शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

तब्बल ८८ वर्ष जपलीय गांधीजींची ‘ती’ आठवण

By admin | Updated: February 28, 2015 23:43 IST

करंडकाला उद्या ८८ वर्षे पूर्ण

शोभना कांबळे / रत्नागिरी राष्ट्रपिता महात्मा गांधी रत्नागिरीत आले असताना त्यांचे येथील लोकल बोर्डाने चंदनाचा हार व मानपत्राने गौरव करून त्यांचे स्वागत केले. या मानपत्राचा करंडक आजही येथील थरवळ कुटुंबाच्या पाचव्या पिढीपर्यंत जतन करण्यात आला आहे. या करंडकाला उद्या १ मार्च रोजी ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधी रत्नागिरीतील तेव्हाचे प्रसिद्ध वकील व्ही. डी. जोशी यांच्या खालची आळी येथील भागिरथी निवासात उतरले होते. अर्थात गांधीजींना पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची प्रचंड गर्दी झाली होती. दुसऱ्या दिवशी १ मार्च १९२७ रोजी शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा लोकल बोर्डाच्यावतीने त्यांचा चंदनाच्या हाराने आणि चांदीच्या करंडकातून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या करंडकावर ‘महात्मा गांधीजींस - रत्ननगरीत त्यांचे शुभगमनप्रसंगी रत्नागिरी लोकल बोर्डाकडून सादर अर्पण १ मार्च १९२७ असा मजकूर लिहिलेला व चरख्याचे चित्र रेखाटलेले होते. त्याकाळी मानसन्मान केलेल्या वस्तुंचा लागलीच लिलाव करून गोळा झालेला निधी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वापरण्यात येत असे. यानुसार महात्मा गांधीजींच्या या चंदनीहाराचा, मानपत्र व करंडकाचा त्याच जागेवर लिलाव झाला. त्या काळचे रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपत थरवळ यांनी हा सन्मान ५०० रूपयाला विकत घेतला. हे सर्व पैसे स्वातंत्र्यलढ्याला देण्यात आले. उद्या १ मार्च रोजी या घटनेला ८८ वर्षे पुर्ण होत आहेत. या भेटीपासून गणपत थरवळ आणि त्यांचे दोन मुलगे मुकुंद व विश्वनाथ थरवळ देशभक्तीने भारावलेले होते. विश्वनाथ तर या सोहळ्याचे साक्षीदार होते. तर मुकुंदराव यांनी रत्नागिरीतील मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यांचे द्वितीय पुत्र सुभाष थरवळ यांच्याकडे सध्या हा करंडक जतन केलेला आहे. (प्रतिनिधी)