शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसवरील टीकेचा पश्चात्ताप; भाजपा म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा- आमदार भास्कर जाधव बरसले!

By मनोज मुळ्ये | Updated: January 21, 2024 14:18 IST

सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांना भेटण्यासाठी आमदार जाधव रत्नागिरीत आले होते

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात टीका करत राहिलो. त्याबद्दल आता पश्चात्ताप होतोय. कारण त्यांनी कधीही विरोधक म्हणून आमच्यावर कारवाया केल्या नाहीत. मात्र ज्यांच्यासोबत आम्ही पूर्वी होतो, ती भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर विविध यंत्रणांचा वापर करुन आमची चौकशी लावत आहे. याचसाठी आम्ही भाजपा वाढवली का, असा प्रश्न करत आमदार भास्कर जाधव यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी म्हण सांगत भाजपावर कडाडून टीका केली. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांना भेटण्यासाठी आमदार जाधव रत्नागिरीत आले होते. सत्तेच्या माजाला लोकच उत्तर देतील. जनता सगळे पाहत आहे. लोकच त्यांना उत्तर देतील, असेही आमदार जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमचा जो छळ केला जात आहे, तो लोकांनाही कळत आहे. त्यामुळे लोकच त्यांना उत्तर देतील आणि त्यात आम्ही समाधान मानू, असेही ते म्हणाले.

आमदार राजन साळवी आणि त्यांच्या भावाने चरितार्थासाठी उद्योग, व्यवसाय करुच नये का? इतकी वर्षे ते व्यवसायात आहेतच. ही लोकशाही आहे ना? मग अशा पद्धतीने कारवाई कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला. राष्ट्रवादीतून सत्तेत गेलेल्या लोकांपैकी अनेकांना ईडी, लाचलुचपत, आयकर अशा वेगवेगळ्या यंत्रणांकडून नोटीस गेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या अनेक आमदारांना अशा नोटीस आधी गेल्या आहेत. आता ते तिकडे (भाजपासोबत) गेल्यानंतर त्याचे काय झाले? रक्षाबंधन झाले का? त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केलेला दहशतीचा आरोप खरा आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांमध्येही हेच सुरू आहे, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.

उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्याला भाजपाकडून विरोध केला जात आहे. त्याबाबत बोलतानाही त्यांनी भाजपावर टीकेचे आसूड ओढले. कोण आहे ही भाजपा? उद्धव ठाकरे येऊन गेल्यानंतर मंदिरात गोमुत्र शिंपडण्याची भाषा त्यांच्या एका आमदाराने केली आहे. ज्यांची बुद्धीच गोमुत्रापुरेशीच आहे, त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. त्यांनी गोमुत्र शिंपडण्यापेक्षा गोमुत्र प्यावे, असेही ते म्हणाले. अयोध्येतील राममंदिर सर्वोच्च न्यायालय. राम मंदिर न्यासामुळे होत आहे. पण काही पक्षांना असे वाटत आहे की आपण प्रभू रामचंद्रांच्या नावाने राजकारण करु. पण ते शक्य होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

... तर माझा पक्ष सरकारसोबत

मनोज जरांगेपाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना आमदार जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. त्यासाठी मराठा बांधवांना मुंबईत येऊन आंदोलन करण्याची वेळ येऊच देऊ नये. असा निर्णय सरकार घेणार असेल, तर माझा पक्ष सरकारसोबत असेल.

समाजविरुद्ध समाज लढवायचा आहे का?

केंद्र सरकारने इडब्ल्यूएसमधून १० टक्के आरक्षण वाढवले तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकतो. मात्र केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायचा आहे, असे वाटत नाही. त्यांना फक्त समाजविरुद्ध समाज लढवायचा आहे की काय? सरकारच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे, अशी टीकाही त्यांनी त्यांनी केली.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवcongressकाँग्रेस