शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या महत्त्वांकाक्षी कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता आणि सुशोभिकरणाची मोहीम राबवून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार आहे. या पंधरवड्याअखेर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत व्यक्त केला.‘स्वच्छ भारत अभियाना’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. बोबडे आदींसह रेल्वे, एस. टी., नगरपालिका आदी विभागांचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही आता नित्य आणि निरंतर चालणारी लोकचळवळ बनली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था - संघटना आणि लोकांच्या सक्रीय सहभागातून हे अभियान निश्चितच यशस्वी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. मुळातच स्वच्छतेची मूल्ये जपणारा रत्नागिरी जिल्हा या अभियानातही आघाडीवर राहावा, यासाठी प्रत्येक जिल्हावासीयाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या अभियानात स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. ५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता पंधरवड्यात पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाचा यात सहभाग अपेक्षित आहे. अस्वच्छता करणाऱ्याविरूद्ध प्रसंगी फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो स्वयंसेवक ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागी होणार असून, संपूर्ण राजापूर शहर स्वच्छ करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या प्रतिष्ठानचे कौतुक करून प्रतिष्ठानच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन इतरही संस्था पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकामचे एस. आर. बोबडे आदींसह अन्य उपस्थित होते.