शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

रत्नागिरी :  रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:25 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्दे रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवीअशोक वालम यांची अस्तित्वासाठी धडपड

राजापूर : नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.दोन दिवसांपूर्वी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. अयोध्येतील राममंदिरप्रकरणी जनतेला हाक देणा?्या उध्दव ठाकरेन्ना नाणार प्रकल्पामुळे आमची भुईसपाट होणारी त्र्येपन्न मंदिरे दिसली नाहीत का असा सवाल उपस्थित करीत ठाकरेंचे रामप्रेम व हिंदुत्व हे बेगडी असल्याचा आरोप केला होता. त्याला आमदार राजन साळवी यांनी सडेतोड उत्तर दिले.शिवसेनेने राममंदिर प्रश्नापासून रिफायनरी प्रकल्पाबाबत सातत्याने ठोस अशीच भूमिका घेतली असून त्या भूमिकेत कधीच बदल केलेला नसल्याचे आमदार साळवी यांनी निदर्शनास आणून दिले. अयोध्येत रामंदिर व्हावे, ही शिवसेनाप्रमुखांची इच्छ होती. ज्यावेळी बाबरीचे पतन झाले, त्यावेळी देशात उद्भवलेल्या पररिस्थितीमध्ये त्या घटनेची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नव्हते.

भाजप नेत्यांनी तर शिवसैनिकांनी मशीद पाडल्याचे विधान केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ती जबाबदारी स्विकारताना जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ठणकावुन सांगितले होते. याची आठवण करुन देताना आमदार साळवी यांनी राममंदिरचा मुद्दा शिवसेनेने सोडलेला नसल्याचे स्पष्ट केले.राममंदिरच्या मुद्द्यावरुन केंद्र्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने मागील साडेचार वर्षात न्यायालयाचा आधार घेताना मंदिर निर्माणप्रकरणी मुद्द्याला बगल द्यायचा प्रयत्न चालविला आहे. पण आम्ही राममंदिर उभारणीबाबत ठाम असल्याचे सांगून आमच्या भूमिकेवर वालम यांनी बोलूच नये, अशा शब्दात त्यांनी अशोक वालम यान्ना फटकारले.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केलेली आहे. आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारबाबत काढलेली अधिसुचना रद्द करीत असल्याची घोषणा सागवे येथे पार पडलेल्या सभेत केली होती.

त्यानंतर उद्योग मंत्रालयाकडुन ती अधिसूचना रद्द करण्यासाठी अवश्यक असलेली पुर्तता केली आहे . पण तो विषय राज्याच्या कॅबिनेटपुढे येणार असून आता ती बाब मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीत असताना त्याचा विचार न करता अशोक वालम सत्ताधारी भाजपाबद्दल काहीच न बोलता केवळ शिवसेनेवरच टिका करीत आहेत.अशोक वालम यांना कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर जावून त्यांची वेगवेगळी मते असतात. आपल्या अस्तित्वासाठी वालम यांची जोरदार धडपड सुरु असून त्यातून कसे बाहेर पडायचे याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे साळवी म्हणाले.

सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवूयापूर्वी रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई, नागपूरमधील आंदोलनाला आम्ही सहभाग घेतला होता. पण प्रत्येकवेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्यासहित आमदार म्हणून आपल्यावर नाहक टिका करण्यात आली. जर आम्हाला असे अपमानीत केले जाणार असेल तर आंदोलनस्थळी न जाता आम्ही सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवू, असे सांगून यापुढे वालम यांच्या आंदोलनासमवेत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे आमदार साळवी यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीnanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी