शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरी : प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने घेतली दखल, दहा हजार चौकोनांचे महाशब्दकोडे ४४ दिवसांच्या प्रयत्नातून साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:27 IST

प्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी ४४ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन साकार केलेल्या दहा हजार चौकोनांच्या शब्दकोड्याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने दखल घेत घेतली आहे. त्यांच्या या कर्तबगारीबद्दल या पुस्तकांच्या प्रकाशकांतर्फे प्रमाणपत्र, बिल्ला, आणि सन्मानपत्र देऊन फरीदाबाद येथे नुकतेच गौरविण्यात आले आहे. ही माहिती कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने घेतली दखलदहा हजार चौकोनांचे महाशब्दकोडे ४४ दिवसांच्या प्रयत्नातून साकार

रत्नागिरी : प्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी ४४ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन साकार केलेल्या दहा हजार चौकोनांच्या शब्दकोड्याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने दखल घेत घेतली आहे.

त्यांच्या या कर्तबगारीबद्दल या पुस्तकांच्या प्रकाशकांतर्फे प्रमाणपत्र, बिल्ला, आणि सन्मानपत्र देऊन फरीदाबाद येथे नुकतेच गौरविण्यात आले आहे. ही माहिती कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुस्तकात समावेश झालेले कांबळी हे कोकणातील एकमेव होत. २०११ साली लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळच्या रत्नागिरी कार्यालयात कांबळी सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. येत्या एप्रिल अखेर ते सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, नोकरी करतानाच त्यांनी प्रारंभापासूनच आपला शब्दकोड्याचा छंद तितक्याच तन्मयतेने जोपासला आहे.

अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, विविध मासिके यांमधून काबळी यांची शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत. ६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१० या कालावधीत त्यांनी १६३९ आडवे, १५८६ उभे असे एकूण ३२२५ शब्द असणारे दहा हजार शब्दांचे भले मोठे कोडे बनविले होते. त्याची दखल २०११ साली लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने घेतली होती.भव्य अशा या शब्दकोड्याची दखल इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकानेही घेतली आहे. भारतीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या कर्तबगारीची नोंद या विक्रमविषयक पुस्तकात केली जाते. आत्तापर्यंत या पु्तकाच्या १८ आवृत्ती प्रसिद्ध झाल्या असून २०१८ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या आवृत्तीत कांबळी यांच्या विक्रमाची नोंद होणार आहे.

त्यांच्या या विक्रमाला मान्यता देणारे विक्रमवीर म्हणुन ओळखपत्र, स्मृतीचिन्ह आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाची प्रत देऊन या प्रकाशकांतर्फे कांबळी यांना गौरविण्यात आले.नावाप्रमाणेच प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले कांबळी हे परोपकारी वृत्तीचे असून गेली ३४ वर्षे ते मोफत वधुवर सूचक मंडळ चालवीत आहेत. त्याचबरोबर कोकणचे प्रसिद्ध असलेले उकडीचे मोदक बनविण्यात त्यांचा विशेष हातखंडा असून वयाच्या ६ व्या वर्षापासून ते मोदक बनवीत आहेत. त्यांच्या या विविधांगी कार्याची दखल अनेक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीliteratureसाहित्य