शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

रत्नागिरी : उष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घाम, मे महिन्यात तीव्र उन्हाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:39 IST

फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.

ठळक मुद्देउष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घामअतितीव्र उष्म्याने रत्नागिरीकर हैराणमे महिन्यात तीव्र उन्हाळा?

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. रत्नागिरीचा पारा मंगळवारी तब्बल ३८ अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.सायंकाळ झाल्यानंतर उष्मा काहीसा कमी होत असला तरी दिवसभर तापमान जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. मार्चची तीव्रता अजूनही यायची आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरु असतानाच रत्नागिरीकरांच्या डोक्यावर ३८ अंश सेल्सिअस एवढी उष्णता आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच दुपारएवढ्या घामाच्या धारा लागत आहे.प्रतिवर्षी वाढत जाणारी उष्मा चिंतेचा कारण ठरत असताना यंदा आतापासूनच उष्म्याने कहर केल्याने येणारा मे महिना हा कडक उन्हाळ्याचाच असेल, अशी चर्चा आहे. सोमवारी रत्नागिरीचे तापमान हे कमाल ३७ तर किमान २८ अंश सेल्सिअस एवढे होते.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे तापमान कमाल ३१ तर किमान २४ अंश सेल्सिअस एवढे होते. गेल्या २० दिवसात अचानक तापमानात झालेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ही तापमावाढ सुरु झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसात तापमानाची वाढ दिसून येत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरीचे फेब्रुवारीत सर्वसाधारण कमाल तापमान हे ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत असते. मात्र आता ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तर सर्वसाधारण किमान तापमान हे २० अंश सेल्सिअस असते. ते २६ फेब्रुवारीला तेच कायम होते.महावितरणचा दिलासातापमान वाढल्याने साहजिकच वीजेचा वापरही वाढला आहे. मात्र महावितरणने अखंड वीजपुरवठा करून ग्राहकांना उष्म्यात दिलासा दिला आहे.मार्चमध्ये दिलासा ?हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तापमानात झालेली ही वाढ फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. मात्र १ मार्चपासून त्यामध्ये थोडाफार दिलासा मिळू शकतो. १ मार्च ते ४ मार्च दरम्यान हे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी