शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागाच्या तोट्यात निम्याहून घट-दोन कोटी ९३ लाख ४० हजाराने तोट्यात  घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:56 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला  फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे.

ठळक मुद्देसंपाचा फटका

रत्नागिरी :  राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला  फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे. एक कोटी सहा लाखाचा अतिकालिक भत्ता कमी केला आहे. शिवाय जादा गाड्यांच्या नियोजनामुळे एक कोटीची उत्पन्नात भर पडल्याने तोटा कमी करण्यास हातभार लागला आहे.

रत्नागिरी विभागात आठशे गाड्या असून दिवसाला नऊ हजार फेºया सोडण्यात येतात. याव्दारे दर दिवशी लाखो प्रवाशांची वहातूक करण्यात येते. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जावून एसटी पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एसटी धावत असल्यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. इंधन दरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळास तिकीट वाढ/भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे  एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होेत असल्याने महामंडळाकडून  दिवाळीसुट्टीत ‘हंगामी भाडेवाढ’ करण्यात आली होती. याशिवाय ‘प्रवासी वाढवा अभियान’, ‘मागेल त्याला एसटी’ यासारखे उपक्रम देखील राबविण्यात येत असतात. निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामुळे एसटीला उत्पन्न प्राप्त होत आहे. अवैध प्रवाशी वाहतूकीवर मात करण्यासाठी शटल फेºयादेखील सुरु केल्या आहेत. 

 प्रवासी खाजगी प्रवासी वहातूकीकडे वळण्यामागे एसटीचे बिघडलेले वेळापत्रक हे मुख्य कारण आहे. शिवाय स्वमालकीची वाहने वाढल्याने एसटीने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या  देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याशिवाय  ‘थेट भारमानाअभावी’  लांब पल्याच्या गाड्या बंद केल्यामुळेही महामंडळाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लांबपल्याच्या गाड्या बंद केल्याने त्या मार्गावरील प्रवासी संख्या घटत असून खाजगी वहातूकीकडे वळत आहे.

 रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये २६० कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.  (२०१७-१८) मध्ये   २५६ कोटी ८२ लाख ८७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. दोन वर्षात तब्बल ३ कोटी ७९ लाख १२ हजार रूपयांनी उत्पन्न घटले होते. २०१८-१९ चे उत्पन्न काढण्याचे काम सुरू आहे. परंतु फेब्रुवारीमध्ये तर उत्पन्नात कमालीचा फरक आहे.

टॅग्स :state transportएसटीMONEYपैसा