शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

योग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात  हॅट्ट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:07 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri-रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देयोग्य नियोजनामुळे रत्नागिरीतील कचरा संकलन नियमित, स्वच्छ भारत सर्वेक्षणात  हॅट्ट्रीकओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, शहरातील १५ प्रभागांमधून कचरा संकलन

मेहरून नाकाडेरत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ओला व सुका वर्गीकरण करूनच कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता राखली जात असून, केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग तीन वर्षे नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.शहरातील १५ प्रभागांतून कचरा संकलन करण्यात येते. दररोज २२ टन कचरा संकलन होत असतो. नागरिकांना कचरा संकलनासाठी दोन वेगवेगळ्या डस्टबीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनादेखील ओला व सुका कचरा वर्गीकरणाची सवय लागली आहे. शहरातील कचराकुंड्याही उचलण्यात आल्या असून, नगर परिषदेचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलत आहेत, शिवाय रस्त्यांवरील साफसफाईही नियमित केली जात असल्याने स्वच्छता राखली जात आहे.ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरणशहरातील १५ प्रभागांतून सकाळी सात ते दुपारी ३ वाजेपर्यंत २० घंटागाड्यांच्या माध्यमातून २२ टन कचऱ्याचे संकलन करण्यात येते. कचरा संकलन करतानाच ओला व सुका अशा दोन प्रकारांतच नागरिकांकडून घेण्यात येत असल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे होते. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येते, तर सुका कचरा वेगळा करून त्यातील प्लास्टिक बाजूला करून ते पुनर्वापरासाठी कंपनीकडे पाठविण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतकरी बागायतींसाठी विकत घेतात.जीपीएस यंत्रणाकचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असल्याने घंटागाड्या नियमित कचरा संकलन करतात की नाही, यावर लक्ष ठेवणे सोपे होते. एखाद्या प्रभागात घंटागाडी कचरा संकलनासाठी गेली अथवा नाही, हे जीपीएस प्रणालीद्वारे लगेच निदर्शनाला येते. त्यामुळे नागरिकांची तक्रार आल्यास निवारण करणे सोपे होते.शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत कचरा संकलन पूर्ण केले जाते. जीपीएस प्रणालीमुळे कचरा संकलन वेळेवर व नियमित होत आहे की नाही, याची माहिती मिळणे सोपे होत आहे. सुयोग्य व्यवस्थापनामुळेच सलग तीनवेळा स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.- अविनाश भोईर, अभियंता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद