शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:33 IST

Petrol vegetable Ratnagiri -पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला आहे. वाहतूक भाडे वाढल्याने किरकोळ भाजीविक्रीच्या दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देइंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढकांदा, लसणीच्या दरात चढउतार सुरूच

रत्नागिरी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला आहे. वाहतूक भाडे वाढल्याने किरकोळ भाजीविक्रीच्या दरात वाढ झाली आहे.इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक भाडे वाढले. परिणामी, भाजीच्या दरात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत. खाद्यतेलाचे भाव कडाडले असून, एक लीटरसाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत.

कांदा ५० ते ६० रुपये, बटाटा २५ रुपये तर लसूण १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र, परजिल्ह्यातील शेतकरी शंभर रुपयास सव्वा ते दीड किलो लसूण, तर कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकत आहेत.परजिल्ह्यातील विक्रेतेपरजिल्ह्यातून विक्रेते शहर, तसेच जिल्ह्यात येत आहेत. ट्रक भरून कांदा, बटाटा, लसूण विक्रीसाठी आणत असून, बाजारभावापेक्षा कमी दरात विकत असल्याने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील नाक्या-नाक्यावर दहा किलोच्या बॅगांतून कांदा विक्री करीत असून, ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.अननस मुबलकसध्या बाजारात कलिंगडासह अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पिकलेले अननस ६० ते ७० रुपये प्रति नग दराने विक्री सुरू आहे. हातगाडी विक्रेते शहरातील गल्लीबोळातून विक्री करीत आहेत.बिस्कीटे गिफ्टखाद्यतेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सहा महिन्यांत तेलाचे दर लीटरमागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाद्यतेल खरेदीवर भेटवस्तू जाहीर केली आहे. एका कंपनीकडून चक्क बिस्किटचे पुडे दिले जात आहेत.

महागाईवर शासनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसत आहे. इंधनदर वाढ झाली की, भाजीपाला, फळे, तसेच अन्य वस्तूंची दरवाढ होत आहे. दरवाढीवर नियंत्रण गरजेचे आहे.- प्रभा देसाई, गृहिणी

कोरोनामुळे वर्षभरात आर्थिक समस्येला सर्वांनाच सामोरे जावे लागले. त्यातच महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य होरपळत आहेत. सामान्य जनतेचा शासनाने विचार करून अंमलबजावणी करावी.- शैलजा पाटील, गृहिणी

टॅग्स :MarketबाजारPetrolपेट्रोलvegetableभाज्याRatnagiriरत्नागिरी