शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रत्नागिरी :गणेशोत्सवातही रिफायनरी विरोधाचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:20 IST

नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविविध ठिकाणी उभारले देखावे विविध सण, समारंभांमध्येही प्रकल्पाचा विरोध येतोय उफाळून

राजापूर : नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले आहेत.मागील काही महिने नाणारमधील रिफायनरी प्रकल्पावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. स्थानिक पातळीपासून ते मंबई, दिल्लीपर्यंत हादरे देण्याचे काम या प्रकल्पाविरुध्द आंदोलनांमधून सुरू आहे. प्रकल्प परिसरातील चौदा गावांतील जनतेची तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्पच रद्द करा, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

पण शासन मात्र हा प्रकल्प रेटून नेण्याच्या तयारीत असल्याने सुरु असलेला संघर्ष अधिकच पेटत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष विरहित ही आंदोलन करून प्रकल्पग्रस्तांनी एकजूट दाखवून दिली आहे.केंद्र्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवगळता उर्वरित राजकीय पक्ष रिफायनरीविरोधात उभे ठाकले आहेत. तरीही शासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संतप्त जनतेने आपला लढा व्यापक बनविला असून, मागील काही महिने कोकणात साजऱ्यां झालेल्या काही सणांदरम्यान नाणार विरोधाचे दर्शन घडले होते.यापूर्वी होळी सणादरम्यान रिफायनरी प्रकल्पाची होळी पेटवताना शासनाचा निषेध म्हणून बोंबा मारण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर रिफायनरीविरोधात काळ्या गुढ्या उभारुन विरोध व्यक्त करण्यात आला होता. आषाढी एकादशीच्या दिवसात सागवे परिसरात, तर मुंबईत प्रकल्पविरोधात दिंड्या काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी सणाच्या दिवशी प्रकल्पाविरोधी नारा देण्यात आला होता.गणपती उत्सवात रिफायनरीला विरोध करणारे देखावे ठिकठिकाणी बनविण्यात आले आहेत. यामध्ये प्रकल्पाची घातकता, पूर्वीचे कोकण व रिफायनरी प्रकल्प मार्गी लागल्यानंतरचे कोकण याची तुलना करणारे वास्तव दाखविले गेले आहे. रिफायनरीविरोधी देखाव्यांसह बॅनरबाजी व रांगोळीतून प्रखर विरोधाचे दर्शन घडविले गेले आहे. सागवेतील भूमिकन्या एकता मंचाच्या वतीने प्रकल्पविरोधातील जनजागृती करणारी काढण्यात आलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.विघ्नांचे हरण करणाऱ्या गणराया, आता तूच आमच्या कोकणावर आलेले हे विघ्न तत्काळ दूर कर व निसर्गरम्य कोकण वाचवह्ण, अशी आर्त साद घालणारे बॅनरही लक्षवेधी ठरले आहेत. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी