शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:50 IST

विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.

ठळक मुद्देघरकुलाच्या निकषात बदल करण्याची संजय सुतार यांनी केली मागणीग्रामीण भागात जाणाऱ्या काही बंद गाड्या पूर्ववत सुरु करण्याची मागणीअपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिलांबाबत मुद्दा उपस्थित.

राजापूर : विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.गुरुवारी येथील श्री मंगल कार्यालयात राजापूर पंचायत समितीची आमसभा पार पडली. सभेच्या प्रारंभी नाणार परिसरातील जनतेचा प्रचंड विरोध असतानादेखील शासनाने रिफायनरी प्रकल्प लादल्याने याचा जोरदार निषेध करण्यात आला.

तालुक्यातील महावितरणच्या समस्या या सभेत मांडण्यात आल्या. त्यामध्ये अपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिले याविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील उन्हाळे हे गाव पर्यटन क्षेत्रात येते. मात्र, तेथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून अनेक कलमांच्या बागा बेचिराख झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याबाबत यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले.यावेळी उपस्थित जनतेने तलाठ्यांच्या कामाबाबत तक्रारी मांडल्या. तलाठी भेटत नसल्याने कामे होत नाहीत, तसेच वेळेवर सातबारे उतारे मिळत नाहीत. वर्ष उलटले तरी साध्या नोंदी तलाठी घालत नाहीत, या मुद्द्यावरुन तलाठ्यांच्या कामाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

येथील तलाठी हे साक्षात जिल्हाधिकारी असल्याच्या थाटात वावरतात, असे आरोप जनतेकडून करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तालुक्यात अनेकांना शौचालये बांधायला सांगण्यात आले. परंतु, त्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याची गंभीर बाब यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देण्यात आली.जर लोकांना वेळेवर पैसे दिले नसतील तर हा तालुका हागणदारीमुक्त कसा काय झाला? असा प्रश्न दीपक बेंद्रे यांनी केला. रमाई घरकुल योजनेंतर्गत मागास महिलेला घरकुल मंजूर झाले असेल व ती ७० वर्षांची असेल तर तिला जातीचा दाखला काढताना अडचणी येतात. अशा महिलेला घरकुलाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे घरकुलांबाबतच्या निकषात बदल व्हावेत, अशी मागणी मूरचे सरपंच संजय सुतार यांनी केली.

यावर आपण योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही करु, असे आश्वासन आमदार राजन साळवी यांनी दिले. ग्रामीण भागात जाणाऱ्या काही गाड्या बंद आहेत, त्या पूर्ववत सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार