शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात  प्रशासनाकडे ४ हजार ५१९ शस्त्रे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 10:36 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक  - ४८ हजार ३९१ लिटर्स दारू जप्त

 

 

 

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ४३,५७,९७१ रूपये एवढी आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ४५१९ शस्त्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.

 

येत्या दोन दिवसांत अंतिम पुरवणी यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. रत्नागिरी - सिंधुदुर्ग या मतदार संघासाठी एकूण १९४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यासाठी ८५४४ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यात प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि अन्य तीन अशा चार अधिकाºयांचा समावेश असेल.

 

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ७ एप्रिल पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ११० ठिकाणी छापे टाकण्यात आले असून २७ लाख ४ हजार ७८४ रूपयांची ४०,१५४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये ५५ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून १४ लाख ३२ हजार ७४२ रूपयांची ७,१३४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे.  रत्नागिरीत २५६४ शस्त्रे तर सिंधुदुर्गात १९५५ शस्त्रे अशी एकूण ४५१९ शस्त्रे खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकीच्या काळात सर्वच बाबींवर बारीक लक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले.

९ तक्रारी दाखल

आत्तापर्यंत सी व्हीजिल वरून एकूण ९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टपाली मतदान ४,८८७ अर्ज प्राप्त

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील सैनिक मतदारांची संख्या १०५२ इतकी आहे. एकूण टपाली मतदान १६,१३२ इतके असून त्यापैकी आत्तापर्यंत ४,८८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. १६ एप्रिलपर्यंत टपाली मतदानाचे अर्ज घेणार आहेत.

जाहिरात प्रमाणित करणे बंधनकारक

प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या ४८ तासात कोणतीही जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची असल्यास प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणे बधंनकारक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक