शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रत्नागिरी :पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस, सुरुवातीपासूनच दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:25 IST

पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे.

ठळक मुद्देपहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस, सुरुवातीपासूनच दिलासामहिनाभर पावसाची अविश्रांत हजेरी

रत्नागिरी : पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे.यावर्षी मान्सूनला सुरूवात होण्याआधीच मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात सुरू होता. यावर्षी मान्सूनच्या पावसानेही हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात वेळेवर हजेरी लावली. पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी थोड्या दिवसानी विश्रांती घेईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, तोही यावर्षीच्या पावसाने फोल ठरवला.अगदी सात जूनपासून नियमित झालेला पाऊस मध्यंतराच्या काळामध्ये अगदी थोड्याशा विश्रांतीने पुन्हा सुरू झाला आहे. जिल्ह्यात २१ जूनपासून पावसाने न थांबता हजेरी लावली आहे. संततधार सुरू असल्याने शेतीच्या कामालाही वेग आला आहे. जिल्ह्याच्या काही भागात तर लावणीलाही वेग आला आहे.पावसामुळे जिल्ह्यातील घरे, गोठे यांच्या पडझडीलाही प्रारंभ झाला आहे. गेल्या जून महिन्याच्या ३० तारखेपर्यंत ८८८.४४ मिलिमीटर पाऊस पडला होता, तर यावर्षी ३० जूनअखेर १२५५.७२ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे. म्हणजेच तब्बल ३६७.२८ मिलिमीटर अधिक पाऊस यावर्षी झाला आहे.

पावसाची वाटचाल अशीच सुरू आहे. त्यामुळे आता एकूण पाऊस १४८९ मिलिमीटर इतका झाला आहे. गतवर्षी या कालावधीत १०१७.२९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होती. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाची आगेकूच सुरू असून, आतापर्यंत ४७१ मिलिमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे. मात्र, या काळात जिल्ह्यात कुठे पाणी भरण्याच्या घटना घडल्या नाहीत.सध्याही पावसाचा जोर काही दिवस तरी कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, संततधार पावसामुळे गारवा आला आहे. दरम्यान, पावसाची सुरूवात तसेच एकंदरीत वाटचाल चांगली सुरू असल्याने जिल्ह्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी