शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शिवसेनाच अव्वलस्थानी; राष्ट्रवादीची पीछेहाट, भाजपची ताकद आणि लोकप्रतिनिधी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 12:48 IST

देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.

ठळक मुद्देगुहागरमध्ये राष्ट्रवादी बॅकफूटवर, शिवसेनेच्या जिल्हा-राज्य नेत्यांचे शहरांवर विशेष लक्षजिल्हाध्यक्ष नसलेली काँग्रेस अजूनही मागेच, विधानसभेसाठी राजकीय पक्ष सरसावले

रत्नागिरी : देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.लोकसभा निवडणुकीपासूनचा विचार केला, तर जिल्ह्यात एकूण मतांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाटा शिवसेनेला मिळाला. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही हाच निकाल कायम होता. दीड वर्षापूर्वी झालेल्या पाच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्येही पन्नास टक्के जागा शिवसेनेने मिळवल्या होत्या. आताच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नावावर कमी संख्या दिसत असली तरी गुहागरमधील शहर विकास आघाडीला सेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे सेनेचे पारडे जड आहे.राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र, या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची मोठी घसरण झाली आहे. गुहागरमधील पीछेहाट हा राष्ट्रवादीसाठी मोठाच धक्का आहे. त्या तुलनेत भाजपने अनपेक्षित यश मिळवले आहे. चिपळूणनंतर आता देवरूखचे नगराध्यक्षपदही भाजपकडे आले आहे. अर्थात चिपळुणात भाजपकडे नगरसेवकांचे बळ कमी होते.

देवरूखात सर्वांत जास्त नगरसेवक भाजपचे आहेत. गुहागरमध्ये भाजपला मिळालेल्या ६ जागा कौतुकास्पद नसल्या तरी नोंद घेण्याइतक्या आहेत. गेली काही वर्षे जिल्हाध्यक्ष नसलेल्या काँग्रेसला देवरूख, गुहागरमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.शहरी भागांवर शिवसेनेचे लक्षशिवसेना हा पूर्वी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे पाठबळ असलेला पक्ष मानला जात होता. मात्र, गेल्या काही नगर परिषद/पंचायत निवडणुकांमध्ये शहरी भागातही शिवसेनेने मोठे यश मिळवले आहे. शिवसेनेने शहरी भागांमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली असून, २०१९च्या विधानसभा निवडणुकांची ही तयारीच मानली जात आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण