शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

कृषी क्षेत्रच बाधित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने ...

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्याने शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवावे, असे आदेश कृषी आयुक्तालयाकडून २७ एप्रिल रोजी निघाले आहेत. मात्र, या आदेशाची रायगड व सांगली हे दोन जिल्हे वगळता अन्य कुठल्याही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लाॅकडाऊन केले आहे. मात्र, कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद आहेत. शेतकरी पारंपरिक पद्धतीची बियाणे साठवत नाहीत, संपूर्ण भातशेती ही कृषी सेवा केंद्रांवर अवलंबून असते. मात्र. सध्या अनेक कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. विविध नामवंत कंपन्यांची भात बियाणे मिळणारी ठिकाणे बंद असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.

शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कृषी सेवा केंद्रे आहेत. सध्या या दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी आहे. चाळीस-पन्नास गावांतील शेतकरी या केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्याने ते या वेळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य उपलब्ध होणे कठीण होणार आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्याचा अडथळारहित पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुसार शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे चालू ठेवण्याबाबत व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक चालू ठेवण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवणे, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, इ कॉमर्स (ऑनलाईन विक्री) आदी पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होतील, यादृष्टीने स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. मात्र या आदेशांची अंमलबजावणी केवळ रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी केली असून कृषिविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिली आहे. अन्य जिल्हे याबाबत अजूनही अनभिज्ञच आहेत.

कोटसाठी

काही कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांचे नूतनीकरणही लाॅकडाऊन काळात झालेले नाही. त्यामुळे ते दोलायमान अवस्थेत आहेत. सध्याची गरज लक्षात घेऊन या परवान्यांना मुदतवाढ देण्यात यावी. लॉकडाऊनच्या परिणामामुळे रोजगार संपलेला आहे. याचा वेगळा परिणाम लागवडीखालील क्षेत्र वाढण्यावर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कृषी सेवा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहतील, याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

- प्रकाश बेर्डे, आधुनिक शेतकरी, देवडे (ता. संगमेश्वर)