शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रत्नागिरी : स्पर्धेसाठी कर्मचारी कल्याण निधीचा वापर, लोकमतच्या वृत्तानंतर चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 14:12 IST

कोकण प्रदेश भूमी अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी लाखो रूपयांचा निधी गोळा करूनही कर्मचारी कल्याण निधीवर हात मारण्यात आला. विधानसभेतही या खर्चाबाबत चर्चा करण्यात आली असून, यासाठी कारणीभूत असणाऱ्या जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांबरोबर अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. याबाबत लोकमतने सर्वप्रथम आवाज उठवला होता.

ठळक मुद्देरत्नागिरी : स्पर्धेसाठी कर्मचारी कल्याण निधीचा वापर, लोकमतच्या वृत्तानंतर अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

रत्नागिरी : कोकण प्रदेश भूमी अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी लाखो रूपयांचा निधी गोळा करूनही कर्मचारी कल्याण निधीवर हात मारण्यात आला. विधानसभेतही या खर्चाबाबत चर्चा करण्यात आली असून, यासाठी कारणीभूत असणाऱ्या जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांबरोबर अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. याबाबत लोकमतने सर्वप्रथम आवाज उठवला होता.कोकण प्रदेश भूमी अभिलेखच्या विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा ५ जानेवारी रोजी दापोली येथे झाल्या होत्या. स्पर्धेचे यजमानपद रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आले होते. स्पर्धेसाठी कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपए गोळा करण्यात आले होते. याबाबचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते.

स्पर्धेकरिता जिल्ह्यातील खासगी कंपन्यांकडून लाखो रुपए देणगी म्हणून घेण्यात आले. परंतु, त्याचा हिशोब अद्याप दिलेला नाही. खासगी कंपन्यांकडून लाखो रूपयांचा निधी गोळा करूनही कर्मचारी कल्याण निधीतून दीड लाख रुपए काढण्यात आले.याबाबत विविध स्तरावरून चौकशीची मागणी झाल्यानंतर तसेच लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्याची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी विभागाकडून अपुरी माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, महसूलमंत्री चंद्र्कांत पाटील यांनी संबंधित महोत्सवाच्या अमर्याद खर्चाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.चौकशीच्या आदेशामुळे कारभाराची चर्चादेणगी गोळा करणाऱ्या निधी समितीबरोबरच कार्यक्रम आयोजन समितीबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. ज्या खासगी कंपन्यांनी देणगी दिली होती. त्यांचाही जबाब नोंदविला जाणार असून, कंपन्यांकडून आलेला निधी नेमका कोठे व कशासाठी खर्च झाला, हेदेखील चौकशीत उघड होणार आहे. विधिमंडळातील चर्चेनंतर चौकशीच्या आदेशामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चर्चा मात्र सर्वत्र सुरू झाली आहे.

टॅग्स :fundsनिधीRatnagiriरत्नागिरीGovernmentसरकार