शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

रत्नागिरी : विकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:35 IST

विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.

ठळक मुद्देविकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहितीनाणार प्रकल्पग्रस्तांचा अभ्यास दौरा

राजापूर : आपल्या परिसराच्या सर्वांगिण विकासासह रोजगाराची साधने उपलब्ध करायची असतील तर रिफायनरी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही हे पानिपत येथील रिफायनरीवरुन सिध्द झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील गावांचा कायापालट झाला आहे. हा प्रकल्प सुरु होऊन वीस वर्षांचा कालावधी लोटत आला.

या दरम्यान कुठल्याच प्रकारचे धोके किंवा नुकसान झाल्याची एकही घटना याठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबत अनाठायी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.देशातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार परिसरातील सुमारे चौदा गावांमध्ये होत आहे. मागील दोन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेमध्ये विरोधाचे वातावरण आहे. या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेत निर्माण झालेल्या शंका - कुशंकांचे निरसन करण्यासाठी व सत्यस्थिती पुढे यावी, यासाठी रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने हरयाणा राज्यातील पानिपत येथील रिफायनरी प्रकल्पाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात नाणार परिसरातील काही शेतकरी, जमीनदार, बागायतदार आणि पत्रकार यांचा सामावेश होता.त्यांनी यावेळी पानिपत परिसरातील काही आजी - माजी सरपंचांशी संवाद साधला. त्यामध्ये खोराखेरीचे सरपंच रणजीतसिंग कश्यप, कुथन गावचे सरपंच बलवानसिंग, सिंथानाचे सरपंच सतपालसिंग, दादलानाचे सरपंच दीपक राणा, त्याच गावचे माजी सरपंच नैनपाल राणा, बाहोली गावचे माजी सरपंच सरदार सज्जनसिंग यांचा समावेश होता. यावेळी येथील अधिकाऱ्यांशीही नाणार परिसरातील ग्रामस्थांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान नाणार परिसरात येऊन तेथील जनतेशी रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.अनाठायी भीतीमागील अनेक वर्षे पानिपतचा हा संपूर्ण परिसर हिरवागार असाच राहिला आहे. या परिसरात पशुपक्षी मुक्तपणे वावरतात. झाडे आहेत, येथील पाणीही प्रदूषित झालेले नाही. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटी माहिती पसरवून अनाठायी भीती निर्माण केली जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग