शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रत्नागिरी : सैनिक कल्याणने जपली शहिदांची आठवण, माहितीफलक कार्यालयात झळकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 14:27 IST

शहीद जवांनाच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून त्यांच्या माहितीचे फलक कार्यालय परिसरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना शहिदांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही संकल्पना सुरू केली आहे.

ठळक मुद्देनव्या पिढीसाठी प्रेरणादायी कार्यक्रम, वस्तीगृहांमध्येही करण्याचा विचारजवानांची विस्तृत माहिती सैनिक कल्याण कार्यालय परिसरात फलकाद्वारे प्रसिद्ध

रत्नागिरी : शहीद जवांनाच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून त्यांच्या माहितीचे फलक कार्यालय परिसरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना शहिदांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही संकल्पना सुरू केली आहे.देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच देशाचा प्रत्येक नागरिक निर्धास्त आहे. भारत - पाकिस्तान त्याचबरोबर भारत - चीन यांसारख्या मोठ्या युद्धांचा फटका देशाला बसला. मात्र, भारतीय जवानांमुळे देश सुरक्षित आहे. देशासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले. यात रत्नागिरीच्या अनेक सुपुत्रांचा समावेश आहे. अजूनही अनेक परकीय आक्रमणाचा धोका देशाला सतावत आहे. यासाठी आपले सैनिक तळहातावर प्राण घेऊन देशासाठी लढत आहेत.जिल्ह्यातील या सुपुत्रांचा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचवावा. त्यातून नव्या पिढीला देशासाठी सेवा करण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने गेल्या महिन्यापासून हा उपक्रम सुरू केला आहे.

भारत - पाकिस्तान - चीन या युद्धांबरोबरच काश्मीर, मिझोरम लढा तसेच इतर कारणांनी शहीद झालेल्या जवानांची विस्तृत माहिती सैनिक कल्याण कार्यालय परिसरात फलकाद्वारे प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली आहे. त्यात शहीद जवानांचा फोटो, नाव, गाव, कुठली मोहीम आदी माहिती या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयातच नव्हे; तर या परिसरातील इतर कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनाही याबाबत माहिती होत आहे.सैनिक कल्याण विभागाच्या माध्यमातून माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. मुलांना शिक्षणाच्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या निवासाची सोय होण्याच्या दृष्टीनेही या कार्यालयामार्फत चिपळूण येथे सैनिकांच्या पाल्यांसाठी मुली व मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह चालवली जात आहेत. त्याचबरोबर खेड येथे मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे. या वसतिगृहातही काही शहीद जवानांची माहिती असलेली पोस्टर्स लावली आहेत. शहीद जवानांची माहिती व्हावी, त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश आहे.स्तुत्य उपक्रमजिल्हाधिकारी कार्यालयाच्या या प्रशासकीय इमारतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासह इतरही अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही जिल्ह्यातील या शहीद जवानांविषयी माहिती होण्यास मदत होत आहे. त्यामुळे अनेकांकडून हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार