शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रत्नागिरी :पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस, सुरुवातीपासूनच दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:25 IST

पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे.

ठळक मुद्देपहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस, सुरुवातीपासूनच दिलासामहिनाभर पावसाची अविश्रांत हजेरी

रत्नागिरी : पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे.यावर्षी मान्सूनला सुरूवात होण्याआधीच मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात सुरू होता. यावर्षी मान्सूनच्या पावसानेही हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात वेळेवर हजेरी लावली. पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी थोड्या दिवसानी विश्रांती घेईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, तोही यावर्षीच्या पावसाने फोल ठरवला.अगदी सात जूनपासून नियमित झालेला पाऊस मध्यंतराच्या काळामध्ये अगदी थोड्याशा विश्रांतीने पुन्हा सुरू झाला आहे. जिल्ह्यात २१ जूनपासून पावसाने न थांबता हजेरी लावली आहे. संततधार सुरू असल्याने शेतीच्या कामालाही वेग आला आहे. जिल्ह्याच्या काही भागात तर लावणीलाही वेग आला आहे.पावसामुळे जिल्ह्यातील घरे, गोठे यांच्या पडझडीलाही प्रारंभ झाला आहे. गेल्या जून महिन्याच्या ३० तारखेपर्यंत ८८८.४४ मिलिमीटर पाऊस पडला होता, तर यावर्षी ३० जूनअखेर १२५५.७२ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे. म्हणजेच तब्बल ३६७.२८ मिलिमीटर अधिक पाऊस यावर्षी झाला आहे.

पावसाची वाटचाल अशीच सुरू आहे. त्यामुळे आता एकूण पाऊस १४८९ मिलिमीटर इतका झाला आहे. गतवर्षी या कालावधीत १०१७.२९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होती. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाची आगेकूच सुरू असून, आतापर्यंत ४७१ मिलिमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे. मात्र, या काळात जिल्ह्यात कुठे पाणी भरण्याच्या घटना घडल्या नाहीत.सध्याही पावसाचा जोर काही दिवस तरी कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, संततधार पावसामुळे गारवा आला आहे. दरम्यान, पावसाची सुरूवात तसेच एकंदरीत वाटचाल चांगली सुरू असल्याने जिल्ह्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी