शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

रत्नागिरी : पाच एकरवर फुलली केळीची बाग, धामणीतील शेतकऱ्यांचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:32 IST

पेम संस्थेचे सतीश कामत यांनी धामणीतील गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळेच या गावातील शेतकऱ्यांनी काजूची १५० झाडे लावली असून, पाच एकर क्षेत्रावर केळीची बाग फुलविली आहे. याशिवाय काही क्षेत्रात पालेभाज्या व अन्य भाज्या तसेच कलिंगडाचे पीकही घेत आहेत.

ठळक मुद्देपाच एकरवर फुलली केळीची बागधामणीतील शेतकऱ्यांचा प्रयोगसमूह गटाचा झाला साऱ्यांना फायदा

रत्नागिरी : महिलांचा बचत गट असतो, मग पुरूषांचा बचत गट का असू नये, या संकल्पनेतूनच श्री गणेश शेतकरी उत्पादक गट, धामणीची स्थापना करण्यात आली. गटातर्फे समूहशेती करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी पेम संस्थेचे सतीश कामत यांनी धामणीतील गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळेच या गावातील शेतकऱ्यांनी काजूची १५० झाडे लावली असून, पाच एकर क्षेत्रावर केळीची बाग फुलविली आहे. याशिवाय काही क्षेत्रात पालेभाज्या व अन्य भाज्या तसेच कलिंगडाचे पीकही घेत आहेत. त्यांच्या समूहशेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून, आता आणखी दहा एकर जागा पिकाखाली आणण्याचा निर्धार केला आहे.कोकणातील शेती तुकड्यामध्ये विभागली गेली आहे. भातवगळता उर्वरित दिवसात जमीन पडिक असते. त्यामुळे काही मंडळी रोजगारासाठी शहराकडे गेली आहे. समूहशेतीसाठी सुरूवातीला २० ते २१ मंडळी एकत्र आली. त्यांना सतीश कामत यांच्यासह अमोल लोध यांचे सहकार्य मिळत आहे.

सुरूवातीला १५० काजू लावण्यात आल्यानंतर नगदी पिकाची लागवड करण्याचे ठरले. चिपळूण येथील खानविलकर यांची केळीची बाग पाहिल्यानंतर केळी लागवड करण्याचे निश्चित झाले. जळगाव येथून टिश्यू कल्चर जी-९ जातीची रोपे आणण्यात आली. केळी लागवडीसाठी दहा लाखाचा प्रोजेक्ट तयार करण्यात आला. मात्र पैसे कसे उभारावे, हा प्रश्न होता.

शेतकऱ्यांनी स्वत:कडून अडीच लाख गोळा केले. सतीश कामत यांनी पुणे येथील बासुरी फाऊंडेशनकडे संपर्क साधला. फाऊंडेशनने साडेसात लाख देण्याचे ठरविले. त्यामध्ये पाच लाख बिनव्याजी, तर अडीच लाख संस्थेने देणगीस्वरूपात दिले.

गेली तीन वर्षे केळीचे विक्रमी उत्पादन घेण्यात येत असून, केळीसाठी चिपळूण, रत्नागिरीतील स्थानिक विक्रेत्यांकडे विकण्यात आल्यामुळे फायदा झाला. गेल्या तीन वर्षात गटाने बिनव्याजी पाच लाख रूपयांचे कर्ज फेडले आहे.केळीबरोबर काही क्षेत्रावर भाजीपाला, तर काही क्षेत्रावर कलिंगड लागवड केली आहे. स्थानिक बाजारपेठेतच विक्री होत असल्यामुळे गटाला उत्पादन विक्रीसाठी फारसे श्रम घ्यावे लागले नाहीत. शिवाय उत्पादनाचा दर्जा चांगला असल्यामुळे खपही चांगला होत आहे.कामाची विभागणी केल्याने ताण येत नाहीबचत गटाची संकल्पना सुचली तरी त्याला मूर्त स्वरूप सतीश कामत यांनी दिले. शेती व पूरक व्यवसाय सुरू करीत असताना ती कशी करावी, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याबाबत सहकार्य लाभलेच, परंतु आर्थिक बळ बासुरी फाऊंडेशनव्दारे मिळवून दिल्यामुळेच गटाच्या सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

गटाने दहा वर्षाच्या भाडेकराराने जागा घेतली असून, केळी उत्पादनाचे यावर्षीचे चौथे वर्ष आहे. कामाची विभागणी केल्यामुळे ताणही येत नाही. शिवाय या गटातील सदस्यांची संख्यादेखील वाढत आहे.- प्रकाश रांजणे,माजी सरपंच, धामणी,ता. संगमेश्वर 

बासुरी संस्थेची मदत...एका झाडाला दोन व त्यापेक्षा अधिक मुनवे फुटत असल्यामुळे चांगल्या मुनव्याची लागवड केली जाते. धामणी येथे डोंगरावरील पडिक जागा ओलिताखाली आणली आहे. श्रमदानाने पाणी योजना बनविली असून, त्यासाठी दहा लाख रूपये खर्च झाला. बहुतांश काम श्रमदानाने पूर्ण केले असले तरी ८ लाख रूपये बासुरी संस्थेने शेतकऱ्यांना दिले आहेत.चारा लागवडीचा संकल्पपाच एकरच्या जागेत एक हजार चौरसफुटाचा गोठा बांधण्यात आला असून, तीन देशी व तीन संकरित जातीच्या गाई आहेत. जनावरांसाठी बारमाही चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चार एकरवर चारा लागवड करण्याचे ठरविण्यात आले आहे.गांडूळखत निर्मिती सुरुनगदी पिकात केळी, हंगामी पिकात भाजीपाला, कलिंगडाची शेती तर त्याला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यसाय सुरू केला आहे. दूध विक्रीबरोबर शेणखत, गोमूत्र विक्री, पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मिती सुरू केली आहे.दुग्धउत्पादनासाठी डेअरीसमूह गटातील शेतकऱ्यांची संख्या वाढली. लागवडीसाठी जागाही उपलब्ध झाली आहे. दहा एकर अधिक जागा मिळाली आहे. त्या जागेत कडधान्य, भाजीपाला, शिवाय दुग्धउत्पादनासाठी डेअरी उभारण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी