शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:50 IST

विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.

ठळक मुद्देघरकुलाच्या निकषात बदल करण्याची संजय सुतार यांनी केली मागणीग्रामीण भागात जाणाऱ्या काही बंद गाड्या पूर्ववत सुरु करण्याची मागणीअपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिलांबाबत मुद्दा उपस्थित.

राजापूर : विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.गुरुवारी येथील श्री मंगल कार्यालयात राजापूर पंचायत समितीची आमसभा पार पडली. सभेच्या प्रारंभी नाणार परिसरातील जनतेचा प्रचंड विरोध असतानादेखील शासनाने रिफायनरी प्रकल्प लादल्याने याचा जोरदार निषेध करण्यात आला.

तालुक्यातील महावितरणच्या समस्या या सभेत मांडण्यात आल्या. त्यामध्ये अपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिले याविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील उन्हाळे हे गाव पर्यटन क्षेत्रात येते. मात्र, तेथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून अनेक कलमांच्या बागा बेचिराख झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याबाबत यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले.यावेळी उपस्थित जनतेने तलाठ्यांच्या कामाबाबत तक्रारी मांडल्या. तलाठी भेटत नसल्याने कामे होत नाहीत, तसेच वेळेवर सातबारे उतारे मिळत नाहीत. वर्ष उलटले तरी साध्या नोंदी तलाठी घालत नाहीत, या मुद्द्यावरुन तलाठ्यांच्या कामाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

येथील तलाठी हे साक्षात जिल्हाधिकारी असल्याच्या थाटात वावरतात, असे आरोप जनतेकडून करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तालुक्यात अनेकांना शौचालये बांधायला सांगण्यात आले. परंतु, त्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याची गंभीर बाब यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देण्यात आली.जर लोकांना वेळेवर पैसे दिले नसतील तर हा तालुका हागणदारीमुक्त कसा काय झाला? असा प्रश्न दीपक बेंद्रे यांनी केला. रमाई घरकुल योजनेंतर्गत मागास महिलेला घरकुल मंजूर झाले असेल व ती ७० वर्षांची असेल तर तिला जातीचा दाखला काढताना अडचणी येतात. अशा महिलेला घरकुलाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे घरकुलांबाबतच्या निकषात बदल व्हावेत, अशी मागणी मूरचे सरपंच संजय सुतार यांनी केली.

यावर आपण योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही करु, असे आश्वासन आमदार राजन साळवी यांनी दिले. ग्रामीण भागात जाणाऱ्या काही गाड्या बंद आहेत, त्या पूर्ववत सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार