शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रत्नागिरी विभागाच्या तोट्यात निम्याहून घट-दोन कोटी ९३ लाख ४० हजाराने तोट्यात  घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:56 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला  फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे.

ठळक मुद्देसंपाचा फटका

रत्नागिरी :  राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला  फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे. एक कोटी सहा लाखाचा अतिकालिक भत्ता कमी केला आहे. शिवाय जादा गाड्यांच्या नियोजनामुळे एक कोटीची उत्पन्नात भर पडल्याने तोटा कमी करण्यास हातभार लागला आहे.

रत्नागिरी विभागात आठशे गाड्या असून दिवसाला नऊ हजार फेºया सोडण्यात येतात. याव्दारे दर दिवशी लाखो प्रवाशांची वहातूक करण्यात येते. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जावून एसटी पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एसटी धावत असल्यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. इंधन दरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळास तिकीट वाढ/भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे  एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होेत असल्याने महामंडळाकडून  दिवाळीसुट्टीत ‘हंगामी भाडेवाढ’ करण्यात आली होती. याशिवाय ‘प्रवासी वाढवा अभियान’, ‘मागेल त्याला एसटी’ यासारखे उपक्रम देखील राबविण्यात येत असतात. निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामुळे एसटीला उत्पन्न प्राप्त होत आहे. अवैध प्रवाशी वाहतूकीवर मात करण्यासाठी शटल फेºयादेखील सुरु केल्या आहेत. 

 प्रवासी खाजगी प्रवासी वहातूकीकडे वळण्यामागे एसटीचे बिघडलेले वेळापत्रक हे मुख्य कारण आहे. शिवाय स्वमालकीची वाहने वाढल्याने एसटीने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या  देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याशिवाय  ‘थेट भारमानाअभावी’  लांब पल्याच्या गाड्या बंद केल्यामुळेही महामंडळाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लांबपल्याच्या गाड्या बंद केल्याने त्या मार्गावरील प्रवासी संख्या घटत असून खाजगी वहातूकीकडे वळत आहे.

 रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये २६० कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.  (२०१७-१८) मध्ये   २५६ कोटी ८२ लाख ८७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. दोन वर्षात तब्बल ३ कोटी ७९ लाख १२ हजार रूपयांनी उत्पन्न घटले होते. २०१८-१९ चे उत्पन्न काढण्याचे काम सुरू आहे. परंतु फेब्रुवारीमध्ये तर उत्पन्नात कमालीचा फरक आहे.

टॅग्स :state transportएसटीMONEYपैसा