शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

रत्नागिरी : तापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:42 IST

राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

ठळक मुद्देतापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण कोकणचा हापूसला जीआय मानांकन प्राप्त

रत्नागिरी : राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.शासनाने आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून दलालीची रक्कम न घेण्याचा निर्णय गतवर्षीपासून जाहीर केल्यामुळे दलाली घेणे बंद केले त्याचा परिणाम दरावर झाला आहे. सुरूवातीला पेटीला दहा हजार रूपये दर देण्यात येत होता. मात्र, आता १००० ते ३००० रूपये दराने आंबापेटीची विक्री सुरू आहे.

मुंबई मार्केटसारखेच दर स्थानिक बाजारपेठेत लाभत आहेत. ३५० रूपये ते ८०० रूपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. छोट्या आकारातील (बिटक्या) आंबा १०० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गतवर्षी दर बऱ्यापैकी स्थिर होते.

यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना दर लवकर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईबरोबर कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये आंबा विक्रीस पाठविण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठवावा लागतो. मात्र, अन्य मार्केटमध्ये कच्चा आंबा विक्रीस चालतो.हिंदू नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्याला होतो. पूर्वी गुढीपाडव्याचा मुहूर्ताला आंबा काढी केली जात असे. मात्र, गेली काही वर्षे आंबा पाडव्यापूर्वीच बाजारात येत आहे. फेब्रुवारीतच आंबा बाजारात उपलब्ध होत आहे. कोकणाबरोबर परराज्यातून आंबा एकाच वेळी व तितक्याच प्रमाणात विक्रीला वाशी मार्केटमध्ये येवू लागला.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आंब्याची आवक वाढली. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीस येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत आहे. सुटी सुरू झाल्यामुळे पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. वाशीत दर कोसळले असल्यामुळे काही शेतकरी रस्त्याच्या कडेला स्टॉल टाकून आंबा विक्री करीत आहेत.पणन विभागासह यंत्रणा कार्यरतमुंबई उपनगरामध्ये उत्तरप्रदेशातील लोकच आंब्याची विक्री करत आहेत. त्यामुळे वाशी मार्केटमधून आंबा खरेदी करून तो उपनगरात विकत आहेत. परराज्यातील किलोवर आंबा विकत घेऊन तो रत्नागिरी हापूस सांगून डझनावर विकत आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

कोकणचा हापूस असे जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या विक्रीला चाप बसणार आहे. एकाच बाजारपेठेवर विक्रीसाठी ताण येऊ नये, यासाठी पणन विभागासह शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा