शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : भाजपाच्या बैठकीमध्ये विनायक राऊत यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:30 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही मंगळवारी येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झाली आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रीया न देता शिवसेना नेत्यांनी सबुरीचे धोरण घेतले आहे.

ठळक मुद्देप्रचारात सेना करणार मोदी, शहा, फडणवीस यांचे अभिनंदनभाजपाच्या राजकीय गुगलीने शिवसेना घायाळ

प्रकाश वराडकररत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झाली आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रीया न देता शिवसेना नेत्यांनी सबुरीचे धोरण घेतले आहे.रत्नागिरीतील देवर्षीनगर येथे जिल्हा भाजपा कार्यकारिणी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी भाजपाचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने, अशोक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते यांनी गेल्या साडेचार वर्षात खासदार राऊत यांच्याकडून पक्षाला मिळालेल्या सापत्न भावाच्या वागणूकीबाबत तक्रार केली. एकवेळ दुसऱ्या समविचारी पक्षाला मदत करू मात्र जिल्ह्यांमधील भाजपामध्ये शिवसेनेला मदत करण्याची मानसिकताच उरलेली नाही. सेनेचे विनायक राऊत यांना असलेला तीव्र विरोध पाहता नेत्यांची व कार्यकर्त्यांची समजूत काढणे भाजपा नेते आमदार प्रसाद लाड व पदाधिकाऱ्यांना अवघड गेले. कणकवलीतील सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीतही भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाला पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले होते.राज्यात व देशात सेना व भाजपा युती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन होऊ नये, केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन व्हावी, देशहित जपले जावे, यासाठीच युती केली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बैठक होण्याआधी कोणतीच कृती करू नये, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही शिवसेनेला या मतदारसंघात का मदत करावी, असा प्रश्न केला. आम्ही युतीचा धर्म पाळू पण टाळी एका हाताने वाजत नाही, असे ते म्हणाले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये युतीचा खासदार म्हणून राऊत यांनी भाजपाला किती सन्मान दिला? आम्ही रत्नागिरी शहरासाठी पाणी योजना आणली त्याचे काम अजून का झालेले नाही, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी