शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

रत्नागिरी :गणेशोत्सवातही रिफायनरी विरोधाचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:20 IST

नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविविध ठिकाणी उभारले देखावे विविध सण, समारंभांमध्येही प्रकल्पाचा विरोध येतोय उफाळून

राजापूर : नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले आहेत.मागील काही महिने नाणारमधील रिफायनरी प्रकल्पावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. स्थानिक पातळीपासून ते मंबई, दिल्लीपर्यंत हादरे देण्याचे काम या प्रकल्पाविरुध्द आंदोलनांमधून सुरू आहे. प्रकल्प परिसरातील चौदा गावांतील जनतेची तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्पच रद्द करा, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

पण शासन मात्र हा प्रकल्प रेटून नेण्याच्या तयारीत असल्याने सुरु असलेला संघर्ष अधिकच पेटत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष विरहित ही आंदोलन करून प्रकल्पग्रस्तांनी एकजूट दाखवून दिली आहे.केंद्र्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवगळता उर्वरित राजकीय पक्ष रिफायनरीविरोधात उभे ठाकले आहेत. तरीही शासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संतप्त जनतेने आपला लढा व्यापक बनविला असून, मागील काही महिने कोकणात साजऱ्यां झालेल्या काही सणांदरम्यान नाणार विरोधाचे दर्शन घडले होते.यापूर्वी होळी सणादरम्यान रिफायनरी प्रकल्पाची होळी पेटवताना शासनाचा निषेध म्हणून बोंबा मारण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर रिफायनरीविरोधात काळ्या गुढ्या उभारुन विरोध व्यक्त करण्यात आला होता. आषाढी एकादशीच्या दिवसात सागवे परिसरात, तर मुंबईत प्रकल्पविरोधात दिंड्या काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी सणाच्या दिवशी प्रकल्पाविरोधी नारा देण्यात आला होता.गणपती उत्सवात रिफायनरीला विरोध करणारे देखावे ठिकठिकाणी बनविण्यात आले आहेत. यामध्ये प्रकल्पाची घातकता, पूर्वीचे कोकण व रिफायनरी प्रकल्प मार्गी लागल्यानंतरचे कोकण याची तुलना करणारे वास्तव दाखविले गेले आहे. रिफायनरीविरोधी देखाव्यांसह बॅनरबाजी व रांगोळीतून प्रखर विरोधाचे दर्शन घडविले गेले आहे. सागवेतील भूमिकन्या एकता मंचाच्या वतीने प्रकल्पविरोधातील जनजागृती करणारी काढण्यात आलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.विघ्नांचे हरण करणाऱ्या गणराया, आता तूच आमच्या कोकणावर आलेले हे विघ्न तत्काळ दूर कर व निसर्गरम्य कोकण वाचवह्ण, अशी आर्त साद घालणारे बॅनरही लक्षवेधी ठरले आहेत. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी