शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

औद्योगिकीकरण, इतर क्षेत्रांमध्ये न झालेल्या प्रगतीमुळे गरिबीत रत्नागिरी राज्यात १३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 17:55 IST

कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.

रत्नागिरी : औद्याेगिकीकरणाला सातत्याने बसणारी खीळ आणि इतर क्षेत्रांमध्ये न झालेली प्रगती यामुळे रत्नागिरी जिल्हा गरिबीत राज्यात १३ व्या स्थानावर आहे. कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.

निती आयोगाने देशातील गरिबीचा निर्देशांक जाहीर केला आहे. त्यानुसार रत्नागिरी गरिबीत १३ व्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक वर्षांत रोजगाराच्या संधी नसल्याने वर्षानुवर्षे नागरिकांचे मुंबईकडे स्थलांतर सुरूच आहे. उत्पन्नाचे मार्ग बळकट होणार नाहीत, तोवर रत्नागिरीची स्थिती अशीच राहण्याची भीती आहे.

विभागात सर्वाधिक गरीब आम्हीच

कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच आहे. रत्नागिरी राज्यात १३ वा आहे. सिंधुदुर्ग राज्यात २० वा आहे, रायगड जिल्हा राज्यात २१ वा आहे, तर मुंबई हा कोकण विभागातील सर्वांत श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र बदलेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?

राज्यातील सर्वांत गरीब जिल्हे म्हणून पहिल्या दहा क्रमांकात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत. यात नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, वाशिम व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कधी बदलणार नशीब?

-पर्यटनातून विकासाच्या गप्पा खूप झाल्या. मात्र, अजूनपर्यंत त्याबाबत ठोस असे काहीच झाले नसल्याने रोजगाराच्या संधी खुंटलेल्याच आहेत.

-१९९५ साली रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषणा झाली; पण त्याला अनुसरून बदल न झाल्याने त्यातून विकास झाला नाही.

प्रकल्पांची कास धरली नाही, तर...

विस्तीर्ण समुद्रकिनारा मिळाला असला तरी पर्यटनातून जिल्ह्याचा विकास होण्यावर खूप मर्यादा आहेत. त्यासाठी प्रकल्पांची कास धरणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या प्रकल्पांपेक्षा येथून घालवलेल्या प्रकल्पांची संख्याच अधिक आहे. जोपर्यंत मोठे प्रकल्प येणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यायाने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा विकास होणार नाही. जोपर्यंत रोजगाराचे ठोस साधन मिळत नाही, तोपर्यंत गरिबीचे प्रमाण कमी होणे ही अशक्य गाेष्ट आहे. -अविनाश महाजन, राजापूर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी