शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
2
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
3
"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच!
4
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
5
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
6
अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 
7
158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त...
8
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
9
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
10
Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका
11
बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण?
12
दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...
13
Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक
14
"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट
15
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
16
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
17
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
18
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
19
Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!
20
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी

रत्नागिरी : शिवकालीन भुयारे नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 14:15 IST

लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी : शिवकालीन भुयारे नामशेष होण्याच्या मार्गावरलांजा तालुक्यातील प्रभानवल्लीत एकसारखी दिसणारी तीन भुयारे

अरुण आडिवरेकररत्नागिरी : लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे.

प्रभानवल्ली गावात आढळलेल्या ऐतिहासिक तीन भुयारांचा त्यात समावेश आहे. या गूढ भुयारांवर कोरण्यात आलेली शिलालेखावरील भाषा ही अरब भाषेशी साधर्म्य सांगणारी आहे. या शिलालेखाचा अर्थ अद्याप कोणालाही कळलेला नाही. या शिलालेखाचा अर्थ कळल्यास भुयाराच्या अंतर्गत भागातील माहितीचा खजिना उलगडू शकतो, अशी शक्यता आहे.तालुक्याच्या पूर्व भागात व सह्याद्रीच्या कडेकपारीत अतिशय दुर्गम भागात प्रभानवल्ली हे गाव वसलेले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा गाव व परिसर एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाने दणाणून जात असे. या प्रभानवल्ली गावात फेरफटका मारल्यानंतर इतिहासाच्या खुणा जागोजागी आढळतात. त्यापैकीच एक असलेली म्हणजे या ठिकाणी आढळणारी गूढ अशी भुयारे होय.मुचकुंदी नदीच्या काठाशी तीन भुयारे आढळतात. तीनही भुयारे प्रभानवल्लीतील गूढ भुयारे आहेत. ही भुयारे काळ्या दगडाने व एकसारख्या रूपात बांधलेली आहेत. यातील डावीकडील दोन भुयारांवर दोन वेगवेगळे शिलालेख कोरण्यात आलेले आहेत.

भुयारांचे प्रवेशद्वार ४ ते ५ फूट रूंद आहे. आतील व्यास प्रवेशद्वाराएवढाच मोठा आहे. ५ ते ६ व्यक्ती सहज बसू शकतील एवढे हे भुयार आहे. या भुयारांचा नेमका मार्ग कोणालाच माहिती नाही. अंतर्गत भागात भुयारे बंद स्थितीत असल्याचे आढळतात.

या गूढ अशा भुयारांपासून काही मीटरच्या अंतरावर नदीच्या पात्रात पाटकोंड नावाची खोल कोंड (डोह) आढळते. ही कोंड बाराही महिने पाण्याने भरलेली असते. संपूर्ण नदीपात्र उन्हाळ्यात कोरडे पडलेले असताना या पाटकोंडीतील पाणी मात्र अजिबात आटत नाही.पाटकोंडीत वरील भुयारांतून बाहेर पडण्याचा मार्ग असल्याचे सांगण्यात येते. हा सुरक्षित व छुपा मार्ग असल्याचे मानले जाते. या मार्गाने थोडे अंतर पोहून जाऊन थेट नदीच्या पलिकडे जाता येते.

नदीच्या पलिकडे गेल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुडवत गेल्यानंतर थेट विशाळगड गाठणे शक्य होते, असेही येथील जाणकार सांगतात. प्रभानवल्ली गावापासून विशाळगड अवघ्या दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहे.शिवकालीन इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या या तीनही गूढ गुहांबाबत पुरातत्त्व खात्याने योग्य ती कार्यवाही करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच गुहांवर लिहिण्यात आलेल्या शिलालेखाबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येथील अनेक ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. या भुयारांचे संवर्धन न झाल्यास इतिहासाची साक्षीदार असणारी येथील गूढ भुयारे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.विशाळगडाकडे जाणारा मार्ग?ही भुयारे शिवकालीन असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही भुयारे ऐतिहासिक विशाळगडाकडे जातात. संकट काळात या भुयारांमधून पलायन केले जात असे. असेही सांगण्यात येते. या तीन भुयारांपैकी एकच भुयार विशाळगडाकडे जाते. उर्वरित दोन भुयारे ही शत्रूला चकवा देण्यासाठीच तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.केवळ दोन भुयारांवरच शिलालेखभुयारावर कोरण्यात आलेली शिलालेखावरील भाषा ही अरब भाषेशी साधर्म्य साधणारी असली तरी ती अरब नसल्याचे कळते. त्यामुळे या शिलालेखाचा अर्थ अद्याप कोणाला कळलेला नाही. एकसारख्या दिसणाऱ्या या तीनही भुयारांपैकी केवळ दोन भुयारांवर शिलालेख कोरलेला आहे. शत्रूला गुंगारा देण्यासाठीच या तीन भुयारांची निर्मिती केली गेली असावी. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगडArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण