शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

तब्बल ८८ वर्ष जपलीय गांधीजींची ‘ती’ आठवण

By admin | Updated: February 28, 2015 23:43 IST

करंडकाला उद्या ८८ वर्षे पूर्ण

शोभना कांबळे / रत्नागिरी राष्ट्रपिता महात्मा गांधी रत्नागिरीत आले असताना त्यांचे येथील लोकल बोर्डाने चंदनाचा हार व मानपत्राने गौरव करून त्यांचे स्वागत केले. या मानपत्राचा करंडक आजही येथील थरवळ कुटुंबाच्या पाचव्या पिढीपर्यंत जतन करण्यात आला आहे. या करंडकाला उद्या १ मार्च रोजी ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधी रत्नागिरीतील तेव्हाचे प्रसिद्ध वकील व्ही. डी. जोशी यांच्या खालची आळी येथील भागिरथी निवासात उतरले होते. अर्थात गांधीजींना पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची प्रचंड गर्दी झाली होती. दुसऱ्या दिवशी १ मार्च १९२७ रोजी शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा लोकल बोर्डाच्यावतीने त्यांचा चंदनाच्या हाराने आणि चांदीच्या करंडकातून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या करंडकावर ‘महात्मा गांधीजींस - रत्ननगरीत त्यांचे शुभगमनप्रसंगी रत्नागिरी लोकल बोर्डाकडून सादर अर्पण १ मार्च १९२७ असा मजकूर लिहिलेला व चरख्याचे चित्र रेखाटलेले होते. त्याकाळी मानसन्मान केलेल्या वस्तुंचा लागलीच लिलाव करून गोळा झालेला निधी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वापरण्यात येत असे. यानुसार महात्मा गांधीजींच्या या चंदनीहाराचा, मानपत्र व करंडकाचा त्याच जागेवर लिलाव झाला. त्या काळचे रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपत थरवळ यांनी हा सन्मान ५०० रूपयाला विकत घेतला. हे सर्व पैसे स्वातंत्र्यलढ्याला देण्यात आले. उद्या १ मार्च रोजी या घटनेला ८८ वर्षे पुर्ण होत आहेत. या भेटीपासून गणपत थरवळ आणि त्यांचे दोन मुलगे मुकुंद व विश्वनाथ थरवळ देशभक्तीने भारावलेले होते. विश्वनाथ तर या सोहळ्याचे साक्षीदार होते. तर मुकुंदराव यांनी रत्नागिरीतील मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यांचे द्वितीय पुत्र सुभाष थरवळ यांच्याकडे सध्या हा करंडक जतन केलेला आहे. (प्रतिनिधी)