शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्रच बाधित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने ...

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्याने शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवावे, असे आदेश कृषी आयुक्तालयाकडून २७ एप्रिल रोजी निघाले आहेत. मात्र, या आदेशाची रायगड व सांगली हे दोन जिल्हे वगळता अन्य कुठल्याही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लाॅकडाऊन केले आहे. मात्र, कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद आहेत. शेतकरी पारंपरिक पद्धतीची बियाणे साठवत नाहीत, संपूर्ण भातशेती ही कृषी सेवा केंद्रांवर अवलंबून असते. मात्र. सध्या अनेक कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. विविध नामवंत कंपन्यांची भात बियाणे मिळणारी ठिकाणे बंद असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.

शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कृषी सेवा केंद्रे आहेत. सध्या या दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी आहे. चाळीस-पन्नास गावांतील शेतकरी या केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्याने ते या वेळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य उपलब्ध होणे कठीण होणार आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्याचा अडथळारहित पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुसार शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे चालू ठेवण्याबाबत व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक चालू ठेवण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवणे, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, इ कॉमर्स (ऑनलाईन विक्री) आदी पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होतील, यादृष्टीने स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. मात्र या आदेशांची अंमलबजावणी केवळ रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी केली असून कृषिविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिली आहे. अन्य जिल्हे याबाबत अजूनही अनभिज्ञच आहेत.

कोटसाठी

काही कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांचे नूतनीकरणही लाॅकडाऊन काळात झालेले नाही. त्यामुळे ते दोलायमान अवस्थेत आहेत. सध्याची गरज लक्षात घेऊन या परवान्यांना मुदतवाढ देण्यात यावी. लॉकडाऊनच्या परिणामामुळे रोजगार संपलेला आहे. याचा वेगळा परिणाम लागवडीखालील क्षेत्र वाढण्यावर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कृषी सेवा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहतील, याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

- प्रकाश बेर्डे, आधुनिक शेतकरी, देवडे (ता. संगमेश्वर)