शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

रत्नागिरी :  रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:25 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्दे रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवीअशोक वालम यांची अस्तित्वासाठी धडपड

राजापूर : नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.दोन दिवसांपूर्वी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. अयोध्येतील राममंदिरप्रकरणी जनतेला हाक देणा?्या उध्दव ठाकरेन्ना नाणार प्रकल्पामुळे आमची भुईसपाट होणारी त्र्येपन्न मंदिरे दिसली नाहीत का असा सवाल उपस्थित करीत ठाकरेंचे रामप्रेम व हिंदुत्व हे बेगडी असल्याचा आरोप केला होता. त्याला आमदार राजन साळवी यांनी सडेतोड उत्तर दिले.शिवसेनेने राममंदिर प्रश्नापासून रिफायनरी प्रकल्पाबाबत सातत्याने ठोस अशीच भूमिका घेतली असून त्या भूमिकेत कधीच बदल केलेला नसल्याचे आमदार साळवी यांनी निदर्शनास आणून दिले. अयोध्येत रामंदिर व्हावे, ही शिवसेनाप्रमुखांची इच्छ होती. ज्यावेळी बाबरीचे पतन झाले, त्यावेळी देशात उद्भवलेल्या पररिस्थितीमध्ये त्या घटनेची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नव्हते.

भाजप नेत्यांनी तर शिवसैनिकांनी मशीद पाडल्याचे विधान केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ती जबाबदारी स्विकारताना जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ठणकावुन सांगितले होते. याची आठवण करुन देताना आमदार साळवी यांनी राममंदिरचा मुद्दा शिवसेनेने सोडलेला नसल्याचे स्पष्ट केले.राममंदिरच्या मुद्द्यावरुन केंद्र्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने मागील साडेचार वर्षात न्यायालयाचा आधार घेताना मंदिर निर्माणप्रकरणी मुद्द्याला बगल द्यायचा प्रयत्न चालविला आहे. पण आम्ही राममंदिर उभारणीबाबत ठाम असल्याचे सांगून आमच्या भूमिकेवर वालम यांनी बोलूच नये, अशा शब्दात त्यांनी अशोक वालम यान्ना फटकारले.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केलेली आहे. आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारबाबत काढलेली अधिसुचना रद्द करीत असल्याची घोषणा सागवे येथे पार पडलेल्या सभेत केली होती.

त्यानंतर उद्योग मंत्रालयाकडुन ती अधिसूचना रद्द करण्यासाठी अवश्यक असलेली पुर्तता केली आहे . पण तो विषय राज्याच्या कॅबिनेटपुढे येणार असून आता ती बाब मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीत असताना त्याचा विचार न करता अशोक वालम सत्ताधारी भाजपाबद्दल काहीच न बोलता केवळ शिवसेनेवरच टिका करीत आहेत.अशोक वालम यांना कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर जावून त्यांची वेगवेगळी मते असतात. आपल्या अस्तित्वासाठी वालम यांची जोरदार धडपड सुरु असून त्यातून कसे बाहेर पडायचे याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे साळवी म्हणाले.

सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवूयापूर्वी रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई, नागपूरमधील आंदोलनाला आम्ही सहभाग घेतला होता. पण प्रत्येकवेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्यासहित आमदार म्हणून आपल्यावर नाहक टिका करण्यात आली. जर आम्हाला असे अपमानीत केले जाणार असेल तर आंदोलनस्थळी न जाता आम्ही सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवू, असे सांगून यापुढे वालम यांच्या आंदोलनासमवेत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे आमदार साळवी यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीnanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी