शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

रत्नागिरी : सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे  : अभिजीत घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:16 IST

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.

ठळक मुद्देसावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे  : अभिजीत घोरपडे रत्नागिरीतील बंदिवानांसाठीच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रभक्ती वाढीसाठी स्पर्धा

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई व रामचंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील कारागृहातील बंदिवानांसाठी निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रत्नागिरी कारागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, पतित पावन मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परूळेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान कारागृहात असताना सोबत असलेल्या बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रूजवून त्यांच्यातून अनेक देशभक्त निर्माण केले होते. सावरकरांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे त्यांचे विचार बंदिवानांमधून रूजवून आणि निबंधांतून ते उतरून त्यांच्यातून देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा जागृत करण्याचा उपक्रम निबंध स्पर्धेव्दारे आयोजित केला होता.

महाराष्ट्रातील येरवडा, मुंबई, ठाणे, नाशिक रोड, सातारा, भायखळा, रत्नागिरी कारागृहातील पुरूष व महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी, यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक घोषित करून विजेत्यांना रोख रकमेचे पारितेषिक, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर, डॉ. नारायण सावरकर यांच्या कन्या स्नेहलता साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह राजेंद्र वराडकर, मुकुंद गोडबोले, मंदाकिनी भट, सुमेधा मराठे, अशोक शिंदे, नयना शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक आर. आर. देशमुख यांनी केले. तुरूंगाधिकारी अमेय पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.दुचाकी रॅलीस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. मारूती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी फेरीला प्रारंभ झाला. ही फेरी मारूती मंदिर, जुना माळनाका, जयस्तंभ, बसस्थानक, आठवडा बाजार, काँग्रेस भुवन मार्गे टिळकआळी त्यानंतर शेरेनाका मार्गे लक्ष्मीचौक येथील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 

टॅग्स :jailतुरुंगRatnagiriरत्नागिरी