शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या महत्त्वांकाक्षी कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता आणि सुशोभिकरणाची मोहीम राबवून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार आहे. या पंधरवड्याअखेर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत व्यक्त केला.‘स्वच्छ भारत अभियाना’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. बोबडे आदींसह रेल्वे, एस. टी., नगरपालिका आदी विभागांचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही आता नित्य आणि निरंतर चालणारी लोकचळवळ बनली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था - संघटना आणि लोकांच्या सक्रीय सहभागातून हे अभियान निश्चितच यशस्वी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. मुळातच स्वच्छतेची मूल्ये जपणारा रत्नागिरी जिल्हा या अभियानातही आघाडीवर राहावा, यासाठी प्रत्येक जिल्हावासीयाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या अभियानात स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. ५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता पंधरवड्यात पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाचा यात सहभाग अपेक्षित आहे. अस्वच्छता करणाऱ्याविरूद्ध प्रसंगी फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो स्वयंसेवक ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागी होणार असून, संपूर्ण राजापूर शहर स्वच्छ करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या प्रतिष्ठानचे कौतुक करून प्रतिष्ठानच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन इतरही संस्था पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकामचे एस. आर. बोबडे आदींसह अन्य उपस्थित होते.