शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतात पहिल्यांदाच होतीय 'फिडे वर्ल्ड चेस ऑलिंपिआड स्पर्धा', रत्नागिरीच्या सुपुत्राची पंच पदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:39 IST

भारतात ही स्पर्धा प्रथमच होत असून, जगभरातील १८४ देशांतील खेळाडू ह्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

रत्नागिरी : ४४ वी फिडे वर्ल्ड चेस ऑलिंपिआड स्पर्धा दि. २९ जुलै पासून महाबलीपुरम, चेन्नई येथे सुरू झाली आहे. त्यात रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच विवेक सोहनी यांची पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने या स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे.

भारतात ही स्पर्धा प्रथमच होत असून, जगभरातील १८४ देशांतील खेळाडू ह्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. जगज्जेता मॅग्नस कार्लसन, अनिष गिरी, विदित गुजराथी, लिओन आरोनिअन, सॅम शंखलंड, मुझिचुक भगिनी, कोनेरू हम्पी यांच्या सारख्या एकूण १७५० हुन अधिक नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी विवेक साेहनी यांना मिळाली आहे.

जगभरातून २५० पंच या स्पर्धेत काम करत असून एवढ्या मोठ्या चमूत काम करण्याचा, नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याचा व पाश्चात्य देशांतील अनुभवी पंचसोबतच्या वार्तालापाचा अनुभव पुढे जाऊन नक्कीच उपयोगी पडेल असे विवेक साेहनी यांनी सांगितले.

२०१६ मध्ये रत्नागिरीच्या चैतन्य भिडे व कोल्हापूरच्या भरत चौगुले यांच्या आग्रहाखातर ह्या क्षेत्रात आलो आणि त्यानंतर सर्व गोष्टी आपसूकच घडत गेल्या अशी प्रांजळ कबुलीही दिली. गेल्या ६ वर्षाच्या ह्या कारकिर्दीत प्रत्येक टप्प्यात दिल्लीच्या गोपाकुमार, चेन्नईच्या आनंद बाबू, बंगलोरच्या वसंथ बी एच आणि बिहारच्या धर्मेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाचा तसेच कुटुंबियांच्या सहकार्याचा मोलाचा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजित कुंटे यांनी आनंद व्यक्त करत सर्व शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी