शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

कृषी क्षेत्रच बाधित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने ...

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्याने शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवावे, असे आदेश कृषी आयुक्तालयाकडून २७ एप्रिल रोजी निघाले आहेत. मात्र, या आदेशाची रायगड व सांगली हे दोन जिल्हे वगळता अन्य कुठल्याही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लाॅकडाऊन केले आहे. मात्र, कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद आहेत. शेतकरी पारंपरिक पद्धतीची बियाणे साठवत नाहीत, संपूर्ण भातशेती ही कृषी सेवा केंद्रांवर अवलंबून असते. मात्र. सध्या अनेक कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. विविध नामवंत कंपन्यांची भात बियाणे मिळणारी ठिकाणे बंद असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.

शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कृषी सेवा केंद्रे आहेत. सध्या या दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी आहे. चाळीस-पन्नास गावांतील शेतकरी या केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्याने ते या वेळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य उपलब्ध होणे कठीण होणार आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्याचा अडथळारहित पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुसार शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे चालू ठेवण्याबाबत व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक चालू ठेवण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवणे, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, इ कॉमर्स (ऑनलाईन विक्री) आदी पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होतील, यादृष्टीने स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. मात्र या आदेशांची अंमलबजावणी केवळ रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी केली असून कृषिविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिली आहे. अन्य जिल्हे याबाबत अजूनही अनभिज्ञच आहेत.

कोटसाठी

काही कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांचे नूतनीकरणही लाॅकडाऊन काळात झालेले नाही. त्यामुळे ते दोलायमान अवस्थेत आहेत. सध्याची गरज लक्षात घेऊन या परवान्यांना मुदतवाढ देण्यात यावी. लॉकडाऊनच्या परिणामामुळे रोजगार संपलेला आहे. याचा वेगळा परिणाम लागवडीखालील क्षेत्र वाढण्यावर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कृषी सेवा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहतील, याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

- प्रकाश बेर्डे, आधुनिक शेतकरी, देवडे (ता. संगमेश्वर)