शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रत्नागिरी : सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे  : अभिजीत घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:16 IST

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.

ठळक मुद्देसावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे  : अभिजीत घोरपडे रत्नागिरीतील बंदिवानांसाठीच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रभक्ती वाढीसाठी स्पर्धा

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई व रामचंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील कारागृहातील बंदिवानांसाठी निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रत्नागिरी कारागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, पतित पावन मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परूळेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान कारागृहात असताना सोबत असलेल्या बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रूजवून त्यांच्यातून अनेक देशभक्त निर्माण केले होते. सावरकरांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे त्यांचे विचार बंदिवानांमधून रूजवून आणि निबंधांतून ते उतरून त्यांच्यातून देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा जागृत करण्याचा उपक्रम निबंध स्पर्धेव्दारे आयोजित केला होता.

महाराष्ट्रातील येरवडा, मुंबई, ठाणे, नाशिक रोड, सातारा, भायखळा, रत्नागिरी कारागृहातील पुरूष व महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी, यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक घोषित करून विजेत्यांना रोख रकमेचे पारितेषिक, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर, डॉ. नारायण सावरकर यांच्या कन्या स्नेहलता साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह राजेंद्र वराडकर, मुकुंद गोडबोले, मंदाकिनी भट, सुमेधा मराठे, अशोक शिंदे, नयना शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक आर. आर. देशमुख यांनी केले. तुरूंगाधिकारी अमेय पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.दुचाकी रॅलीस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. मारूती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी फेरीला प्रारंभ झाला. ही फेरी मारूती मंदिर, जुना माळनाका, जयस्तंभ, बसस्थानक, आठवडा बाजार, काँग्रेस भुवन मार्गे टिळकआळी त्यानंतर शेरेनाका मार्गे लक्ष्मीचौक येथील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 

टॅग्स :jailतुरुंगRatnagiriरत्नागिरी