शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

रत्नागिरीकर आहेत पक्के चहाबाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:36 IST

Tea Food Ratnagiri- दिवसाची सुरूवात असो, प्रमोशनचा आनंद असो, नव्या खरेदीचे सेलिब्रेशन असो किंवा अगदी कंटाळा असो या प्रत्येक गोष्टीत कॉमन गोष्ट एकच असते, ती म्हणजे चहा. दिवस सुरू करण्यापासून झोपेपर्यंत कुठल्याही वेळी चालू शकणारी गोष्ट म्हणजे चहा.

ठळक मुद्देरत्नागिरीकर आहेत पक्के चहाबाज दरमहा स्पेशल चहाला येते १५ लाखांची उकळी

अरुण आडिवरेकररत्नागिरी : दिवसाची सुरूवात असो, प्रमोशनचा आनंद असो, नव्या खरेदीचे सेलिब्रेशन असो किंवा अगदी कंटाळा असो या प्रत्येक गोष्टीत कॉमन गोष्ट एकच असते, ती म्हणजे चहा. दिवस सुरू करण्यापासून झोपेपर्यंत कुठल्याही वेळी चालू शकणारी गोष्ट म्हणजे चहा.थंडीने हात कुडकुडत असताना वाफाळता कप हातात धरताना, मुसळधार पाऊस पडत असताना मित्रांसोबत टपरीवर कटींग पिताना येणारी मजा औरच. रत्नागिरी शहरालाही चहाचे हे कौतुक आहेच. म्हणून तर फक्त चहाची स्पेशल ठिकाणे रत्नागिरीत ठाण मांडू शकली आहेत.

रत्नागिरी शहरात हॉटेल आणि वडापावच्या टपऱ्यांवर होणारी चहाची विक्री कितीतरी मोठी आहेच, पण या स्पेशल चहावाल्यांकडे दररोज ५,१७०हून अधिक कप चहा संपतो. यानुसार फक्त स्पेशल चहातूनच रत्नागिरीत जवळपास साडेपंधरा लाखांची उलाढाल होते.गेल्या वर्ष-दीड वर्षात रत्नागिरीच्या बाजारापासून ते अगदी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर तब्बल २० ठिकाणी असा स्पेशल चहा मिळतो.

पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात मिळणारा वेगवेगळ्या चवीचा चहा आता रत्नागिरीतही मिळू लागला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर या भागातून विशेष मसाले मागवून हा चहा तयार होतो. रत्नागिरीत सुरू झालेल्या चहाच्या नव्या दालनांमध्ये मिळणाऱ्या चहाची चव मात्र वेगवेगळीच आहे. लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या या व्यवसायाने अनेकांच्या हाताला रोजगारही मिळून दिला आहे.स्वस्त आणि झटपटकमी खर्चात उपलब्ध होणारा व्यवसाय म्हणजे चहा. स्वस्तात झटपटपणे चहाची उपलब्धता करता येते. बाजारात चहाप्रेमींची संख्या कमी नाही, त्यामुळे चहाची दुकानेही वाढू लागली आहेत. कमी मनुष्यबळातही हा व्यवसाय करता येत असल्याने या व्यवसायाकडे अनेकजण वळले आहेत.

टॅग्स :foodअन्नRatnagiriरत्नागिरी