शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

काँग्रेसवरील टीकेचा पश्चात्ताप; भाजपा म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा- आमदार भास्कर जाधव बरसले!

By मनोज मुळ्ये | Updated: January 21, 2024 14:18 IST

सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांना भेटण्यासाठी आमदार जाधव रत्नागिरीत आले होते

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात टीका करत राहिलो. त्याबद्दल आता पश्चात्ताप होतोय. कारण त्यांनी कधीही विरोधक म्हणून आमच्यावर कारवाया केल्या नाहीत. मात्र ज्यांच्यासोबत आम्ही पूर्वी होतो, ती भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर विविध यंत्रणांचा वापर करुन आमची चौकशी लावत आहे. याचसाठी आम्ही भाजपा वाढवली का, असा प्रश्न करत आमदार भास्कर जाधव यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी म्हण सांगत भाजपावर कडाडून टीका केली. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांना भेटण्यासाठी आमदार जाधव रत्नागिरीत आले होते. सत्तेच्या माजाला लोकच उत्तर देतील. जनता सगळे पाहत आहे. लोकच त्यांना उत्तर देतील, असेही आमदार जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमचा जो छळ केला जात आहे, तो लोकांनाही कळत आहे. त्यामुळे लोकच त्यांना उत्तर देतील आणि त्यात आम्ही समाधान मानू, असेही ते म्हणाले.

आमदार राजन साळवी आणि त्यांच्या भावाने चरितार्थासाठी उद्योग, व्यवसाय करुच नये का? इतकी वर्षे ते व्यवसायात आहेतच. ही लोकशाही आहे ना? मग अशा पद्धतीने कारवाई कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला. राष्ट्रवादीतून सत्तेत गेलेल्या लोकांपैकी अनेकांना ईडी, लाचलुचपत, आयकर अशा वेगवेगळ्या यंत्रणांकडून नोटीस गेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या अनेक आमदारांना अशा नोटीस आधी गेल्या आहेत. आता ते तिकडे (भाजपासोबत) गेल्यानंतर त्याचे काय झाले? रक्षाबंधन झाले का? त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केलेला दहशतीचा आरोप खरा आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांमध्येही हेच सुरू आहे, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.

उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्याला भाजपाकडून विरोध केला जात आहे. त्याबाबत बोलतानाही त्यांनी भाजपावर टीकेचे आसूड ओढले. कोण आहे ही भाजपा? उद्धव ठाकरे येऊन गेल्यानंतर मंदिरात गोमुत्र शिंपडण्याची भाषा त्यांच्या एका आमदाराने केली आहे. ज्यांची बुद्धीच गोमुत्रापुरेशीच आहे, त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. त्यांनी गोमुत्र शिंपडण्यापेक्षा गोमुत्र प्यावे, असेही ते म्हणाले. अयोध्येतील राममंदिर सर्वोच्च न्यायालय. राम मंदिर न्यासामुळे होत आहे. पण काही पक्षांना असे वाटत आहे की आपण प्रभू रामचंद्रांच्या नावाने राजकारण करु. पण ते शक्य होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

... तर माझा पक्ष सरकारसोबत

मनोज जरांगेपाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना आमदार जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. त्यासाठी मराठा बांधवांना मुंबईत येऊन आंदोलन करण्याची वेळ येऊच देऊ नये. असा निर्णय सरकार घेणार असेल, तर माझा पक्ष सरकारसोबत असेल.

समाजविरुद्ध समाज लढवायचा आहे का?

केंद्र सरकारने इडब्ल्यूएसमधून १० टक्के आरक्षण वाढवले तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकतो. मात्र केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायचा आहे, असे वाटत नाही. त्यांना फक्त समाजविरुद्ध समाज लढवायचा आहे की काय? सरकारच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे, अशी टीकाही त्यांनी त्यांनी केली.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवcongressकाँग्रेस