शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

योग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात  हॅट्ट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:07 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri-रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देयोग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात  हॅट्ट्रीकओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, शहरातील १५ प्रभागांमधून कचरा संकलन

मेहरून नाकाडेरत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.शहरातील १५ प्रभागांतून कचरा संकलन करण्यात येते. दररोज २२ टन कचरा संकलन होत असतो. नागरिकांना कचरा संकलनासाठी दोन वेगवेगळ्या डस्टबीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनादेखील ओला व सुका कचरा वर्गीकरणाची सवय लागली आहे. शहरातील कचराकुंड्याही उचलण्यात आल्या असून, नगर परिषदेचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलत आहेत, शिवाय रस्त्यांवरील साफसफाईही नियमित केली जात असल्याने स्वच्छता राखली जात आहे.ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरणशहरातील १५ प्रभागांतून सकाळी सात ते दुपारी ३ वाजेपर्यंत २० घंटागाड्यांच्या माध्यमातून २२ टन कचऱ्याचे संकलन करण्यात येते. कचरा संकलन करतानाच ओला व सुका अशा दोन प्रकारांतच नागरिकांकडून घेण्यात येत असल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे होते. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येते, तर सुका कचरा वेगळा करून त्यातील प्लास्टिक बाजूला करून ते पुनर्वापरासाठी कंपनीकडे पाठविण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतकरी बागायतींसाठी विकत घेतात.जीपीएस यंत्रणाकचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असल्याने घंटागाड्या नियमित कचरा संकलन करतात की नाही, यावर लक्ष ठेवणे सोपे होते. एखाद्या प्रभागात घंटागाडी कचरा संकलनासाठी गेली अथवा नाही, हे जीपीएस प्रणालीद्वारे लगेच निदर्शनाला येते. त्यामुळे नागरिकांची तक्रार आल्यास निवारण करणे सोपे होते.शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत कचरा संकलन पूर्ण केले जाते. जीपीएस प्रणालीमुळे कचरा संकलन वेळेवर व नियमित होत आहे की नाही, याची माहिती मिळणे सोपे होत आहे. सुयोग्य व्यवस्थापनामुळेच सलग तीनवेळा स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.- अविनाश भोईर, अभियंता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद