शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

रत्नागिरी : विकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:35 IST

विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.

ठळक मुद्देविकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहितीनाणार प्रकल्पग्रस्तांचा अभ्यास दौरा

राजापूर : आपल्या परिसराच्या सर्वांगिण विकासासह रोजगाराची साधने उपलब्ध करायची असतील तर रिफायनरी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही हे पानिपत येथील रिफायनरीवरुन सिध्द झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील गावांचा कायापालट झाला आहे. हा प्रकल्प सुरु होऊन वीस वर्षांचा कालावधी लोटत आला.

या दरम्यान कुठल्याच प्रकारचे धोके किंवा नुकसान झाल्याची एकही घटना याठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबत अनाठायी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.देशातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार परिसरातील सुमारे चौदा गावांमध्ये होत आहे. मागील दोन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेमध्ये विरोधाचे वातावरण आहे. या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेत निर्माण झालेल्या शंका - कुशंकांचे निरसन करण्यासाठी व सत्यस्थिती पुढे यावी, यासाठी रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने हरयाणा राज्यातील पानिपत येथील रिफायनरी प्रकल्पाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात नाणार परिसरातील काही शेतकरी, जमीनदार, बागायतदार आणि पत्रकार यांचा सामावेश होता.त्यांनी यावेळी पानिपत परिसरातील काही आजी - माजी सरपंचांशी संवाद साधला. त्यामध्ये खोराखेरीचे सरपंच रणजीतसिंग कश्यप, कुथन गावचे सरपंच बलवानसिंग, सिंथानाचे सरपंच सतपालसिंग, दादलानाचे सरपंच दीपक राणा, त्याच गावचे माजी सरपंच नैनपाल राणा, बाहोली गावचे माजी सरपंच सरदार सज्जनसिंग यांचा समावेश होता. यावेळी येथील अधिकाऱ्यांशीही नाणार परिसरातील ग्रामस्थांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान नाणार परिसरात येऊन तेथील जनतेशी रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.अनाठायी भीतीमागील अनेक वर्षे पानिपतचा हा संपूर्ण परिसर हिरवागार असाच राहिला आहे. या परिसरात पशुपक्षी मुक्तपणे वावरतात. झाडे आहेत, येथील पाणीही प्रदूषित झालेले नाही. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटी माहिती पसरवून अनाठायी भीती निर्माण केली जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग