शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरीत प्रभागवार नालेसफाई सुरू, पावसाळा तोंडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:46 IST

मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असताना रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील प्रत्येक प्रभागातील गटारे व नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पहिल्या टप्प्यातील नालेसफाईचे काम शहरात करण्यात आले.

ठळक मुद्देरत्नागिरीत प्रभागवार नालेसफाई सुरू, पावसाळा तोंडावर वेळेत नालेसफाई पूर्ण न झाल्यास शहरात पाणी तुंबण्याची भीती

रत्नागिरी : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असताना रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील प्रत्येक प्रभागातील गटारे व नालेसफाईचे काम हाती घेतले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पहिल्या टप्प्यातील नालेसफाईचे काम शहरात करण्यात आले. त्यानंतरही शहरांमधील नाले व गटारांमध्ये पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नगर परिषद आरोग्य व स्वच्छता विभागातर्फे प्रभागवार सफाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.रत्नागिरी शहरात १५ प्रभाग असून, शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत गेल्या पाच महिन्यांपासून शहर स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे. त्यातच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे दोन महिन्यांपूर्वीपासूनच शहरातील नाले व गटारांच्या सफाईचे काम सुरू होते. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीतील स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे.नाले व गटारे सफाईच्या या मोहीमेअंतर्गत प्रत्येक प्रभागात २० सफाई कामगारांच्या मदतीने सफाईचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू झाल्याने १५ प्रभागातील काम पूर्ण होईपर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.स्वच्छतेबाबत जागरुकता, दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या नाले व गटारांच्या सफाईनंतरही अवघ्या काही दिवसात पुन्हा गटारे कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, डबर यांनी भरून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. नाल्यांची सफाई पावसाळ्याआधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होणार असा नगर परिषदेला विश्वास वाटतो आहे. मात्र तसे न झाल्यास पावसाळ्यात रत्नागिरी शहरात अतिवृष्टीच्यावेळी पाणी तुंबण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका