शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

रत्नागिरी : रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपला, आयत्यावेळचा प्रवास झाला कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 18:01 IST

फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपलाआयत्यावेळचा प्रवास झाला कठीणअनेक गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी ४०० वर

विहार तेंडुलकररत्नागिरी : फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.मे महिना हा सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक लोक सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतात. गेल्या काही वर्षात हे फॅड एवढे वाढले आहे की रेल्वे, बसेस फुल्ल होतातच; त्याशिवाय खासगी व्हॉल्वो तसेच खासगी वाहने घेऊनही अनेकजण कोकणात येतात. त्यामुळे कोकण हाऊसफुल्ल होते.कोकणात यंदा जादा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्यावेळी जर एखाद्या शहरातून मोठ्या शहरात फिरण्यासाठी जाण्याचा मनसुबा असेल, तर त्याला आता मुरड घालावी लागेल अथवा गर्दीतून लोंबकळत प्रवास करावा लागेल. अनेक रेल्वेगाड्यांची आरक्षण स्थिती पाहिल्यास आतापासूनच २०० ते ४००पर्यंत प्रतीक्षा यादी वाढली आहे. त्यामुळे आयत्यावेळी प्रवास ठरवणाऱ्या पर्यटकांना रस्त्याद्वारेच प्रवास करावा लागणार आहे.मोठ्या उन्हाळी सुट्टीत पर्यटक कोकण आणि गोव्याला मुंबईपेक्षा अधिक पसंत करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अप् (मुंबई) मार्गावरील रेल्वेगाड्यांपेक्षा डाऊन (गोवा) मार्गावरील रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी आहे. मुलांच्या परीक्षा सुरु असल्याने सध्या गर्दीचे प्रमाण कमी आहे. काही पर्यटक कोकणात येण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंतचा कालावधी निवडतात. निकालानंतर अन्यत्र फिरणेही पसंत करतात.आरक्षणही बंद झालेरत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या मे महिन्यात फुल्ल असणार आहेत. तुतारी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन्ही आरक्षित डबे, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा रेल्वे, जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्या मे महिन्यात हाऊसफुल्ल असणार आहेत. नेत्रावती एक्स्प्रेसचे तर काही दिवसांचे आरक्षणही बंद झाले आहे. मांडवी एक्स्प्रेससाठी १५०पेक्षा अधिक तर गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेससाठी १६४ ते २४० एवढी प्रतीक्षा यादी आहे.प्रतीक्षा यादीमुंबईहून कोकणात येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या तुफानी प्रतिसादात धावणार आहेत. अनेक गाड्यांचे आरक्षण आतापासूनच पूर्ण झाले आहे. तेजस एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने प्रवास करण्यासाठी सध्या ६९ ते ११० एवढ्या मोठ्या प्रमाणात, मांडवी एक्स्प्रेस २९८ ते ३९७ तर ह्यकोकणकन्याह्णमध्ये तर ३९९ ते ४७० एवढी प्रतीक्षा यादी आहे.परदेशी पर्यटक कोटाही संपलाकाही रेल्वेगाड्यांमध्ये परदेशी पर्यटकांसाठी आरक्षित कोटा असतो. हा कोटाही संपला असून, त्यामुळे मे महिन्यात देशी पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटक कोकणात किती प्रमाणात येतात, याचा अंदाज येईल.तेजस एक्स्प्रेसचा कोटाही फुल्लदेशातील सर्वात आलिशान रेल्वे असलेल्या तेजस एक्स्प्रेसचा आरक्षण कोटाही फुल्ल झाला आहे. केवळ पहिल्या आठवड्यात तेजस एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद सद्यस्थितीत त्यामानाने कमी आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून ते अगदी मे अखेरपर्यंत संपूर्ण रेल्वेगाडीचे आरक्षण पूर्ण झाले आहे.लांबपल्ल्याच्या गाड्यागरीबरथ, डबलडेकर या एक्स्प्रेस गाड्याही मे महिन्यात हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्यातील पहिल्या पाच दिवसात त्यामानाने गर्दी कमी आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये दिनांक ७, १४, २० व २१ मे या दिवसांचे आरक्षण थोड्या प्रमाणात शिल्लक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे