शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रत्नागिरी : यावर्षी हापूसचा हंगाम लांबणार, मोहोराचे प्रमाण अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:00 IST

दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.

ठळक मुद्देयावर्षी हापूसचा हंगाम लांबणारमोहोराचे प्रमाण अत्यल्प

रत्नागिरी : दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.वास्तविक आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीस सुरूवात होते. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. शिवाय गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे.

यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाला मात्र श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झालेला पाऊस नवरात्रातच लागला. त्यामुळे यावर्षी पालवीचे प्रमाण अधिक आहे. किनारपट्टीलगत बागायतीमध्ये मोहोराला प्रारंभ झाला असला तरी प्रमाण अत्यल्प आहे.वास्तविक तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हवेत गारवा निर्माण होणे आवश्यक आहे. १६ अंश सेल्सियस पर्यत तापमान खाली आल्यावर मोहोर सुरू होतो. गेले दोन ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने ढगाळ वातावरण आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर्तीपासून थंडी सुरू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तद्नंतर फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिलपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मोहोर चांगला येवून फळधारणेचे प्रमाण कमी होते. सुरूवातीला पिक कमी होते मात्र मे मध्ये एकाचवेळी आंबा बाजारात आल्याने दर कोसळले होते.यावर्षी पावसाचे सरासरीपेक्षा प्रमाण कमी राहिले असतानाही झाडांना पालवीचे प्रमाण अधिक आहे. हवामानावर आधारित आंबा, काजू पिकासाठी फळपिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अवेळचा पाऊस, अवेळची थंडी, उच्चत्तम तापमान यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंबा पिक विमा योजना सुरू केली. प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू आहे. परंतु या योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यामध्ये विमा योजनेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय यावर्षी अदयापही त्याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे योजनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिले असून मोठ्या प्रमाणावरील पालवीमुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांनी कल्टारचा वापर देखील फारसा केलेला नाही. दिवाळीपासून थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होईल. शेतकऱ्यांकडून पालवीवर तुडतुडा प्रतिबंधात्मक किटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या फळपिक विमा योजनेचा परतावा अद्याप शेतकऱ्यांना प्राप्त झालेला नाही. गतवर्षी आॅगस्टमध्ये परतावा जाहीर करीत परतावा रक्कम वितरण सुरू झाले होते. त्यामुळे परताव्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.- एम.एम गुरव,शेतकरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी