शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रत्नागिरीत समुद्र खवळला,ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:57 IST

Rain Ratnagiri : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, गुरूवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू होती.

ठळक मुद्देलॉकडाऊन नंतर दुकाने उघडताच नागरिक बाहेर पावसाची तमा न बाळगता अनेकजण खरेदीसाठी दाखल

रत्नागिरी : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, गुरूवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू होती.जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला असून, बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे़ मुसळधार पावसाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्रानेही रौद्ररूप धारण केले आहे.

सकाळपासूनच समुद्र खवळलेला आहे. दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. दुपारनंतर साडेतीन मीटरउंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मान्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उधाण असणार आहे. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील आठ दिवसांचे लॉकडाऊन गुरूवारी संपल्यानंतर बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडण्यात आली होती़ मात्र, दोन दिवस अतिवृष्टीमुळे संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने गुरूवारी पाऊस असूनही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांचीही गर्दी झाली होती़ बाजारपेठेतील दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या़ 

टॅग्स :RainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलRatnagiriरत्नागिरी