शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:50 IST

विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.

ठळक मुद्देघरकुलाच्या निकषात बदल करण्याची संजय सुतार यांनी केली मागणीग्रामीण भागात जाणाऱ्या काही बंद गाड्या पूर्ववत सुरु करण्याची मागणीअपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिलांबाबत मुद्दा उपस्थित.

राजापूर : विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.गुरुवारी येथील श्री मंगल कार्यालयात राजापूर पंचायत समितीची आमसभा पार पडली. सभेच्या प्रारंभी नाणार परिसरातील जनतेचा प्रचंड विरोध असतानादेखील शासनाने रिफायनरी प्रकल्प लादल्याने याचा जोरदार निषेध करण्यात आला.

तालुक्यातील महावितरणच्या समस्या या सभेत मांडण्यात आल्या. त्यामध्ये अपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिले याविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील उन्हाळे हे गाव पर्यटन क्षेत्रात येते. मात्र, तेथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून अनेक कलमांच्या बागा बेचिराख झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याबाबत यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले.यावेळी उपस्थित जनतेने तलाठ्यांच्या कामाबाबत तक्रारी मांडल्या. तलाठी भेटत नसल्याने कामे होत नाहीत, तसेच वेळेवर सातबारे उतारे मिळत नाहीत. वर्ष उलटले तरी साध्या नोंदी तलाठी घालत नाहीत, या मुद्द्यावरुन तलाठ्यांच्या कामाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

येथील तलाठी हे साक्षात जिल्हाधिकारी असल्याच्या थाटात वावरतात, असे आरोप जनतेकडून करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तालुक्यात अनेकांना शौचालये बांधायला सांगण्यात आले. परंतु, त्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याची गंभीर बाब यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देण्यात आली.जर लोकांना वेळेवर पैसे दिले नसतील तर हा तालुका हागणदारीमुक्त कसा काय झाला? असा प्रश्न दीपक बेंद्रे यांनी केला. रमाई घरकुल योजनेंतर्गत मागास महिलेला घरकुल मंजूर झाले असेल व ती ७० वर्षांची असेल तर तिला जातीचा दाखला काढताना अडचणी येतात. अशा महिलेला घरकुलाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे घरकुलांबाबतच्या निकषात बदल व्हावेत, अशी मागणी मूरचे सरपंच संजय सुतार यांनी केली.

यावर आपण योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही करु, असे आश्वासन आमदार राजन साळवी यांनी दिले. ग्रामीण भागात जाणाऱ्या काही गाड्या बंद आहेत, त्या पूर्ववत सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार