शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरी : परजिल्ह्यातील वाहने महामार्गावरच रोखली, त्या वाहतूकदारांबाबत स्थानिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:07 IST

स्थानिकांवर अन्याय करून स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीला जिल्हा मोटर मालक संघटनेने अद्दल घडविली असून, परजिल्ह्यातील धान्य वाहतूकदारांना सोमवारी परत पाठविण्यात आले.

ठळक मुद्देपरजिल्ह्यातील वाहने महामार्गावरच रोखली, त्या वाहतूकदारांबाबत स्थानिक आक्रमकक्रिएटिव्ह ग्रेन कंपनी, जिल्ह्यात स्वत:चे ट्रक घुसविण्याचा प्रयत्न, संघटना आक्रमक

रत्नागिरी : स्थानिकांवर अन्याय करून स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीला जिल्हा मोटर मालक संघटनेने अद्दल घडविली असून, परजिल्ह्यातील धान्य वाहतूकदारांना सोमवारी परत पाठविण्यात आले.वर्षानुवर्षे स्थानिक ट्रकचालक रास्त दराची धान्य वाहतूक करीत असताना शासकीय धान्य वाहतूक वितरणाचे काम घेतलेल्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीने जिल्ह्यात स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न केला. परंतु याची माहिती मिळताच रत्नसिंधु टेम्पो, डंपर चालक, मालक संघटना आणि जिल्हा मोटर मालक संघटनेने आक्रमक होत सांगलीतून आलेले ट्रक महामार्गावरच रोखून धरले आणि त्यांना माघारी परतवले.जिल्ह्यातील धान्य वाहतूक गेली अनेक वर्षे स्थानिक ट्रक मालकांमार्फत केली जात होती. या वाहतुकीवर रत्नागिरीतील अनेक स्थानिक कुटुंब अवलंबून आहेत. मात्र, राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने यावेळी राज्यस्तरावर धान्य वितरणाचे टेंडर काढले. त्याचा ठेका सांगली येथील रमेश शहा यांनी घेतला. स्थानिक ट्रकचालकांना बरोबर घेण्याचे त्यांनी मान्य केले होते. परंतु कमी दराने निविदा भरल्याने सध्याच्या प्रचलित दरापेक्षा कमी दराने धान्य वाहतूक करण्याची अट शहा यांनी स्थानिक ट्रकचालकांना घातली होती.सध्या जिल्हा प्रशासनामार्फत थेट धान्य वाहतूक सुरु आहे. पंधरा दिवसांनी ट्रक चालकांना भाडे देण्यात येते. सध्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या वाहतूक भाड्याएवढेच भाडे द्यावे, अशी रास्त मागणी वाहतूक संघटनांनी रमेश शहा यांच्याकडे केली होती. परंतु शहा यांनी नकार दिला, तर जिल्हा प्रशासनाने स्थानिक ट्रक चालकांमार्फत वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, गणेशोत्सवानंतर ठेकेदार कंपनीकडून धान्य वितरण सुरू होणार आहे.

यासाठी शहा यांनी सोमवारी सांगलीतील चार ट्रक धान्य वाहतुकीसाठी पाठविले. ही माहिती मिळताच स्थानिक ट्रक चालकांनी मुंबई - गोवा महामार्गावर जाऊन ट्रक रोखले व त्यांना परत जाण्याची विनंती केली. त्यानुसार सांगलीहून आलेले ट्रक परत गेले आहेत. जिल्हा प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक ट्रकचालकांनी केली आहे....प्रयत्न हाणून पाडूस्थानिकांना डावलून क्रीएटिव्ह ग्रेन कंपनीने परजिल्ह्यातील ट्रक आणून येथे धान्य वाहतूक करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा रत्नसिंधु चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संकेत चवंडे यांनी दिला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी