शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

योग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात  हॅट्ट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:05 PM

Garbage Disposal Issue Ratnagiri-रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देयोग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात  हॅट्ट्रीकओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, शहरातील १५ प्रभागांमधून कचरा संकलन

मेहरून नाकाडेरत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.शहरातील १५ प्रभागांतून कचरा संकलन करण्यात येते. दररोज २२ टन कचरा संकलन होत असतो. नागरिकांना कचरा संकलनासाठी दोन वेगवेगळ्या डस्टबीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनादेखील ओला व सुका कचरा वर्गीकरणाची सवय लागली आहे. शहरातील कचराकुंड्याही उचलण्यात आल्या असून, नगर परिषदेचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलत आहेत, शिवाय रस्त्यांवरील साफसफाईही नियमित केली जात असल्याने स्वच्छता राखली जात आहे.ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरणशहरातील १५ प्रभागांतून सकाळी सात ते दुपारी ३ वाजेपर्यंत २० घंटागाड्यांच्या माध्यमातून २२ टन कचऱ्याचे संकलन करण्यात येते. कचरा संकलन करतानाच ओला व सुका अशा दोन प्रकारांतच नागरिकांकडून घेण्यात येत असल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे होते. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येते, तर सुका कचरा वेगळा करून त्यातील प्लास्टिक बाजूला करून ते पुनर्वापरासाठी कंपनीकडे पाठविण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतकरी बागायतींसाठी विकत घेतात.जीपीएस यंत्रणाकचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असल्याने घंटागाड्या नियमित कचरा संकलन करतात की नाही, यावर लक्ष ठेवणे सोपे होते. एखाद्या प्रभागात घंटागाडी कचरा संकलनासाठी गेली अथवा नाही, हे जीपीएस प्रणालीद्वारे लगेच निदर्शनाला येते. त्यामुळे नागरिकांची तक्रार आल्यास निवारण करणे सोपे होते.शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत कचरा संकलन पूर्ण केले जाते. जीपीएस प्रणालीमुळे कचरा संकलन वेळेवर व नियमित होत आहे की नाही, याची माहिती मिळणे सोपे होत आहे. सुयोग्य व्यवस्थापनामुळेच सलग तीनवेळा स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.- अविनाश भोईर, अभियंता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद