शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

परतीच्या वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवितहानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:32 IST

गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवितहानी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता

रत्नागिरी : गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.वादळी परतीच्या पावसाने अनेक भागात नुकसान केले आहे. येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सकाळी १० वाजेपर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार, मंडणगड तालुक्यातील बोटी येथील हनुमंत साळुंखे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील पालघर येथील रमेश जाधव यांच्या घराचे नुकसान झाले असून गिम्हवणे येथील प्रताप जुवळे यांचा बैल विजेच्या धक्क्याने मृत झाला आहे.गुहागर तालुक्यातील पाचेरी येथील उदय भुवड यांच्या घरावर वीज कोसळल्याने नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नांदलज सुशांत कांबळे या तेरावर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील बाईतवाडी येथील महादेव बाईत यांचे विजेमुळे वायरिंग तसेच झाडेही जळाली आहेत.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी