शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात  प्रशासनाकडे ४ हजार ५१९ शस्त्रे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 10:36 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक  - ४८ हजार ३९१ लिटर्स दारू जप्त

 

 

 

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ४३,५७,९७१ रूपये एवढी आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ४५१९ शस्त्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.

 

येत्या दोन दिवसांत अंतिम पुरवणी यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. रत्नागिरी - सिंधुदुर्ग या मतदार संघासाठी एकूण १९४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यासाठी ८५४४ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यात प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि अन्य तीन अशा चार अधिकाºयांचा समावेश असेल.

 

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ७ एप्रिल पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ११० ठिकाणी छापे टाकण्यात आले असून २७ लाख ४ हजार ७८४ रूपयांची ४०,१५४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये ५५ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून १४ लाख ३२ हजार ७४२ रूपयांची ७,१३४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे.  रत्नागिरीत २५६४ शस्त्रे तर सिंधुदुर्गात १९५५ शस्त्रे अशी एकूण ४५१९ शस्त्रे खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकीच्या काळात सर्वच बाबींवर बारीक लक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले.

९ तक्रारी दाखल

आत्तापर्यंत सी व्हीजिल वरून एकूण ९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टपाली मतदान ४,८८७ अर्ज प्राप्त

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील सैनिक मतदारांची संख्या १०५२ इतकी आहे. एकूण टपाली मतदान १६,१३२ इतके असून त्यापैकी आत्तापर्यंत ४,८८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. १६ एप्रिलपर्यंत टपाली मतदानाचे अर्ज घेणार आहेत.

जाहिरात प्रमाणित करणे बंधनकारक

प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या ४८ तासात कोणतीही जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची असल्यास प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणे बधंनकारक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक