शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : भाजपाच्या बैठकीमध्ये विनायक राऊत यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:30 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही मंगळवारी येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झाली आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रीया न देता शिवसेना नेत्यांनी सबुरीचे धोरण घेतले आहे.

ठळक मुद्देप्रचारात सेना करणार मोदी, शहा, फडणवीस यांचे अभिनंदनभाजपाच्या राजकीय गुगलीने शिवसेना घायाळ

प्रकाश वराडकररत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झाली आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रीया न देता शिवसेना नेत्यांनी सबुरीचे धोरण घेतले आहे.रत्नागिरीतील देवर्षीनगर येथे जिल्हा भाजपा कार्यकारिणी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी भाजपाचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने, अशोक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते यांनी गेल्या साडेचार वर्षात खासदार राऊत यांच्याकडून पक्षाला मिळालेल्या सापत्न भावाच्या वागणूकीबाबत तक्रार केली. एकवेळ दुसऱ्या समविचारी पक्षाला मदत करू मात्र जिल्ह्यांमधील भाजपामध्ये शिवसेनेला मदत करण्याची मानसिकताच उरलेली नाही. सेनेचे विनायक राऊत यांना असलेला तीव्र विरोध पाहता नेत्यांची व कार्यकर्त्यांची समजूत काढणे भाजपा नेते आमदार प्रसाद लाड व पदाधिकाऱ्यांना अवघड गेले. कणकवलीतील सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीतही भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाला पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले होते.राज्यात व देशात सेना व भाजपा युती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन होऊ नये, केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन व्हावी, देशहित जपले जावे, यासाठीच युती केली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बैठक होण्याआधी कोणतीच कृती करू नये, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही शिवसेनेला या मतदारसंघात का मदत करावी, असा प्रश्न केला. आम्ही युतीचा धर्म पाळू पण टाळी एका हाताने वाजत नाही, असे ते म्हणाले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये युतीचा खासदार म्हणून राऊत यांनी भाजपाला किती सन्मान दिला? आम्ही रत्नागिरी शहरासाठी पाणी योजना आणली त्याचे काम अजून का झालेले नाही, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी