शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या धुरात जलशुुध्दिकरण !

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

रत्नागिरी नगरपरिषद : धुरामधील कचऱ्यातच पाणी स्वच्छ करण्याचा उपद्व्याप

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी योजनेसाठी साळवी स्टॉप येथे उभारलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातच कचऱ्याच्या ढीगांना आग लावून देण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे शहरातील ९० टक्के भागासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण हे कचऱ्याच्या धुरामध्येच होत असून, याच पाण्याचा शहरातील नागरिकांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे हे पाणी खरोखरच शुध्द स्वरुपात लोकांना मिळते का, असा प्रश्न आता शहरवासीयांमध्येच निर्माण झाला आहे. साळवी स्टॉप येथील प्रकल्पात शीळ धरणातून येणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते. मात्र, येथील जलशुध्दिकरण टाकीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. कचऱ्याचे ढीग तयार झाल्याने या भागाला उकिरड्याचे रुप आले आहे. या सुक्या व ओल्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये पाळीव जनावरांचा सततचा धुमाकूळ असतो. त्याशिवाय कावळे व बगळे यांचे प्रमाणही या उकिरड्यावर अधिक आहे. कुत्र्यांचे तर या भागात पीक आले आहे. कावळे व अन्य पक्षी येथील मरून पडणाऱ्या उंदिर, घुशी उचलून नेतात व शेजारीच असलेल्या पाणी टाकीच्या कठड्यावर बसतात, असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे कचरा, घाण टाकीत जाण्याची शक्यता नेहमीच असते. परिणामी पाण्यात घाण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घेण्यात आली आहे काय, असा सवाल नागरिकांतूून विचारला जात आहे. कचऱ्याचे ढीग दररोज पेटवले जात असल्याने जलशुध्दिकरणचा परिसर गडद धुराने भरून जातो. तसेच कचरा पेटताना त्यातील काही भाग जळून हवेत तरंगत राहतो, पाण्याच्या टाकीतही हा जळालेला कचऱ्याचा भाग पडतो. त्यामुुळे रत्नागिरीकरांना खऱ्या अर्थाने पिण्याचे शुध्द पाणी मिळायला हवे असेल तर या ठिकाणी असलेल्या कचऱ्यासाठी नवीन जागा शोधणे आवश्यक आहे. तसेच येथील कचऱ्याचे ढीग पेटवण्यापेक्षा कचरा त्याच भागात पुरणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)घोषणांचा झालाय सुकाळ...दांडेआडोमपासून ते पालिकेच्या प्रत्येक प्रभागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा, नंतर अपार्टमेंटमध्ये कचऱ्याचे कंपोस्ट खत बनविणारी यंत्रणा बसविणे यांसारख्या अनेक घोषणा पाहता या घोषणांचा सुकाळ झाला आहे. प्रत्यक्षात कचऱ्याची समस्या अजूनही कायम आहे. यावर कधी आणि केव्हा उपाय योजना करणार असा प्रश्न आहे.