शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

चारुहास दळीचे बेंगलोरच्या ‘वूड सायन्स’मध्ये संशोधन

By admin | Updated: July 19, 2016 23:53 IST

हॉर्टिकल्चरचा प्रवेश हुकला अन्... : वडिलांच्या व्यवसायातून शेतीची आवड--वेगळ्या वाटेची तरुण पिढी

मेहरून नाकाडे --रत्नागिरी  -वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शिक्षणाकडे ओढा अधिक असला तरी ‘वूड सायन्स’मध्ये पीएच. डी. करणाऱ्यांची संख्या विरळच! शहरातील कीटकनाशके, खते विक्रेते बाबा दळी दाम्पत्याचा मुलगा चारूहास दळी सध्या बेंगलोर येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये बांबू विषयावर संशोधन करीत आहे.ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबापीक दिवसेंदिवस धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य नगदी पिकाकडे वळणे गरजेचे आहे, असे चारूहास दळी यांचे मत आहे. वडिलांचा खते विक्रीचा व्यवसाय असल्याने शाळा सुटल्यानंतर फावल्या वेळेत दुकानात बसत असे. त्यामुळे शेतीची आवड निर्माण झाली. त्याचवेळी आपण काहीतरी वेगळं करावं, अशी इच्छा निर्माण झाली. बारावीनंतर हॉर्टिकल्चरला प्रवेश घेण्याची इच्छा होती. मात्र, माझी निवड फॉरेस्ट्रीसाठी झाली. पदवीनंतर डेहराडून विद्यापीठात दोन वर्षे राहून फॉरेस्ट्रीमध्येच एमएससी केलं. त्यानंतर मात्र ‘बांबू’ विषयावर पीएच. डी. करण्याचे ठरवले. आशियामध्ये फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट एकमेव असून, केरळ, जोधपूर व बेंगलोरमध्ये शाखा आहेत. प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर बेंगलोर येथील विद्यापीठात पीएच. डी.साठी प्रवेश घेतला.जंगली वृक्ष तोडण्यासाठी वन खात्याची परवानगी आवश्यक असते. शिवाय झाडांचे दरही अधिक असतात. परंतु बांबू आपल्याकडे कोठेही उपलब्ध होऊ शकतो तसेच बांबूला अधिक मागणी असल्याने शेतकरी बांबूची शेती करू शकतात. डोंगरउतारावर कोठेही बांबू लागवड केली जाऊ शकते. बांबूला पाणी कमी लागते. शिवाय तीन वर्षांपासून बांबू कटाई करणे सोपे होते, इतकी झपाट्याने त्याची वाढ होते. बांबूच्या बेटामुळे परिसरात सावली निर्माण होते. गर्द छाया मिळते व ग्लोबल वॉर्मिंग कमी होते.बांबूपासून गॅस व वीजनिर्मिती केली जाऊ शकते. शिवाय तारकोल, बायो इथेनॉलही तयार केले जाते. बांबूची पाने लांब असल्याने हवेतील कार्बनडाय आॅक्साईड शोषून घेतात व भरपूर प्रमाणात आॅक्सिजन सोडतात. त्यामुळे बांबूची विविष्ट प्रकारे लागवड करून ‘आॅक्सिजन’ पार्कची उभारणी केली जाऊ शकते. सध्या शहरातील नागरिक ताजी हवा मिळवण्यासाठी पार्क अथवा ग्रामीण भागाकडे जातात. त्यामुळे भविष्यात कोकणात येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता आॅक्सिजन पार्क उभारले तर आर्थिक उत्पन्नाचे साधन नक्कीच उपलब्ध होऊ शकते.बांधकाम व्यवसाय, फर्निचर, बोट हाऊसमध्ये बांबूचा वापर केला जातो. आपल्याकडे मिळणारा बांबू भरीव असल्याने त्याला विशेषत: मागणी होते. कुडाळमध्ये बांबूपासून तयार करणाऱ्या फर्निचरचा कारखाना आहे. लवासा येथील बोट हाऊसमध्ये बांबूपासून फर्निचर बनवण्यात आले आहे. युरोप, अमेरिका तसेच परदेशातील अन्य भागात बांबूला वाढती मागणी आहे. युरोपमधील मंडळींना मात्र गडद रंगाचे फर्निचर आवडते. आपल्याकडचा बांबू ओव्हनमध्ये ठराविक वेळेत, ठराविक अंशाच्या तापमानात ठेवला तर त्याला काळपट रंग येतो. शिवाय त्यापासून तयार करण्यात आलेले फर्निचर टिकाऊ होते. बांबूपासून बनवलेल्या फर्निचरची ३० वर्षे गॅरंटी दिली जात असल्याने फर्निचरला वाढती मागणी आहे.नेटिव्ह फोन बँक प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था शेतकरीनिष्ठ कामे करीत आहे. या संस्थेतर्फे बांबूची रोपे शेतकऱ्यांना मोफत वितरीत केली जातात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे, असे तो म्हणाला.