शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी  एस. टी. सज्ज - १५ जूनपर्यंत दररोज ४७ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:06 IST

शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत

ठळक मुद्देपरिवहन महामंडळातर्फे २७२६ जादा गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित गाड्यांबरोबर आजपासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सुरू झाल्या आहेत.

रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत असतात. त्याशिवाय दररोज ४७ जादा गाड्या आजपासून धावणार आहेत. फक्त निवडणूक कालावधीत तीन दिवस जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दापोली आगारातून ठाणे, बोरिवली, मुंबई, विठ्ठलवाडी, भार्इंदर मार्गावर एकूण पाच जादा गाड्या दररोज सुटणार आहेत. खेड आगारातून आठ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. भांडूप, मुंबई, तुळशी-बोरिवली, ठाणे, स्वारगेट या मार्गावर गाड्या धावणार आहेत. चिपळूण आगारातून बोरिवली, कोल्हापूर, परळी, चिंचवड मार्गावर चार जादा गाड्या सुटत आहेत. गुहागर आगारातून जत, ठाणे, बोरिवली, विरार, मुंबई मार्गावर सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवरूख आगारातून स्वारगेट, बोरिवली, कल्याण मार्गावर तीन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. 

रत्नागिरी आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. जयगड-बोरिवली, रत्नागिरी - बोरिवली, रत्नागिरी - मुंबई मार्गावर सात जादा गाड्या धावणार आहेत. लांजा आगारातून बोरिवली व मुंबई मार्गावर दोन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. राजापूर आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, पुणे मार्गावर चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

मंडणगड आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विरसई - बोरिवली, केळशी -नालासोपारा, दाभट - बोरिवली, मंडणगड - मुंबई जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा गाड्यांचे आॅनलाईन आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे  निवडणूक विभागाच्या मागणीनुसार दि. २१ ते २३ एप्रिलअखेर तीन दिवस जादा गाड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मार्गावरील सर्व जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक विजय दिवटे यांनी दिली.

दोन महिने एस. टी.चे

लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ येणारा उन्हाळी हंगाम त्यामुळे एस. टी. महामंडळाला चांगलाच फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातील गाड्यांचेही नियोजन करण्यात आले असून, या दोन्ही महिन्यात एस. टी. महामंडळाच्या गाड्या बिझी राहणार आहेत.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी