शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

कचऱ्याच्या धुरात जलशुुध्दिकरण !

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

रत्नागिरी नगरपरिषद : धुरामधील कचऱ्यातच पाणी स्वच्छ करण्याचा उपद्व्याप

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी योजनेसाठी साळवी स्टॉप येथे उभारलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातच कचऱ्याच्या ढीगांना आग लावून देण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे शहरातील ९० टक्के भागासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण हे कचऱ्याच्या धुरामध्येच होत असून, याच पाण्याचा शहरातील नागरिकांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे हे पाणी खरोखरच शुध्द स्वरुपात लोकांना मिळते का, असा प्रश्न आता शहरवासीयांमध्येच निर्माण झाला आहे. साळवी स्टॉप येथील प्रकल्पात शीळ धरणातून येणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते. मात्र, येथील जलशुध्दिकरण टाकीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. कचऱ्याचे ढीग तयार झाल्याने या भागाला उकिरड्याचे रुप आले आहे. या सुक्या व ओल्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये पाळीव जनावरांचा सततचा धुमाकूळ असतो. त्याशिवाय कावळे व बगळे यांचे प्रमाणही या उकिरड्यावर अधिक आहे. कुत्र्यांचे तर या भागात पीक आले आहे. कावळे व अन्य पक्षी येथील मरून पडणाऱ्या उंदिर, घुशी उचलून नेतात व शेजारीच असलेल्या पाणी टाकीच्या कठड्यावर बसतात, असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे कचरा, घाण टाकीत जाण्याची शक्यता नेहमीच असते. परिणामी पाण्यात घाण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घेण्यात आली आहे काय, असा सवाल नागरिकांतूून विचारला जात आहे. कचऱ्याचे ढीग दररोज पेटवले जात असल्याने जलशुध्दिकरणचा परिसर गडद धुराने भरून जातो. तसेच कचरा पेटताना त्यातील काही भाग जळून हवेत तरंगत राहतो, पाण्याच्या टाकीतही हा जळालेला कचऱ्याचा भाग पडतो. त्यामुुळे रत्नागिरीकरांना खऱ्या अर्थाने पिण्याचे शुध्द पाणी मिळायला हवे असेल तर या ठिकाणी असलेल्या कचऱ्यासाठी नवीन जागा शोधणे आवश्यक आहे. तसेच येथील कचऱ्याचे ढीग पेटवण्यापेक्षा कचरा त्याच भागात पुरणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)घोषणांचा झालाय सुकाळ...दांडेआडोमपासून ते पालिकेच्या प्रत्येक प्रभागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा, नंतर अपार्टमेंटमध्ये कचऱ्याचे कंपोस्ट खत बनविणारी यंत्रणा बसविणे यांसारख्या अनेक घोषणा पाहता या घोषणांचा सुकाळ झाला आहे. प्रत्यक्षात कचऱ्याची समस्या अजूनही कायम आहे. यावर कधी आणि केव्हा उपाय योजना करणार असा प्रश्न आहे.