शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

रत्नागिरी : रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपला, आयत्यावेळचा प्रवास झाला कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 18:01 IST

फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपलाआयत्यावेळचा प्रवास झाला कठीणअनेक गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी ४०० वर

विहार तेंडुलकररत्नागिरी : फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.मे महिना हा सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक लोक सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतात. गेल्या काही वर्षात हे फॅड एवढे वाढले आहे की रेल्वे, बसेस फुल्ल होतातच; त्याशिवाय खासगी व्हॉल्वो तसेच खासगी वाहने घेऊनही अनेकजण कोकणात येतात. त्यामुळे कोकण हाऊसफुल्ल होते.कोकणात यंदा जादा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्यावेळी जर एखाद्या शहरातून मोठ्या शहरात फिरण्यासाठी जाण्याचा मनसुबा असेल, तर त्याला आता मुरड घालावी लागेल अथवा गर्दीतून लोंबकळत प्रवास करावा लागेल. अनेक रेल्वेगाड्यांची आरक्षण स्थिती पाहिल्यास आतापासूनच २०० ते ४००पर्यंत प्रतीक्षा यादी वाढली आहे. त्यामुळे आयत्यावेळी प्रवास ठरवणाऱ्या पर्यटकांना रस्त्याद्वारेच प्रवास करावा लागणार आहे.मोठ्या उन्हाळी सुट्टीत पर्यटक कोकण आणि गोव्याला मुंबईपेक्षा अधिक पसंत करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अप् (मुंबई) मार्गावरील रेल्वेगाड्यांपेक्षा डाऊन (गोवा) मार्गावरील रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी आहे. मुलांच्या परीक्षा सुरु असल्याने सध्या गर्दीचे प्रमाण कमी आहे. काही पर्यटक कोकणात येण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंतचा कालावधी निवडतात. निकालानंतर अन्यत्र फिरणेही पसंत करतात.आरक्षणही बंद झालेरत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या मे महिन्यात फुल्ल असणार आहेत. तुतारी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन्ही आरक्षित डबे, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा रेल्वे, जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्या मे महिन्यात हाऊसफुल्ल असणार आहेत. नेत्रावती एक्स्प्रेसचे तर काही दिवसांचे आरक्षणही बंद झाले आहे. मांडवी एक्स्प्रेससाठी १५०पेक्षा अधिक तर गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेससाठी १६४ ते २४० एवढी प्रतीक्षा यादी आहे.प्रतीक्षा यादीमुंबईहून कोकणात येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या तुफानी प्रतिसादात धावणार आहेत. अनेक गाड्यांचे आरक्षण आतापासूनच पूर्ण झाले आहे. तेजस एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने प्रवास करण्यासाठी सध्या ६९ ते ११० एवढ्या मोठ्या प्रमाणात, मांडवी एक्स्प्रेस २९८ ते ३९७ तर ह्यकोकणकन्याह्णमध्ये तर ३९९ ते ४७० एवढी प्रतीक्षा यादी आहे.परदेशी पर्यटक कोटाही संपलाकाही रेल्वेगाड्यांमध्ये परदेशी पर्यटकांसाठी आरक्षित कोटा असतो. हा कोटाही संपला असून, त्यामुळे मे महिन्यात देशी पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटक कोकणात किती प्रमाणात येतात, याचा अंदाज येईल.तेजस एक्स्प्रेसचा कोटाही फुल्लदेशातील सर्वात आलिशान रेल्वे असलेल्या तेजस एक्स्प्रेसचा आरक्षण कोटाही फुल्ल झाला आहे. केवळ पहिल्या आठवड्यात तेजस एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद सद्यस्थितीत त्यामानाने कमी आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून ते अगदी मे अखेरपर्यंत संपूर्ण रेल्वेगाडीचे आरक्षण पूर्ण झाले आहे.लांबपल्ल्याच्या गाड्यागरीबरथ, डबलडेकर या एक्स्प्रेस गाड्याही मे महिन्यात हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्यातील पहिल्या पाच दिवसात त्यामानाने गर्दी कमी आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये दिनांक ७, १४, २० व २१ मे या दिवसांचे आरक्षण थोड्या प्रमाणात शिल्लक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे