शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:47 PM

लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप

ठळक मुद्देसामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

रत्नागिरी : लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप यावेळीही समसमान झाले आहे. रत्नागिरी विधानसभेची ही जागा गेल्या १५ वर्षात भाजपला मानवली नाही. तरीही भाजपच्या वाट्याची ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह धरला जात असल्याने यावरून राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

२००४ च्या विधानसभा निवडणूकीआधी रत्नागिरीच्या जागेवर भाजप आमदार विजयी झाले होते. मात्र २००४ नंतर या मतदारसंघात भाजपला मात देत त्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसमध्ये असलेले आमदार उदय सामंत हे विजयी झाले. २००९  मध्येही राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून उदय सामंत विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला व सेनेतर्फे पुन्हा ते रत्नागिरी मतदारसंघातून विजयी झाले. पुन्हा एकदा यावेळी सेनेतर्फे त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. मात्र गेल्यावेळी विधानसभेत युती नव्हती. यावेळी युती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ युतीधर्मानुसार भाजपचा असल्याने तो भाजपलाच मिळावा म्हणून भाजपामधील काही नेते आग्रही आहेत.

या मतदारसंघात भाजपातर्फे प्रसाद लाड यांच्या उमेदवारीची आधीपासून चर्चा होती. युती न झाल्यास हे प्रसाद लाड व उदय सामंत निवडणूक रिंगणात आमने सामने येतील अशीही चर्चा होती. आता युती झाली आहे. त्यामुळे मूळ भाजपच्या वाट्याला आलेला हा मतदारसंघ पुन्हा भाजपला मिळावा, असा आग्रह स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठांकडे धरला जात आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रीक करणाºया आमदार उदय सामंत यांचे सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  घनिष्ठ संबंध आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. स्थानिक पातळीवर खासदार विनायक राऊत यांच्याशीही सामंत यांचे संबंध चांगले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरील हक्क सांगण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला तरी सामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

समिकरणे बदलणार!लोकसभेची निवडणूक येत्या एप्रिल, मे महिन्यात होणार आहे. राज्य विधानसभेची निवडणूक २०१९ च्या अखेरीस होणार आहे. लोकसभा निवडणूकीनंतर राजकीय समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. मात्र काहीही झाले तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांनी राजकीय बस्तान चांगले बसविल्याने त्यांच्या उमेद्वारीला धोका नाही, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी