शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

रत्नागिरी : पाणीप्रश्नावरून नगर परिषद प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 16:07 IST

रत्नागिरी शहरात खराब वितरण वाहिन्यांमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पुरवठ्यावर दुर्लक्ष होत आहे, असा ठपका ठेवत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रश्नावरून सभागृहात रणकंदन माजले.

ठळक मुद्देपाणीप्रश्नावरून नगर परिषद प्रशासन धारेवरसंबंधित विभागांची लवकरच बैठक घेण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात खराब वितरण वाहिन्यांमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पुरवठ्यावर दुर्लक्ष होत आहे, असा ठपका ठेवत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रश्नावरून सभागृहात रणकंदन माजले.

पुढील आठवड्यात पाणी विभाग कर्मचारी, नगर परिषद पदाधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी, यांची संयुक्त बैठक घेऊन पाणी समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष योगेश तथा राहुल पंडित यांनी दिले.रत्नागिरी शहरात गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने जागोजागी फुटल्या आहेत. तसेच शीळ धरणावरून साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीपैकी सुमारे ५०० मीटर लांबीची जलवाहिनी जागोजागी गंजल्याने फुटली आहे. त्यामुळे असंख्य ठिकाणी पाणी गळती होत आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात मुबलक पाणी असताना केवळ वितरण यंत्रणा कुचकामी होत असल्याने पुरेसे पाणी रत्नागिरीवासीयांना मिळणे अशक्य झाले आहे, अशा भावना सदस्यांनी मांडल्या.जून महिन्यात व सुरू असलेल्या जुलै महिन्यातही शहरातील अनेक भागात कमी दाबाने मिळणारे पाणीही बंद झाले. शहरातील ३०पैकी सुमारे २० वॉर्डमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. अनेक ठिकाणी पावसात नळाला तीन ते चार दिवस पाणीच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी नगरसेवकांचे दरवाजे ठोठावले व अपेक्षेप्रमाणे नगर परिषद सभेत पाणीटंचाई प्रश्नाचे तीव्र पडसाद उमटले.

या वादळी चर्चेत उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, सेना गटनेते बंड्या साळवी, सेना नगरसेवक राजन शेट्ये, भाजपचे नगरसेवक सुशांत चवंडे, राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर, नगरसेवक रोशन फाळके, विकास पाटील, उमेश कुळकर्णी यांच्यासह सर्वच नगरसेवकांचा सहभाग होता.पाणी विभागावर अंकुश नाही!रत्नागिरी शहरात कमी दाबाने पाण्याची समस्या गेल्या आठ वर्षांपासून आहे. शहरात सुमारे दहा हजार नळ जोडण्या आहेत. आता राज्य शासनाकडून नगर परिषदेसाठी ६३ कोटींची सुधारित नळपाणी योजना मंजूर झाली असून, ही योजना पूर्ण होण्यास अजून २ वर्षे लागणार आहेत. त्यामुळे असलेल्या जुन्या वितरण वाहिन्यांची दुरुस्ती करून शहरवासीयांची पाण्याची किमान गरज भागवणे आवश्यक आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणाचे नियंत्रणच नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी