शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रत्नागिरी : तापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:42 IST

राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

ठळक मुद्देतापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण कोकणचा हापूसला जीआय मानांकन प्राप्त

रत्नागिरी : राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.शासनाने आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून दलालीची रक्कम न घेण्याचा निर्णय गतवर्षीपासून जाहीर केल्यामुळे दलाली घेणे बंद केले त्याचा परिणाम दरावर झाला आहे. सुरूवातीला पेटीला दहा हजार रूपये दर देण्यात येत होता. मात्र, आता १००० ते ३००० रूपये दराने आंबापेटीची विक्री सुरू आहे.

मुंबई मार्केटसारखेच दर स्थानिक बाजारपेठेत लाभत आहेत. ३५० रूपये ते ८०० रूपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. छोट्या आकारातील (बिटक्या) आंबा १०० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गतवर्षी दर बऱ्यापैकी स्थिर होते.

यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना दर लवकर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईबरोबर कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये आंबा विक्रीस पाठविण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठवावा लागतो. मात्र, अन्य मार्केटमध्ये कच्चा आंबा विक्रीस चालतो.हिंदू नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्याला होतो. पूर्वी गुढीपाडव्याचा मुहूर्ताला आंबा काढी केली जात असे. मात्र, गेली काही वर्षे आंबा पाडव्यापूर्वीच बाजारात येत आहे. फेब्रुवारीतच आंबा बाजारात उपलब्ध होत आहे. कोकणाबरोबर परराज्यातून आंबा एकाच वेळी व तितक्याच प्रमाणात विक्रीला वाशी मार्केटमध्ये येवू लागला.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आंब्याची आवक वाढली. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीस येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत आहे. सुटी सुरू झाल्यामुळे पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. वाशीत दर कोसळले असल्यामुळे काही शेतकरी रस्त्याच्या कडेला स्टॉल टाकून आंबा विक्री करीत आहेत.पणन विभागासह यंत्रणा कार्यरतमुंबई उपनगरामध्ये उत्तरप्रदेशातील लोकच आंब्याची विक्री करत आहेत. त्यामुळे वाशी मार्केटमधून आंबा खरेदी करून तो उपनगरात विकत आहेत. परराज्यातील किलोवर आंबा विकत घेऊन तो रत्नागिरी हापूस सांगून डझनावर विकत आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

कोकणचा हापूस असे जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या विक्रीला चाप बसणार आहे. एकाच बाजारपेठेवर विक्रीसाठी ताण येऊ नये, यासाठी पणन विभागासह शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा