शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रत्नागिरी : उष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घाम, मे महिन्यात तीव्र उन्हाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:39 IST

फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.

ठळक मुद्देउष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घामअतितीव्र उष्म्याने रत्नागिरीकर हैराणमे महिन्यात तीव्र उन्हाळा?

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. रत्नागिरीचा पारा मंगळवारी तब्बल ३८ अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.सायंकाळ झाल्यानंतर उष्मा काहीसा कमी होत असला तरी दिवसभर तापमान जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. मार्चची तीव्रता अजूनही यायची आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरु असतानाच रत्नागिरीकरांच्या डोक्यावर ३८ अंश सेल्सिअस एवढी उष्णता आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच दुपारएवढ्या घामाच्या धारा लागत आहे.प्रतिवर्षी वाढत जाणारी उष्मा चिंतेचा कारण ठरत असताना यंदा आतापासूनच उष्म्याने कहर केल्याने येणारा मे महिना हा कडक उन्हाळ्याचाच असेल, अशी चर्चा आहे. सोमवारी रत्नागिरीचे तापमान हे कमाल ३७ तर किमान २८ अंश सेल्सिअस एवढे होते.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे तापमान कमाल ३१ तर किमान २४ अंश सेल्सिअस एवढे होते. गेल्या २० दिवसात अचानक तापमानात झालेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ही तापमावाढ सुरु झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसात तापमानाची वाढ दिसून येत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरीचे फेब्रुवारीत सर्वसाधारण कमाल तापमान हे ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत असते. मात्र आता ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तर सर्वसाधारण किमान तापमान हे २० अंश सेल्सिअस असते. ते २६ फेब्रुवारीला तेच कायम होते.महावितरणचा दिलासातापमान वाढल्याने साहजिकच वीजेचा वापरही वाढला आहे. मात्र महावितरणने अखंड वीजपुरवठा करून ग्राहकांना उष्म्यात दिलासा दिला आहे.मार्चमध्ये दिलासा ?हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तापमानात झालेली ही वाढ फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. मात्र १ मार्चपासून त्यामध्ये थोडाफार दिलासा मिळू शकतो. १ मार्च ते ४ मार्च दरम्यान हे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी