शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

पावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:42 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक धरणे भरून वाहात आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ व पानवल धरणही भरून वाहात आहे. गेला महिनाभर मुसळधार पाऊस झाल्याने सर्व जलाशये भरली तरी रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला काही पुरेसे पाणी येत नसल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देपावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीरनगरसेवकांमध्ये असलेले हेवेदावे हेच पाणी पुरवठ्यातील अडसर

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक धरणे भरून वाहात आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ व पानवल धरणही भरून वाहात आहे. गेला महिनाभर मुसळधार पाऊस झाल्याने सर्व जलाशये भरली तरी रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला काही पुरेसे पाणी येत नसल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत.

आधीच जुनाट वितरण वाहिन्यांमुळे कमी दाबाने येणारे पाणी आणि त्यातच पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांची पाण्याच्या चाव्या उघडण्याबाबतची मनमानी व पाणी पुरवठ्यावरून काही प्रभागातील नगरसेवकांमध्ये असलेले हेवेदावे हेच रत्नागिरीच्या पाणी पुरवठ्यातील अडसर ठरत असल्याची चर्चा रत्नागिरीकरांमध्ये आहे.रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्या गेल्या पाच वर्षांपूर्वीच बदलण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यासाठी नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांकडून ठोस प्रयत्न झाले नसल्याचा रत्नागिरीकरांचा आरोप आहे. शहरातील राजीवडा, शिवखोल, मिरकरवाडा तसेच अन्य भागांमध्येही नळपाणी योजनेला अल्पदाबाने अपुरे पाणी येते.

काही भागात काही दिवस पाणीच न येण्याचे प्रकार सुरू आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेकडून टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, त्यानेही शहरवासियांची पाण्याची गरज भागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.रत्नागिरीतील पाणी टंचाईची स्थिती ही राजकीय अनास्थेमुळे असून २०१६ मध्ये मंजूर झालेली ६३ कोटींची सुधारित नळपाणी योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेचे काम पूर्ण होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

जुनाट वितरण वाहिन्यांमुळे टंचाईची स्थिती भर पावसाळ्यातही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या शहरातील अनेक भागात तीव्र टंचाई असून पाण्याविना नागरिक हतबल झाले आहेत. नवीन नळपाणी योजना कार्यान्वित होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार असल्याने रत्नागिरीकरांचे पाण्यावाचून हाल सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरातील राजीवडा भागातील टंचाई स्थिती गेल्या काही महिन्यांपासून गंभीर झाली आहे. नळपाणी योजनेच्या नळांना अल्प पाणी येते, तर कधी येतच नाही. त्यामुळे त्या ठिकाणी एका खासगी विहिरीचे पाणी साठवण टाकीत पंपाद्वारे लिफ्ट करून त्या परिसराला पुरविण्याची मागणी करण्यात आली होती. विहीर मालकाचीही त्याला सहमती होती. दोन महिन्यांपूर्वी त्यासाठी शिवखोल, राजीवडा येथे नगर परिषद अभियंत्यांनीही पाहणी केली. पंप देण्याचे आश्वासन मिळाले. आश्वासनाशिवाय राजीवडावासियांना काहीच मिळाले नाही.शहराला दररोज शीळ व पानवल धरणातून सुमारे १५ ते १६ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हे पाणी गळतीमुळे शहरातील नळ जोडण्यांपर्यंत पूर्ण दाबाने पोहोचतच नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती शहरात असून सुधारित नळपाणी योजना पूर्ण होणार कधी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम पाणी सभापती सुहेल मुकादम हे प्रामाणिकपणे करीत आहेत. परंतु त्यांना पाणी विभागातील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. पाणी पुरवठ्याच्या चाव्या उघडण्याच्या वेळांमध्ये सावळागोंधळ आहे. नगरसेवकांमध्येही पुरवठ्यावरून वादावादी आहे. त्यामुळे कर्मचारीही त्रस्त असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी