शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

बांधकाम खाते अधीक्षक अभियंत्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:37 IST

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोेळे रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावर जीवघेणे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या ...

ठळक मुद्देबांधकाम खाते अधीक्षक अभियंत्यांसमोर वाचला समस्यांचा पाढाधोकादायक रस्त्याला जबाबदार कोण?

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोेळे रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावर जीवघेणे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या रस्त्यातून पाण्यासाठी ३ मीटरची पाईपलाईन मध्यातून टाकल्याने हा रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न सोमवारी मिरजोळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेत विचारला. यावेळी उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेही उपस्थित होत्या. बांधकाम खात्याच्या या रस्त्यावर उत्खनन करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा पाढा यावेळी ग्रामस्थांनी वाचला.मिरजोळे रस्त्याची दुरवस्था आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यासाठी या ग्रामस्थांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी तसेच पाण्याच्या पाईपलाईनसाठी नगर परिषदेने केलेल्या खोदाईबाबत ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता नाईक यांची भेट घेत या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.मोबदला प्रकरणाची सर्व कागदपत्रे तपासण्याचे आदेश देत अधीक्षक अभियंता नाईक यांनी मंगळवारी रस्त्याची पाहणी करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी मिरजोळेचे सुरेंद्र पाटील, महेश पाटील, संजय नागवेकर, राहुल पवार, सुरज पाटील, हर्षराज पाटील तसेच समविचारी मंचचे संजय पुनसकर उपस्थित होते.नगर परिषदेला नोटीसया खराब रस्त्यामुळे जाणवणाऱ्या सर्व समस्या लक्षात घेत, अधीक्षक अभियंता नाईक यांनी मिरजोळे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नगर परिषदेला त्वरित नोटीस काढून ग्रामस्थांना धोकादायक ठरणार नाही, अशा पद्धतीने पाईपलाईनसाठी खोदकाम करावे, अशा सूचना छाया नाईक यांनी वाळके यांना दिल्या.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad transportरस्ते वाहतूकRatnagiriरत्नागिरी