शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रत्नागिरी : यावर्षी हापूसचा हंगाम लांबणार, मोहोराचे प्रमाण अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:00 IST

दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.

ठळक मुद्देयावर्षी हापूसचा हंगाम लांबणारमोहोराचे प्रमाण अत्यल्प

रत्नागिरी : दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.वास्तविक आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीस सुरूवात होते. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. शिवाय गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे.

यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाला मात्र श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झालेला पाऊस नवरात्रातच लागला. त्यामुळे यावर्षी पालवीचे प्रमाण अधिक आहे. किनारपट्टीलगत बागायतीमध्ये मोहोराला प्रारंभ झाला असला तरी प्रमाण अत्यल्प आहे.वास्तविक तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हवेत गारवा निर्माण होणे आवश्यक आहे. १६ अंश सेल्सियस पर्यत तापमान खाली आल्यावर मोहोर सुरू होतो. गेले दोन ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने ढगाळ वातावरण आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर्तीपासून थंडी सुरू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तद्नंतर फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिलपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मोहोर चांगला येवून फळधारणेचे प्रमाण कमी होते. सुरूवातीला पिक कमी होते मात्र मे मध्ये एकाचवेळी आंबा बाजारात आल्याने दर कोसळले होते.यावर्षी पावसाचे सरासरीपेक्षा प्रमाण कमी राहिले असतानाही झाडांना पालवीचे प्रमाण अधिक आहे. हवामानावर आधारित आंबा, काजू पिकासाठी फळपिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अवेळचा पाऊस, अवेळची थंडी, उच्चत्तम तापमान यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंबा पिक विमा योजना सुरू केली. प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू आहे. परंतु या योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यामध्ये विमा योजनेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय यावर्षी अदयापही त्याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे योजनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिले असून मोठ्या प्रमाणावरील पालवीमुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांनी कल्टारचा वापर देखील फारसा केलेला नाही. दिवाळीपासून थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होईल. शेतकऱ्यांकडून पालवीवर तुडतुडा प्रतिबंधात्मक किटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या फळपिक विमा योजनेचा परतावा अद्याप शेतकऱ्यांना प्राप्त झालेला नाही. गतवर्षी आॅगस्टमध्ये परतावा जाहीर करीत परतावा रक्कम वितरण सुरू झाले होते. त्यामुळे परताव्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.- एम.एम गुरव,शेतकरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी