शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

रत्नागिरी : विकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:35 IST

विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.

ठळक मुद्देविकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहितीनाणार प्रकल्पग्रस्तांचा अभ्यास दौरा

राजापूर : आपल्या परिसराच्या सर्वांगिण विकासासह रोजगाराची साधने उपलब्ध करायची असतील तर रिफायनरी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही हे पानिपत येथील रिफायनरीवरुन सिध्द झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील गावांचा कायापालट झाला आहे. हा प्रकल्प सुरु होऊन वीस वर्षांचा कालावधी लोटत आला.

या दरम्यान कुठल्याच प्रकारचे धोके किंवा नुकसान झाल्याची एकही घटना याठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबत अनाठायी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.देशातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार परिसरातील सुमारे चौदा गावांमध्ये होत आहे. मागील दोन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेमध्ये विरोधाचे वातावरण आहे. या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेत निर्माण झालेल्या शंका - कुशंकांचे निरसन करण्यासाठी व सत्यस्थिती पुढे यावी, यासाठी रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने हरयाणा राज्यातील पानिपत येथील रिफायनरी प्रकल्पाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात नाणार परिसरातील काही शेतकरी, जमीनदार, बागायतदार आणि पत्रकार यांचा सामावेश होता.त्यांनी यावेळी पानिपत परिसरातील काही आजी - माजी सरपंचांशी संवाद साधला. त्यामध्ये खोराखेरीचे सरपंच रणजीतसिंग कश्यप, कुथन गावचे सरपंच बलवानसिंग, सिंथानाचे सरपंच सतपालसिंग, दादलानाचे सरपंच दीपक राणा, त्याच गावचे माजी सरपंच नैनपाल राणा, बाहोली गावचे माजी सरपंच सरदार सज्जनसिंग यांचा समावेश होता. यावेळी येथील अधिकाऱ्यांशीही नाणार परिसरातील ग्रामस्थांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान नाणार परिसरात येऊन तेथील जनतेशी रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.अनाठायी भीतीमागील अनेक वर्षे पानिपतचा हा संपूर्ण परिसर हिरवागार असाच राहिला आहे. या परिसरात पशुपक्षी मुक्तपणे वावरतात. झाडे आहेत, येथील पाणीही प्रदूषित झालेले नाही. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटी माहिती पसरवून अनाठायी भीती निर्माण केली जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग