शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी  एस. टी. सज्ज - १५ जूनपर्यंत दररोज ४७ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:06 IST

शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत

ठळक मुद्देपरिवहन महामंडळातर्फे २७२६ जादा गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित गाड्यांबरोबर आजपासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सुरू झाल्या आहेत.

रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत असतात. त्याशिवाय दररोज ४७ जादा गाड्या आजपासून धावणार आहेत. फक्त निवडणूक कालावधीत तीन दिवस जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दापोली आगारातून ठाणे, बोरिवली, मुंबई, विठ्ठलवाडी, भार्इंदर मार्गावर एकूण पाच जादा गाड्या दररोज सुटणार आहेत. खेड आगारातून आठ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. भांडूप, मुंबई, तुळशी-बोरिवली, ठाणे, स्वारगेट या मार्गावर गाड्या धावणार आहेत. चिपळूण आगारातून बोरिवली, कोल्हापूर, परळी, चिंचवड मार्गावर चार जादा गाड्या सुटत आहेत. गुहागर आगारातून जत, ठाणे, बोरिवली, विरार, मुंबई मार्गावर सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवरूख आगारातून स्वारगेट, बोरिवली, कल्याण मार्गावर तीन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. 

रत्नागिरी आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. जयगड-बोरिवली, रत्नागिरी - बोरिवली, रत्नागिरी - मुंबई मार्गावर सात जादा गाड्या धावणार आहेत. लांजा आगारातून बोरिवली व मुंबई मार्गावर दोन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. राजापूर आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, पुणे मार्गावर चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

मंडणगड आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विरसई - बोरिवली, केळशी -नालासोपारा, दाभट - बोरिवली, मंडणगड - मुंबई जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा गाड्यांचे आॅनलाईन आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे  निवडणूक विभागाच्या मागणीनुसार दि. २१ ते २३ एप्रिलअखेर तीन दिवस जादा गाड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मार्गावरील सर्व जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक विजय दिवटे यांनी दिली.

दोन महिने एस. टी.चे

लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ येणारा उन्हाळी हंगाम त्यामुळे एस. टी. महामंडळाला चांगलाच फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातील गाड्यांचेही नियोजन करण्यात आले असून, या दोन्ही महिन्यात एस. टी. महामंडळाच्या गाड्या बिझी राहणार आहेत.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी