शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सात जागा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:32 IST

लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गटगणांची पुनर्रचना होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५५ ऐवजी ६२ गट होणार आहेत तर पंचायत समितीच्या ११० गणांऐवजी १२४ गण होणार आहेत.

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या जागा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीजिल्हा परिषदेत सात गट आणि पंचायत समित्यांचे १४ वाढणार आहेत.

याआधी जिल्हा परिषदेचे ५७ सदस्य होते. प्रत्येक गटाच्या लोकसंख्येच्या निकषात बदल झाल्यानंतर ही संख्या २ने कमी झाली आणि ५५ गट झाले. आता पुन्हा एकदा लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गटगणांची पुनर्रचना होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५५ ऐवजी ६२ गट होणार आहेत तर पंचायत समितीच्या ११० गणांऐवजी १२४ गण होणार आहेत.

सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ इतकी आहे. यामध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जागा ५५वरून ६२ होतील.

सद्यस्थितीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे, तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मुळात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे आणि त्यातही जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद