शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:33 IST

Petrol vegetable Ratnagiri -पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला आहे. वाहतूक भाडे वाढल्याने किरकोळ भाजीविक्रीच्या दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देइंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढकांदा, लसणीच्या दरात चढउतार सुरूच

रत्नागिरी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला आहे. वाहतूक भाडे वाढल्याने किरकोळ भाजीविक्रीच्या दरात वाढ झाली आहे.इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक भाडे वाढले. परिणामी, भाजीच्या दरात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत. खाद्यतेलाचे भाव कडाडले असून, एक लीटरसाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत.

कांदा ५० ते ६० रुपये, बटाटा २५ रुपये तर लसूण १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र, परजिल्ह्यातील शेतकरी शंभर रुपयास सव्वा ते दीड किलो लसूण, तर कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकत आहेत.परजिल्ह्यातील विक्रेतेपरजिल्ह्यातून विक्रेते शहर, तसेच जिल्ह्यात येत आहेत. ट्रक भरून कांदा, बटाटा, लसूण विक्रीसाठी आणत असून, बाजारभावापेक्षा कमी दरात विकत असल्याने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील नाक्या-नाक्यावर दहा किलोच्या बॅगांतून कांदा विक्री करीत असून, ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.अननस मुबलकसध्या बाजारात कलिंगडासह अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पिकलेले अननस ६० ते ७० रुपये प्रति नग दराने विक्री सुरू आहे. हातगाडी विक्रेते शहरातील गल्लीबोळातून विक्री करीत आहेत.बिस्कीटे गिफ्टखाद्यतेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सहा महिन्यांत तेलाचे दर लीटरमागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाद्यतेल खरेदीवर भेटवस्तू जाहीर केली आहे. एका कंपनीकडून चक्क बिस्किटचे पुडे दिले जात आहेत.

महागाईवर शासनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसत आहे. इंधनदर वाढ झाली की, भाजीपाला, फळे, तसेच अन्य वस्तूंची दरवाढ होत आहे. दरवाढीवर नियंत्रण गरजेचे आहे.- प्रभा देसाई, गृहिणी

कोरोनामुळे वर्षभरात आर्थिक समस्येला सर्वांनाच सामोरे जावे लागले. त्यातच महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य होरपळत आहेत. सामान्य जनतेचा शासनाने विचार करून अंमलबजावणी करावी.- शैलजा पाटील, गृहिणी

टॅग्स :MarketबाजारPetrolपेट्रोलvegetableभाज्याRatnagiriरत्नागिरी