शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

कृषी क्षेत्रच बाधित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने ...

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्याने शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवावे, असे आदेश कृषी आयुक्तालयाकडून २७ एप्रिल रोजी निघाले आहेत. मात्र, या आदेशाची रायगड व सांगली हे दोन जिल्हे वगळता अन्य कुठल्याही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लाॅकडाऊन केले आहे. मात्र, कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद आहेत. शेतकरी पारंपरिक पद्धतीची बियाणे साठवत नाहीत, संपूर्ण भातशेती ही कृषी सेवा केंद्रांवर अवलंबून असते. मात्र. सध्या अनेक कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. विविध नामवंत कंपन्यांची भात बियाणे मिळणारी ठिकाणे बंद असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.

शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कृषी सेवा केंद्रे आहेत. सध्या या दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी आहे. चाळीस-पन्नास गावांतील शेतकरी या केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्याने ते या वेळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य उपलब्ध होणे कठीण होणार आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्याचा अडथळारहित पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुसार शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे चालू ठेवण्याबाबत व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक चालू ठेवण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवणे, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, इ कॉमर्स (ऑनलाईन विक्री) आदी पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होतील, यादृष्टीने स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. मात्र या आदेशांची अंमलबजावणी केवळ रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी केली असून कृषिविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिली आहे. अन्य जिल्हे याबाबत अजूनही अनभिज्ञच आहेत.

कोटसाठी

काही कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांचे नूतनीकरणही लाॅकडाऊन काळात झालेले नाही. त्यामुळे ते दोलायमान अवस्थेत आहेत. सध्याची गरज लक्षात घेऊन या परवान्यांना मुदतवाढ देण्यात यावी. लॉकडाऊनच्या परिणामामुळे रोजगार संपलेला आहे. याचा वेगळा परिणाम लागवडीखालील क्षेत्र वाढण्यावर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कृषी सेवा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहतील, याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

- प्रकाश बेर्डे, आधुनिक शेतकरी, देवडे (ता. संगमेश्वर)