शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:40 IST

बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत्नागिरीत बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.

ठळक मुद्देबौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषदसम्यक विश्व संघ डॉट इन संकेतस्थळाचे अनावरण

रत्नागिरी : बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत्नागिरीत बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सम्यक विश्व संघ यांच्यावतीने रविवारी पहिली जिल्हास्तरीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. महाथेरो (मिलिंद महाविद्यालय, मुळावा, जि. यवतमाळ) यांनी धम्मदेसना दिली. यावेळी त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म विविध जातक कथांनी स्पष्ट केला.महाउपासक बी. हरीनाथ यांनी जन्माला येणाऱ्या व्यक्तीला मानव घडविणारा बुद्धाचा धम्म असल्याचे सांगितले. दलित समाजातील हरीनाथ यांनी बुद्धाच्या धम्माचा अंगिकार कसा केला, याविषयी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. अतुल भोसेकर यांनी धम्मभाषा व धम्मलिपी यांचा परिचय करून दिला.

ते म्हणाले की, नवीन पिढीत धम्म रूजविण्यासाठी गाव तेथे विहार आणि विहार तेथे धम्म स्कूल होणे गरजेचे आहे. बौद्ध इतिहास अभ्यासक अशोक हंडोरे यांनी बौद्ध रंगभूमी या विषयावर बोलताना त्यातील ६४ कलांचा उल्लेख केला. सम्राट अशोक याच्या काळात उर्जितावस्था मिळालेल्या या कला केवळ मनोरंजनासाठी नाही तर धम्माच्या प्रबोधनासाठी उदयास आल्याचे त्यांनी सांगितले.बौद्ध लेणी व स्तूप अभ्यासक अशोक नगरे यांनी विविध ठिकाणच्या लेणी, स्तूप निर्मितीचा तसेच पुरातत्व शास्त्र याचा इतिहास विशद केला. याविषयीचा चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याने त्याच्या संशोधन क्षेत्रात अधिकाधिक बौद्ध बांधवांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक महेंद्र शेगावकर यांनी सम्यक संघ व त्याचे कार्य विशद करताना भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका याविषयी माहिती दिली. बुद्धाचे तत्वज्ञान मांडताना आजचे विज्ञान माहीत असावे, असे आग्रही मत त्यांनी मांडले.प्रा. मिलिंद कदम यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश कांबळे यांनी आभार मानले. धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी सम्यक विश्व संघाचे जनक धोत्रेकर, विवेक घाटविलकर, प्रा. मिलिंद कदम, राजेश कांबळे, प्रा. विकास कांबळे, सचिन कांबळे, प्रा. सुनील जोपळे यांनी परिश्रम घेतले.प्राचीन बौद्धांनी वसाहती केल्याची नोंदप्राचीन बौद्ध संस्कृती अभ्यासक गोपीचंद कांबळे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियर्समध्ये प्राचीन बौद्धांनी वसाहती केल्याची नोंद असल्याचे स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा (ता. संगमेश्वर) याच्या नावामागचा बौद्धकालीन संदर्भ देत येथे बुद्धानी आपल्या शिष्यगणाला उपदेश केल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. यामुळेच येथील मूळ बौद्ध बांधवांचे आडनाव सकपाळ असल्याचे सांगितले.संकेतस्थळाचे अनावरणया धम्म परिषदेचे औचित्य साधून सम्यक विश्व संघ ही संस्था धम्म व समाजकार्याला समर्पित करण्यात आली तसेच सम्यक विश्व संघ डॉट इन या संकेतस्थळाचे अनावरणही भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले.तीन प्रमुख ठराव 

  1. - जाती प्रमाणपत्रावर बौद्ध अशी नोंद करून घेणे आणि येत्या जनगणनेत तशी नोंद करून घेणे.
  2. - रत्नागिरीतील थिबा राजवाड्यात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करणे व त्याअन्वये रत्नागिरी शहराची ओळख जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने तयार करणे.
  3. - भारतातील सर्वात उंच उभ्या बुद्धमूर्तीची स्थापना करून बौद्ध महाविहाराची निर्मिती करणे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा