शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या ११ हजार अर्जांची पुनर्तपासणी, यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:04 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ग्रीन लीस्टमध्ये ३२ हजार २६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, ११ हजार ४ शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आले आहेत. या अर्जांची सध्या पुनर्तपासणी सुरू आहे. आता सर्व बँकांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ११ हजार अर्जांची पुनर्तपासणी यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ग्रीन लीस्टमध्ये ३२ हजार २६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, ११ हजार ४ शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आले आहेत. या अर्जांची सध्या पुनर्तपासणी सुरू आहे. आता सर्व बँकांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.अपुऱ्या पावसामुळे खरीप - रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादकता घटली. परिणामी नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला, अनेक शेतकरी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करु शकले नव्हते.

शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेता आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील २७ हजार ६४ शेतकऱ्यांना ७२ कोटी ८७ लाख ६० हजार ६६ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान जाहीर करताना या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाखावरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली.

शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील १६ हजार २९८ शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाख ८६ हजार ६६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.तसेच राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या १० हजार ७६६ शेतकऱ्यांना ४५ कोटी २९ लाख ८० हजार रुपये कर्जमाफी मिळाली आहे. जिल्ह्यातील एकूण २७ हजार ६४ एवढ्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेंतर्गत ७२ कोटी ८७ लाख ६० हजार ६६ रूपये इतकी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ९ हजार ६६ शेतकऱ्यांना १९ कोटी ७९ लाख ४२ हजार ४३३ रूपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या एकूण ७ हजार २३२ शेतकऱ्यांना ७ कोटी ७८ लाख ४३ हजार ६३३ रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे. 

निकषात बसणारे शेतकरी वंचित राहू नयेतछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ११ हजार ४ शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटींच्या पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आले आहेत. निकषात बसणारे अर्जदार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, म्हणून अशा शेतकऱ्यांच्या अर्जातील माहितीची बँकेकडील असलेल्या माहितीच्या आधारे तपासणी सध्या सर्व बँकामध्ये सुरू झाली आहे. ५ फेब्रुवारीपर्यत अर्ज तपासणीचे काम पूर्ण करून शासनाकडे पाठविले जाणार आहेत.- बकुळा माळी,जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी.

 

जबाबदारी समितीकडेनिकषात बसणारे अर्जदार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी अशा शेतकऱ्यांच्या अर्जातील माहितीची शहानिशा करून त्याची पात्रता / अपात्रता निश्चित करण्याची जबाबदारी समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारीपर्यंत पिवळी यादीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.अर्जामध्ये अपुरी माहितीबँकांनी पुरवलेल्या कर्जखात्यांच्या माहितीतील त्रुटी तसेच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे ताळमेळ बसू शकला नाही, अशा प्रकरणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निर्णय घेणे शक्य होत नाही.आवश्यक दुरूस्ती करणारशेतकऱ्यांसंबधी माहितीची शहानिशा करून त्यामध्ये आवश्यक ती दुरूस्ती बँकेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुकास्तरीय समितीतर्फे तपासणीअंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करून लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी