शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

मान्सून महोत्सवात ‘लवकुश’ला प्रतिसाद

By admin | Updated: June 30, 2015 00:17 IST

रामायणाचा भास

कुडाळ : कुडाळ येथील लाजरी किके्र ट गु्रप आयोजित तिसऱ्या मान्सून महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोवा व सिंधुदुर्गातील कलाकारांनी एकत्र येत सादर केलेल्या संयुक्त दशावतार ‘लवकुश’ या नाटकालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अतिशय सुंदररित्या सादर केलेल्या या नाटकामुळे प्रत्यक्ष रामायणच सुरू आहे की काय, असा भास यावेळी रसिकप्रेक्षकांना होत होता. कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने गेली दोन वर्षे मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदा या मान्सून महोत्सवात पहिल्या दिवशी ‘सती चंद्रसेना’ व दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ‘लवकुश’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेल्या या मान्सून महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती.मान्सून महोत्सवाची संकल्पना मांडून दशावतार कलाकार व कलेला एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ निर्माण करणारे लाजरी ग्रुपचे राजेश म्हाडेश्वर यांचाही सत्कार करण्यात आला. तुफान गर्दीचा उच्चांक गाठणारा या मान्सून महोत्सवाची सांगता झाली असली, तरी प्रेक्षकांना पुढच्या वर्षी काय, याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. प्र्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र आता लाजरी ग्रुपकडून वाढलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. (प्रतिनिधी)रामायणाचा भासलवकुश या नाटकाला आवश्यक असलेल्या कलाकारांची पात्राप्रमाणे योग्य निवड, सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा व सुंदर संगीतसाथ या सर्वाचा समुच्चय करीत या नाटकाचे सादरीकरण कलाकारांनी केल्याने खरोखरच रामायण सुरू आहे की काय, असा भास प्रेक्षकांना होत होता. लवकुश जोडी गाजलीलवकुश साकारणाऱ्या दोन्ही कलाकारांनी अपूर्ण असा अभिनय करीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. यावेळी हनुमंत&आणि कुश, लवचे आणि लक्ष्मण यांच्यातील युध्दातील चालेले शब्दांचे खेळ आणि वाक्यांच्या उधळणीमुळेही लवकुशाची जोडी या नाटकात खरोखरच गाजली. नाटकाचे अतिशय सुंदररित्या सादरीकरण सुरू असल्याने या नाटकाशी प्रेक्षकही एकरूप झाले होते. त्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता ताणली जात होती. यांनी साकारल्या भूमिका या नाटकामध्ये गोवा व सिंधुदुर्गमधील पांडुरंग कलिंगण (गणपती), प्रथमेश परब (रिध्दीसिध्दी), आनंद नार्वेकर (राम), उदय कोनसकर (लक्ष्मण), सुधीर तांडेल (सीता), दत्तप्रसाद शेणई (लव), भरत नाईक (कुश), शांती कलिंगण (मारुती), पप्पू नांदोसकर (वाल्मिकी), कृ ष्णा घाटकर (मडवळ), तुकाराम गावडे (मडवळीन), विठ्ठल गावकर (भरत) यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाला पप्पू गावकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने गायन करून उपस्थित रसिक पे्रक्षकांची मने जिंकली.