शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

रत्नागिरी : तापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:42 IST

राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

ठळक मुद्देतापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण कोकणचा हापूसला जीआय मानांकन प्राप्त

रत्नागिरी : राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.शासनाने आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून दलालीची रक्कम न घेण्याचा निर्णय गतवर्षीपासून जाहीर केल्यामुळे दलाली घेणे बंद केले त्याचा परिणाम दरावर झाला आहे. सुरूवातीला पेटीला दहा हजार रूपये दर देण्यात येत होता. मात्र, आता १००० ते ३००० रूपये दराने आंबापेटीची विक्री सुरू आहे.

मुंबई मार्केटसारखेच दर स्थानिक बाजारपेठेत लाभत आहेत. ३५० रूपये ते ८०० रूपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. छोट्या आकारातील (बिटक्या) आंबा १०० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गतवर्षी दर बऱ्यापैकी स्थिर होते.

यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना दर लवकर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईबरोबर कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये आंबा विक्रीस पाठविण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठवावा लागतो. मात्र, अन्य मार्केटमध्ये कच्चा आंबा विक्रीस चालतो.हिंदू नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्याला होतो. पूर्वी गुढीपाडव्याचा मुहूर्ताला आंबा काढी केली जात असे. मात्र, गेली काही वर्षे आंबा पाडव्यापूर्वीच बाजारात येत आहे. फेब्रुवारीतच आंबा बाजारात उपलब्ध होत आहे. कोकणाबरोबर परराज्यातून आंबा एकाच वेळी व तितक्याच प्रमाणात विक्रीला वाशी मार्केटमध्ये येवू लागला.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आंब्याची आवक वाढली. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीस येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत आहे. सुटी सुरू झाल्यामुळे पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. वाशीत दर कोसळले असल्यामुळे काही शेतकरी रस्त्याच्या कडेला स्टॉल टाकून आंबा विक्री करीत आहेत.पणन विभागासह यंत्रणा कार्यरतमुंबई उपनगरामध्ये उत्तरप्रदेशातील लोकच आंब्याची विक्री करत आहेत. त्यामुळे वाशी मार्केटमधून आंबा खरेदी करून तो उपनगरात विकत आहेत. परराज्यातील किलोवर आंबा विकत घेऊन तो रत्नागिरी हापूस सांगून डझनावर विकत आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

कोकणचा हापूस असे जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या विक्रीला चाप बसणार आहे. एकाच बाजारपेठेवर विक्रीसाठी ताण येऊ नये, यासाठी पणन विभागासह शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा