शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

रत्नागिरी पाेलिसांनी नष्ट केला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा, ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन

By अरुण आडिवरेकर | Updated: December 28, 2024 18:22 IST

रत्नागिरी : रत्नागिरी पाेलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन ...

रत्नागिरी : रत्नागिरी पाेलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन असा एकूण १४.०१३ किलाेग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केला आहे. नवी मुंबईतील तळाेजा येथे रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसांनी अंमली पदार्थ जाळून नष्ट केला.पोलिस महासंचालकांकडून एन. डी. पी. एस अॅक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्याकरिता सर्व पोलिस अधीक्षकांना निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे आहेत. सन २००६ ते सन २०२० या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये  दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण १२ एन. डी. पी. एस. कायद्यांतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन घेतले हाेते. हा मुद्देमाल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आला होता.त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून हा मुद्देमाल नवी मुंबईतील तळाेजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. येथे नाश करण्याची मंजुरी दिली हाेती. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने शुक्रवारी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल १२ विविध गुन्ह्यातील १०.०३३ किलोग्राम गांजा व ३.९८ किलोग्राम केटामाईन असा मुद्देमाल जाळून नष्ट केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस