शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

रत्नागिरी : धक्कादायक ! झपाट्याने कमी होत आहे रत्नागिरीतील वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 13:41 IST

वनक्षेत्र टिकले पाहिजे, वनसंपदेचे रक्षण झाले पाहिजे, अशी हाकाटी घातली सर्वच स्तरांवरून घातली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल ३० चौरस किलोमीटरने कमी झाल्याची माहिती खरवते - दहीवली येथील पर्यावरण शास्त्राचे प्रा. आशिष अशोक लाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी वनक्षेत्र गेल्या दोन वर्षात ३० चौरस किलोमीटरने कमीटिकवण्यासाठी शाश्वत शहरांसाठी वने हे नवे धोरण

 अरुण आडिवरेकररत्नागिरी : वनक्षेत्र टिकले पाहिजे, वनसंपदेचे रक्षण झाले पाहिजे, अशी हाकाटी घातली सर्वच स्तरांवरून घातली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल ३० चौरस किलोमीटरने कमी झाल्याची माहिती खरवते - दहीवली येथील पर्यावरण शास्त्राचे प्रा. आशिष अशोक लाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.वन परिस्थिती अहवालानुसार सन २०१५मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे वनक्षेत्र ४१९६ चौरस किलोमीटर इतके होते. हेच क्षेत्र सन २०१७मध्ये ४१६६ चौरस किलोमीटर इतके झाले आहे.कमी झालेल्या वनांमध्ये मध्यम घनदाट आणि खुल्या वनांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. नष्ट होत चाललेले हे वन टिकवण्यासाठी शाश्वत शहरांसाठी वने हे नवे धोरण आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८२०८ चौरस किलोमीटर इतके आहे. या क्षेत्रफळामध्ये वनांचा विचार करता अति घनदाट वने, मध्यम घनदाट आणि खुले वन अशा भागात वन क्षेत्र विभागले गेलेले आहे.

मात्र, दिवसेंदिवस हे क्षेत्र कमी होत चालले असून, वृक्षांची तोड करून त्याठिकाणी टोलेजंगी इमारती बांधल्या जात आहेत. वृक्षतोड होत नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत असले तरी वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वन परिस्थिती अहवालाच्या आकडेवारीनुसार रत्नागिरीतील वनक्षेत्र कमी होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यम घनदाट व खुल्या वनांचे क्षेत्रफळ कमी झाल्याचे दिसून येते. सन २०१५ मध्ये क्षेत्रफळाच्या ५१.१२ टक्के इतके वनक्षेत्र होते. सन २०१७मध्ये ते ५०.७६ टक्के इतके क्षेत्रफळ झाले असल्याचे आशिष लाड यांनी सांगितले.

मात्र, जिल्ह्यातील अतिघनदाट क्षेत्र आजही टिकून असल्याचे दिसून येते. वनांचे कमी होत जाणारे क्षेत्र पाहता आता शाश्वत शहरांसाठी वनेह्ण ही योजना जाहीर केली आहे.यानुसार ही वनेच शहरांना स्वच्छ, निरोगी आणि आनंदी बनवू शकतील. त्याचबरोबरच इमारतीच्या बाजूला वृक्षांचे आच्छादन असल्यास इमारतीच्या आतील बाजूचे तापमान ८ अंश सेल्सिअसने कमी होते. तेथे वातानुकुलीत यंत्राची आवश्यकता भासणार नाही.मध्यम व खुले वनक्षेत्रात घटरत्नागिरी जिल्ह्यातील सन २०१५ आणि सन २०१७चे प्रमाण पाहता अतिघनदाट वनांचे क्षेत्र ३३ चौरस किलोमीटर इतके कायम आहे. सन २०१५मध्ये मध्यम घनदाट क्षेत्र १९०९ चौरस किलोमीटर इतके होते ते १८९२ चौरस किलोमीटर तर खुले वन २२५४ चौरस किलोमीटर इतके होते. हे क्षेत्र आता २२४१ चौरस किलोमीटर झाले आहे.शाश्वत वने : उपयुक्त आणि सौंदर्यहीशाश्वत शहरातील वने ही वातावरणातील प्रदूषके शोषून घेण्याचे कार्य करतात. शहरी वने ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करतात. ही वने विविध पशू-पक्षी यांची आश्रयस्थाने असतात. ज्यामुळे जैवविविधतेचे संतुलन साधले जाते. शहरातील वने वृक्षाच्छादन तर वाढवतातच तसेच शहराचे सौंदर्यदेखील वाढवतात. 

टॅग्स :forest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी