शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रत्नागिरीकरांनी पाहिले खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था

By मेहरून नाकाडे | Updated: October 25, 2022 18:19 IST

एक तास १४ मिनिटे १६ सेकंद एवढा ग्रहणाचा कालावधी

रत्नागिरी : खंडग्रास सूर्यग्रहण मंगळवारी होते. ग्रहण थेट डोळ्यांनी पाहणे अयोग्य असल्याने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यासकेंद्रातर्फे भाट्ये झरी विनायक येथे ग्रहण पाहण्यासाठी खास व्यवस्था उपलब्ध केली होती. शहरातील १५० नागरिकांनी खंडग्रास सूर्यगहण पाहण्याचा आनंद घेतला.सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झाला. एक तास १४ मिनिटे १६ सेकंद एवढा ग्रहणाचा कालावधी होता. ग्रहण सुरू होताच हळूहळू सूर्यबिंबाची तेजस्विता कमी झाली. ३६ टक्के सूर्याचा भाग झाकोळला गेला. त्यामुळे नेहमीएवढा सूर्याचा प्रकाश जाणवला नाही. दिवसा काही प्रमाणात अंधार जाणवत होता. सायंकाळी ६.३१ वाजता सूर्यास्त झाल्याने ग्रहण दिसले नाही. ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी खास फिल्टर लावून फोटो घेतले.ग्रहण काळात काही खाऊ नये, पिऊ नये, असे सांगितले जाते मात्र भाट्ये किनाऱ्यावरील फूड स्टाॅलवर खवय्यांची चांगलीच गर्दी होती. त्यामुळे ग्रहणाविषयी तर्क फोल असून वैज्ञानिक दृष्ट्या ग्रहण पाहण्यासाठी माहिती घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.महाविद्यालयाच्या खगोल अभ्यासकेंद्राचे डाॅ.बी. डी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार ठाकूर देसाई, वर्षा काळे, प्रणव चव्हाण,श्रेयस बाचरे, सम्यक हातखंबकर या विद्यार्थ्यांनी ग्रहण कसे पाहावे, यासाठी व्यवस्था नागरिकांसाठी केली होती. डोळ्यांनी थेट पाहणे अयोग्य असल्याने ग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था केली होती. खगोल अभ्यास केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsolar eclipseसूर्यग्रहण