शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिकीकरण, इतर क्षेत्रांमध्ये न झालेल्या प्रगतीमुळे गरिबीत रत्नागिरी राज्यात १३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 17:55 IST

कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.

रत्नागिरी : औद्याेगिकीकरणाला सातत्याने बसणारी खीळ आणि इतर क्षेत्रांमध्ये न झालेली प्रगती यामुळे रत्नागिरी जिल्हा गरिबीत राज्यात १३ व्या स्थानावर आहे. कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.

निती आयोगाने देशातील गरिबीचा निर्देशांक जाहीर केला आहे. त्यानुसार रत्नागिरी गरिबीत १३ व्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक वर्षांत रोजगाराच्या संधी नसल्याने वर्षानुवर्षे नागरिकांचे मुंबईकडे स्थलांतर सुरूच आहे. उत्पन्नाचे मार्ग बळकट होणार नाहीत, तोवर रत्नागिरीची स्थिती अशीच राहण्याची भीती आहे.

विभागात सर्वाधिक गरीब आम्हीच

कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच आहे. रत्नागिरी राज्यात १३ वा आहे. सिंधुदुर्ग राज्यात २० वा आहे, रायगड जिल्हा राज्यात २१ वा आहे, तर मुंबई हा कोकण विभागातील सर्वांत श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र बदलेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?

राज्यातील सर्वांत गरीब जिल्हे म्हणून पहिल्या दहा क्रमांकात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत. यात नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, वाशिम व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कधी बदलणार नशीब?

-पर्यटनातून विकासाच्या गप्पा खूप झाल्या. मात्र, अजूनपर्यंत त्याबाबत ठोस असे काहीच झाले नसल्याने रोजगाराच्या संधी खुंटलेल्याच आहेत.

-१९९५ साली रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषणा झाली; पण त्याला अनुसरून बदल न झाल्याने त्यातून विकास झाला नाही.

प्रकल्पांची कास धरली नाही, तर...

विस्तीर्ण समुद्रकिनारा मिळाला असला तरी पर्यटनातून जिल्ह्याचा विकास होण्यावर खूप मर्यादा आहेत. त्यासाठी प्रकल्पांची कास धरणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या प्रकल्पांपेक्षा येथून घालवलेल्या प्रकल्पांची संख्याच अधिक आहे. जोपर्यंत मोठे प्रकल्प येणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यायाने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा विकास होणार नाही. जोपर्यंत रोजगाराचे ठोस साधन मिळत नाही, तोपर्यंत गरिबीचे प्रमाण कमी होणे ही अशक्य गाेष्ट आहे. -अविनाश महाजन, राजापूर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी