शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

मान्सून महोत्सवात ‘लवकुश’ला प्रतिसाद

By admin | Updated: June 30, 2015 00:17 IST

रामायणाचा भास

कुडाळ : कुडाळ येथील लाजरी किके्र ट गु्रप आयोजित तिसऱ्या मान्सून महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोवा व सिंधुदुर्गातील कलाकारांनी एकत्र येत सादर केलेल्या संयुक्त दशावतार ‘लवकुश’ या नाटकालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अतिशय सुंदररित्या सादर केलेल्या या नाटकामुळे प्रत्यक्ष रामायणच सुरू आहे की काय, असा भास यावेळी रसिकप्रेक्षकांना होत होता. कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने गेली दोन वर्षे मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदा या मान्सून महोत्सवात पहिल्या दिवशी ‘सती चंद्रसेना’ व दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ‘लवकुश’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेल्या या मान्सून महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती.मान्सून महोत्सवाची संकल्पना मांडून दशावतार कलाकार व कलेला एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ निर्माण करणारे लाजरी ग्रुपचे राजेश म्हाडेश्वर यांचाही सत्कार करण्यात आला. तुफान गर्दीचा उच्चांक गाठणारा या मान्सून महोत्सवाची सांगता झाली असली, तरी प्रेक्षकांना पुढच्या वर्षी काय, याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. प्र्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र आता लाजरी ग्रुपकडून वाढलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. (प्रतिनिधी)रामायणाचा भासलवकुश या नाटकाला आवश्यक असलेल्या कलाकारांची पात्राप्रमाणे योग्य निवड, सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा व सुंदर संगीतसाथ या सर्वाचा समुच्चय करीत या नाटकाचे सादरीकरण कलाकारांनी केल्याने खरोखरच रामायण सुरू आहे की काय, असा भास प्रेक्षकांना होत होता. लवकुश जोडी गाजलीलवकुश साकारणाऱ्या दोन्ही कलाकारांनी अपूर्ण असा अभिनय करीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. यावेळी हनुमंत&आणि कुश, लवचे आणि लक्ष्मण यांच्यातील युध्दातील चालेले शब्दांचे खेळ आणि वाक्यांच्या उधळणीमुळेही लवकुशाची जोडी या नाटकात खरोखरच गाजली. नाटकाचे अतिशय सुंदररित्या सादरीकरण सुरू असल्याने या नाटकाशी प्रेक्षकही एकरूप झाले होते. त्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता ताणली जात होती. यांनी साकारल्या भूमिका या नाटकामध्ये गोवा व सिंधुदुर्गमधील पांडुरंग कलिंगण (गणपती), प्रथमेश परब (रिध्दीसिध्दी), आनंद नार्वेकर (राम), उदय कोनसकर (लक्ष्मण), सुधीर तांडेल (सीता), दत्तप्रसाद शेणई (लव), भरत नाईक (कुश), शांती कलिंगण (मारुती), पप्पू नांदोसकर (वाल्मिकी), कृ ष्णा घाटकर (मडवळ), तुकाराम गावडे (मडवळीन), विठ्ठल गावकर (भरत) यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाला पप्पू गावकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने गायन करून उपस्थित रसिक पे्रक्षकांची मने जिंकली.