शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी  एस. टी. सज्ज - १५ जूनपर्यंत दररोज ४७ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:06 IST

शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत

ठळक मुद्देपरिवहन महामंडळातर्फे २७२६ जादा गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित गाड्यांबरोबर आजपासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सुरू झाल्या आहेत.

रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत असतात. त्याशिवाय दररोज ४७ जादा गाड्या आजपासून धावणार आहेत. फक्त निवडणूक कालावधीत तीन दिवस जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दापोली आगारातून ठाणे, बोरिवली, मुंबई, विठ्ठलवाडी, भार्इंदर मार्गावर एकूण पाच जादा गाड्या दररोज सुटणार आहेत. खेड आगारातून आठ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. भांडूप, मुंबई, तुळशी-बोरिवली, ठाणे, स्वारगेट या मार्गावर गाड्या धावणार आहेत. चिपळूण आगारातून बोरिवली, कोल्हापूर, परळी, चिंचवड मार्गावर चार जादा गाड्या सुटत आहेत. गुहागर आगारातून जत, ठाणे, बोरिवली, विरार, मुंबई मार्गावर सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवरूख आगारातून स्वारगेट, बोरिवली, कल्याण मार्गावर तीन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. 

रत्नागिरी आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. जयगड-बोरिवली, रत्नागिरी - बोरिवली, रत्नागिरी - मुंबई मार्गावर सात जादा गाड्या धावणार आहेत. लांजा आगारातून बोरिवली व मुंबई मार्गावर दोन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. राजापूर आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, पुणे मार्गावर चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

मंडणगड आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विरसई - बोरिवली, केळशी -नालासोपारा, दाभट - बोरिवली, मंडणगड - मुंबई जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा गाड्यांचे आॅनलाईन आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे  निवडणूक विभागाच्या मागणीनुसार दि. २१ ते २३ एप्रिलअखेर तीन दिवस जादा गाड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मार्गावरील सर्व जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक विजय दिवटे यांनी दिली.

दोन महिने एस. टी.चे

लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ येणारा उन्हाळी हंगाम त्यामुळे एस. टी. महामंडळाला चांगलाच फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातील गाड्यांचेही नियोजन करण्यात आले असून, या दोन्ही महिन्यात एस. टी. महामंडळाच्या गाड्या बिझी राहणार आहेत.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी