शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

कचऱ्याच्या धुरात जलशुुध्दिकरण !

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

रत्नागिरी नगरपरिषद : धुरामधील कचऱ्यातच पाणी स्वच्छ करण्याचा उपद्व्याप

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी योजनेसाठी साळवी स्टॉप येथे उभारलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातच कचऱ्याच्या ढीगांना आग लावून देण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे शहरातील ९० टक्के भागासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण हे कचऱ्याच्या धुरामध्येच होत असून, याच पाण्याचा शहरातील नागरिकांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे हे पाणी खरोखरच शुध्द स्वरुपात लोकांना मिळते का, असा प्रश्न आता शहरवासीयांमध्येच निर्माण झाला आहे. साळवी स्टॉप येथील प्रकल्पात शीळ धरणातून येणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते. मात्र, येथील जलशुध्दिकरण टाकीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. कचऱ्याचे ढीग तयार झाल्याने या भागाला उकिरड्याचे रुप आले आहे. या सुक्या व ओल्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये पाळीव जनावरांचा सततचा धुमाकूळ असतो. त्याशिवाय कावळे व बगळे यांचे प्रमाणही या उकिरड्यावर अधिक आहे. कुत्र्यांचे तर या भागात पीक आले आहे. कावळे व अन्य पक्षी येथील मरून पडणाऱ्या उंदिर, घुशी उचलून नेतात व शेजारीच असलेल्या पाणी टाकीच्या कठड्यावर बसतात, असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे कचरा, घाण टाकीत जाण्याची शक्यता नेहमीच असते. परिणामी पाण्यात घाण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घेण्यात आली आहे काय, असा सवाल नागरिकांतूून विचारला जात आहे. कचऱ्याचे ढीग दररोज पेटवले जात असल्याने जलशुध्दिकरणचा परिसर गडद धुराने भरून जातो. तसेच कचरा पेटताना त्यातील काही भाग जळून हवेत तरंगत राहतो, पाण्याच्या टाकीतही हा जळालेला कचऱ्याचा भाग पडतो. त्यामुुळे रत्नागिरीकरांना खऱ्या अर्थाने पिण्याचे शुध्द पाणी मिळायला हवे असेल तर या ठिकाणी असलेल्या कचऱ्यासाठी नवीन जागा शोधणे आवश्यक आहे. तसेच येथील कचऱ्याचे ढीग पेटवण्यापेक्षा कचरा त्याच भागात पुरणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)घोषणांचा झालाय सुकाळ...दांडेआडोमपासून ते पालिकेच्या प्रत्येक प्रभागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा, नंतर अपार्टमेंटमध्ये कचऱ्याचे कंपोस्ट खत बनविणारी यंत्रणा बसविणे यांसारख्या अनेक घोषणा पाहता या घोषणांचा सुकाळ झाला आहे. प्रत्यक्षात कचऱ्याची समस्या अजूनही कायम आहे. यावर कधी आणि केव्हा उपाय योजना करणार असा प्रश्न आहे.