शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

रत्नागिरी : उष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घाम, मे महिन्यात तीव्र उन्हाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:39 IST

फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.

ठळक मुद्देउष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घामअतितीव्र उष्म्याने रत्नागिरीकर हैराणमे महिन्यात तीव्र उन्हाळा?

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. रत्नागिरीचा पारा मंगळवारी तब्बल ३८ अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.सायंकाळ झाल्यानंतर उष्मा काहीसा कमी होत असला तरी दिवसभर तापमान जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. मार्चची तीव्रता अजूनही यायची आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरु असतानाच रत्नागिरीकरांच्या डोक्यावर ३८ अंश सेल्सिअस एवढी उष्णता आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच दुपारएवढ्या घामाच्या धारा लागत आहे.प्रतिवर्षी वाढत जाणारी उष्मा चिंतेचा कारण ठरत असताना यंदा आतापासूनच उष्म्याने कहर केल्याने येणारा मे महिना हा कडक उन्हाळ्याचाच असेल, अशी चर्चा आहे. सोमवारी रत्नागिरीचे तापमान हे कमाल ३७ तर किमान २८ अंश सेल्सिअस एवढे होते.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे तापमान कमाल ३१ तर किमान २४ अंश सेल्सिअस एवढे होते. गेल्या २० दिवसात अचानक तापमानात झालेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ही तापमावाढ सुरु झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसात तापमानाची वाढ दिसून येत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरीचे फेब्रुवारीत सर्वसाधारण कमाल तापमान हे ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत असते. मात्र आता ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तर सर्वसाधारण किमान तापमान हे २० अंश सेल्सिअस असते. ते २६ फेब्रुवारीला तेच कायम होते.महावितरणचा दिलासातापमान वाढल्याने साहजिकच वीजेचा वापरही वाढला आहे. मात्र महावितरणने अखंड वीजपुरवठा करून ग्राहकांना उष्म्यात दिलासा दिला आहे.मार्चमध्ये दिलासा ?हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तापमानात झालेली ही वाढ फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. मात्र १ मार्चपासून त्यामध्ये थोडाफार दिलासा मिळू शकतो. १ मार्च ते ४ मार्च दरम्यान हे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी