शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रत्नागिरी : शिवसेनाच अव्वलस्थानी; राष्ट्रवादीची पीछेहाट, भाजपची ताकद आणि लोकप्रतिनिधी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 12:48 IST

देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.

ठळक मुद्देगुहागरमध्ये राष्ट्रवादी बॅकफूटवर, शिवसेनेच्या जिल्हा-राज्य नेत्यांचे शहरांवर विशेष लक्षजिल्हाध्यक्ष नसलेली काँग्रेस अजूनही मागेच, विधानसभेसाठी राजकीय पक्ष सरसावले

रत्नागिरी : देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.लोकसभा निवडणुकीपासूनचा विचार केला, तर जिल्ह्यात एकूण मतांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाटा शिवसेनेला मिळाला. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही हाच निकाल कायम होता. दीड वर्षापूर्वी झालेल्या पाच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्येही पन्नास टक्के जागा शिवसेनेने मिळवल्या होत्या. आताच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नावावर कमी संख्या दिसत असली तरी गुहागरमधील शहर विकास आघाडीला सेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे सेनेचे पारडे जड आहे.राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र, या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची मोठी घसरण झाली आहे. गुहागरमधील पीछेहाट हा राष्ट्रवादीसाठी मोठाच धक्का आहे. त्या तुलनेत भाजपने अनपेक्षित यश मिळवले आहे. चिपळूणनंतर आता देवरूखचे नगराध्यक्षपदही भाजपकडे आले आहे. अर्थात चिपळुणात भाजपकडे नगरसेवकांचे बळ कमी होते.

देवरूखात सर्वांत जास्त नगरसेवक भाजपचे आहेत. गुहागरमध्ये भाजपला मिळालेल्या ६ जागा कौतुकास्पद नसल्या तरी नोंद घेण्याइतक्या आहेत. गेली काही वर्षे जिल्हाध्यक्ष नसलेल्या काँग्रेसला देवरूख, गुहागरमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.शहरी भागांवर शिवसेनेचे लक्षशिवसेना हा पूर्वी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे पाठबळ असलेला पक्ष मानला जात होता. मात्र, गेल्या काही नगर परिषद/पंचायत निवडणुकांमध्ये शहरी भागातही शिवसेनेने मोठे यश मिळवले आहे. शिवसेनेने शहरी भागांमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली असून, २०१९च्या विधानसभा निवडणुकांची ही तयारीच मानली जात आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण