शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले, पार्क की गवताचे कुरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:34 IST

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बांधण्यात येणाऱ्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले असून, या कामाची पार दुरवस्था झाली आहे. या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या ठिकाणी उद्यान होणार आहे की गवताचे कुरण, असा सवाल केला जात आहे.

ठळक मुद्दे- कामाकडे दुर्लक्ष झाल्याने आश्वासन कागदोपत्रीचज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नानी पार्क- निधी मिळाल्यानंतर दोन वर्ष झाली तरी काम थांबलेलेच- नाविन्यपूर्ण योजनेखाली ४८ लाख रूपयांचा निधी मंजूर जिल्हा नियोजन समितीकडून निधी नगर परिषदेकडे वर्गज्येष्ठ नागरिक संघासाठी सभागृहाचेही नियोजन.

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बांधण्यात येणाऱ्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले असून, या कामाची पार दुरवस्था झाली आहे. या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या ठिकाणी उद्यान होणार आहे की गवताचे कुरण, असा सवाल केला जात आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नानी पार्क व ज्येष्ठ नागरिक संघाला सभागृह यासाठी नाविन्यपूर्ण योजनेखाली २०१३ - १४मध्ये ४८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे.

नागरिक संघाच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा ११ फेब्रुवारी २०१६ रोजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तसेच माजी राज्यमंत्री, आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानंतर हे सभागृह ज्येष्ठ नागरिक संघाकडे हस्तांतरीत करण्यात आले.

सभागृहाचे हस्तांतरण झाल्यास पावणेदोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, या सभागृहाच्या शेजारी प्रस्तावित असलेल्या नाना - नानी पार्कचे काम त्यानंतर आत्तापर्यंत थांबवण्यात आलेले आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय या जागेत सुरळीत सुरू आहे. मात्र, नाना - नानी पार्कच्या कामाचा विसर नगर परिषदेला पडलेला दिसत आहे.या नाना - नानी पार्कची दुरवस्था झाली असून, या भागात गवताचे साम्राज्य माजले आहे. या दोन्ही कामांसाठी नगर परिषदेकडे आधीच निधी देण्यात आलेला असतानाही दोन वर्ष होत आली तरीही हे काम का थांबविण्यात आले, असा सवाल करण्यात येत आहे.

याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सुभाष थरवळ यांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीसोबत या कामाची सद्यस्थिती दर्शवणारा अहवाल छायाचित्रासह सादर केला आहे. त्यामुळे नाना-नानी पार्कचे काम मार्गी लागेल, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.काम मार्गी लागणार?नाना-नानी पार्कसाठी ४८ लाख रूपयांचा निधी नगर परिषदेकडे आधीच वर्ग करण्यात आला आहे. मात्र, तरीही या कामाची दुरवस्था झाली आहे. हे काम पूर्णत: थांबलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हे काम का थांबलेले आहे, याची चौकशी करावी, त्याचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

हे काम विनाविलंब पूर्ण करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक यांनी रत्नागिरी नगर परिषदेला पाठविले आहे. त्यामुळे आता हे काम मार्गी लागण्याची आशा ज्येष्ठ नागरिकांना आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार