शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

परतीच्या वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवितहानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:32 IST

गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवितहानी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता

रत्नागिरी : गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.वादळी परतीच्या पावसाने अनेक भागात नुकसान केले आहे. येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सकाळी १० वाजेपर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार, मंडणगड तालुक्यातील बोटी येथील हनुमंत साळुंखे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील पालघर येथील रमेश जाधव यांच्या घराचे नुकसान झाले असून गिम्हवणे येथील प्रताप जुवळे यांचा बैल विजेच्या धक्क्याने मृत झाला आहे.गुहागर तालुक्यातील पाचेरी येथील उदय भुवड यांच्या घरावर वीज कोसळल्याने नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नांदलज सुशांत कांबळे या तेरावर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील बाईतवाडी येथील महादेव बाईत यांचे विजेमुळे वायरिंग तसेच झाडेही जळाली आहेत.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी