शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रत्नागिरी :  रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:25 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्दे रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवीअशोक वालम यांची अस्तित्वासाठी धडपड

राजापूर : नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.दोन दिवसांपूर्वी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. अयोध्येतील राममंदिरप्रकरणी जनतेला हाक देणा?्या उध्दव ठाकरेन्ना नाणार प्रकल्पामुळे आमची भुईसपाट होणारी त्र्येपन्न मंदिरे दिसली नाहीत का असा सवाल उपस्थित करीत ठाकरेंचे रामप्रेम व हिंदुत्व हे बेगडी असल्याचा आरोप केला होता. त्याला आमदार राजन साळवी यांनी सडेतोड उत्तर दिले.शिवसेनेने राममंदिर प्रश्नापासून रिफायनरी प्रकल्पाबाबत सातत्याने ठोस अशीच भूमिका घेतली असून त्या भूमिकेत कधीच बदल केलेला नसल्याचे आमदार साळवी यांनी निदर्शनास आणून दिले. अयोध्येत रामंदिर व्हावे, ही शिवसेनाप्रमुखांची इच्छ होती. ज्यावेळी बाबरीचे पतन झाले, त्यावेळी देशात उद्भवलेल्या पररिस्थितीमध्ये त्या घटनेची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नव्हते.

भाजप नेत्यांनी तर शिवसैनिकांनी मशीद पाडल्याचे विधान केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ती जबाबदारी स्विकारताना जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ठणकावुन सांगितले होते. याची आठवण करुन देताना आमदार साळवी यांनी राममंदिरचा मुद्दा शिवसेनेने सोडलेला नसल्याचे स्पष्ट केले.राममंदिरच्या मुद्द्यावरुन केंद्र्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने मागील साडेचार वर्षात न्यायालयाचा आधार घेताना मंदिर निर्माणप्रकरणी मुद्द्याला बगल द्यायचा प्रयत्न चालविला आहे. पण आम्ही राममंदिर उभारणीबाबत ठाम असल्याचे सांगून आमच्या भूमिकेवर वालम यांनी बोलूच नये, अशा शब्दात त्यांनी अशोक वालम यान्ना फटकारले.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केलेली आहे. आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारबाबत काढलेली अधिसुचना रद्द करीत असल्याची घोषणा सागवे येथे पार पडलेल्या सभेत केली होती.

त्यानंतर उद्योग मंत्रालयाकडुन ती अधिसूचना रद्द करण्यासाठी अवश्यक असलेली पुर्तता केली आहे . पण तो विषय राज्याच्या कॅबिनेटपुढे येणार असून आता ती बाब मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीत असताना त्याचा विचार न करता अशोक वालम सत्ताधारी भाजपाबद्दल काहीच न बोलता केवळ शिवसेनेवरच टिका करीत आहेत.अशोक वालम यांना कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर जावून त्यांची वेगवेगळी मते असतात. आपल्या अस्तित्वासाठी वालम यांची जोरदार धडपड सुरु असून त्यातून कसे बाहेर पडायचे याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे साळवी म्हणाले.

सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवूयापूर्वी रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई, नागपूरमधील आंदोलनाला आम्ही सहभाग घेतला होता. पण प्रत्येकवेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्यासहित आमदार म्हणून आपल्यावर नाहक टिका करण्यात आली. जर आम्हाला असे अपमानीत केले जाणार असेल तर आंदोलनस्थळी न जाता आम्ही सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवू, असे सांगून यापुढे वालम यांच्या आंदोलनासमवेत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे आमदार साळवी यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीnanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी