानाच रात्री खंडित झालेला वीज पुरवठा सकाळपर्यंत पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले. शिवाय विजेअभावी पाण्याचे पंप बंद असल्याने ग्रामस्थांनी भर पावसात मात्र गैरसोय झाली.रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या देखील दुथडीभरून वाहत आहेत. धरणांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी