शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रत्नागिरी :आजचे स्वराज्य सुराज्य होणे गरजेचे : रवींद्र वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:25 IST

आजच स्वराज्य हे प्रामुख्याने सुराज्य होणे, ही काळाची गरज आहे. सुराज्य हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना स्वातंत्र्य, सुख मिळवून देणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने देशाने पंचवार्षिक योजना सुरू केल्या आहेत, असे मत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआजचे स्वराज्य सुराज्य होणे गरजेचे : रवींद्र वायकररत्नागिरीत पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजारोहण

रत्नागिरी : आजच स्वराज्य हे प्रामुख्याने सुराज्य होणे, ही काळाची गरज आहे. सुराज्य हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना स्वातंत्र्य, सुख मिळवून देणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने देशाने पंचवार्षिक योजना सुरू केल्या आहेत, असे मत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले.भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदान येथे राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर पथसंचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पोलीस, होमगार्ड, स्काऊट, एन. सी. सी., श्वान पथक, आदी पथकांनी संचलनात सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्त्व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण इंगळे यांनी केले.वायकर पुढे म्हणाले की, पंचवार्षिक योजनेतून देशात रेल्वेचे जाळे विणले, खेड्यपाड्यांचा विकास केला, शिक्षणामध्ये प्रगती केली, महिलांचे सबलीकरण केले, उत्तम न्याय व्यवस्था दिली, निरक्षरता दूर करण्याचा प्रयत्न केला, दळणवळणाच्या सोयी केल्या.

देश घडवायचा असेल तर तळागाळापर्यंत पायाभूत सुविधा पोहोचविणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीत अनेक सेवा, सुविधा राज्याच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या प्रणय राहुल तांबे यांना जीवनरक्षा पदक पुरस्कार २०१७ने पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचाही पोलीस महांसचालक पदक मिळल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या उत्कृष्ट लघु उद्योजक, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण रत्नागिरी यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरी