शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

औद्योगिकीकरण, इतर क्षेत्रांमध्ये न झालेल्या प्रगतीमुळे गरिबीत रत्नागिरी राज्यात १३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 17:55 IST

कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.

रत्नागिरी : औद्याेगिकीकरणाला सातत्याने बसणारी खीळ आणि इतर क्षेत्रांमध्ये न झालेली प्रगती यामुळे रत्नागिरी जिल्हा गरिबीत राज्यात १३ व्या स्थानावर आहे. कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.

निती आयोगाने देशातील गरिबीचा निर्देशांक जाहीर केला आहे. त्यानुसार रत्नागिरी गरिबीत १३ व्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक वर्षांत रोजगाराच्या संधी नसल्याने वर्षानुवर्षे नागरिकांचे मुंबईकडे स्थलांतर सुरूच आहे. उत्पन्नाचे मार्ग बळकट होणार नाहीत, तोवर रत्नागिरीची स्थिती अशीच राहण्याची भीती आहे.

विभागात सर्वाधिक गरीब आम्हीच

कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच आहे. रत्नागिरी राज्यात १३ वा आहे. सिंधुदुर्ग राज्यात २० वा आहे, रायगड जिल्हा राज्यात २१ वा आहे, तर मुंबई हा कोकण विभागातील सर्वांत श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र बदलेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?

राज्यातील सर्वांत गरीब जिल्हे म्हणून पहिल्या दहा क्रमांकात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत. यात नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, वाशिम व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कधी बदलणार नशीब?

-पर्यटनातून विकासाच्या गप्पा खूप झाल्या. मात्र, अजूनपर्यंत त्याबाबत ठोस असे काहीच झाले नसल्याने रोजगाराच्या संधी खुंटलेल्याच आहेत.

-१९९५ साली रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषणा झाली; पण त्याला अनुसरून बदल न झाल्याने त्यातून विकास झाला नाही.

प्रकल्पांची कास धरली नाही, तर...

विस्तीर्ण समुद्रकिनारा मिळाला असला तरी पर्यटनातून जिल्ह्याचा विकास होण्यावर खूप मर्यादा आहेत. त्यासाठी प्रकल्पांची कास धरणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या प्रकल्पांपेक्षा येथून घालवलेल्या प्रकल्पांची संख्याच अधिक आहे. जोपर्यंत मोठे प्रकल्प येणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यायाने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा विकास होणार नाही. जोपर्यंत रोजगाराचे ठोस साधन मिळत नाही, तोपर्यंत गरिबीचे प्रमाण कमी होणे ही अशक्य गाेष्ट आहे. -अविनाश महाजन, राजापूर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी